शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

शेतकरी आर्थिक अडचणीत

By admin | Updated: July 8, 2015 01:23 IST

राज्यातील भाजीपाला शेतमालाच्या घसरलेल्या दराचा परिणाम ग्रामीण अर्थकारणावर होत आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यासह दूध, डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे

रविकिरण सासवडे  बारामतीराज्यातील भाजीपाला शेतमालाच्या घसरलेल्या दराचा परिणाम ग्रामीण अर्थकारणावर होत आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यासह दूध, डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल मंदावली आहे. या परिसरातील उद्योगधंदे मंदीला तोंड देत आहेत. तसेच, शासनस्तरावर देखील शेतमालाच्या दराबाबत उदासीनता असल्याने हे चित्र बदलण्यास तयार नाही. शेतीमधूनच येणारे उत्पन्न थांबले आहे. उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचा मेळ घालताना शेतकऱ्याच्या नाकीनऊ आले आहेत. बहुतेक शेतकरी जोडधंदा म्हणून दूधव्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. दूध व्यवसायामुळे शेतकऱ्याच्या हातात खेळते भांडवल राहते. मात्र मागील सात-आठ महिन्यांपासून दुधाच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. २५ रुपयांवर असणारा दूधदर आज १५ ते १६ रुपयांवर आला आहे. मात्र बाजारात ग्राहकांना विक्री होणाऱ्या पँकिंगच्या दुधाचे दर जैसे थे आहेत. दूध दराचा उत्पादक ते ग्राहक या प्रवासात मोठ्या प्रमाणावर वाटमारी होत आहे. हा फरक उत्पादकाला मिळणाऱ्या दुपटीपेक्षा जास्त आहे. दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी उत्पादकाला २० रुपयांच्या खाली दर देऊ नये असा अध्यादेश काढला होता. तसेच कारवाई करण्याचाही धाकही खडसे यांनी दाखवला होता. मात्र हा केवळ एक फार्सच ठरला. ३.५ फॅट, ८.५ स्निग्धांशाला १६ रुपये दर सध्या दूध संस्थांकडून दिला जात आहे. पशुखाद्य, चारा यांचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादकाच्या हातात केवळ शेणच राहात आहे. ऊसउत्पादनाचा वाढता खर्च, त्यातून अडीच वर्षाच्या कालावधीत मिळणारा एकरी परतावा पाहता ऊसधंदा तोट्याचा झाला आहे. शेतकऱ्याच्या हक्काची असणारी एफआरपीदेखील त्याला मिळाली नाही. राज्य शासन आणि कारखाने यांची तू तू मै मै सुरूच आहे. यामध्ये शेतकरी मात्र भरडला जात आहे. यातून ऊसपिकापासून शेतकरी दुरावण्याची भीती आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचा प्रमुख कारणीभूत असणारा सहकार संपुष्टात येण्याची ही नांदी मानली जात आहे. एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे सूतोवाच सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी केले होते. तेवढ्याच तत्परतेने कारखान्यांनीही एफआरपी देणे शक्य नसल्याचे सांगितले होते. एफआरपीप्रमाणे कोणत्याच कारखान्याने दर दिला नाही. त्यावर सहकारमंत्र्यांनीही कारवाई केली नाही. त्यामुळे ऊस उत्पादकाचाही एफआरपीबाबत भ्रमनिरास झाला. डाळिंब बागांचा सध्या मृग बहर सुरू आहे. मात्र तेल्या रोगाने हजारो हेक्टरमधील बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. रोगग्रस्त फळे मातीमोल किमतीत विकावे लागत आहे. २० किलोच्या एका कॅरेटला अवघा १०० रुपये दर मिळाला आहे. म्हणजे ५ रुपये किलोने डाळिंब उत्पादकाला आपले फळ विकावे लागत आहे. तेल्याच्या प्रादुर्भावाने लाखो रुपये खर्च करून जोपासलेल्या बागा तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.