शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अंमलबजावणीअभावी पर्यावरणाची हानी

By admin | Updated: November 26, 2014 00:05 IST

पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्याकडे कायदे आहेत; परंतु त्यांची अंमलबजावणी होत नाही. पर्यावरणाची जागृती होण्याच्या दृष्टीने ही जागृती झाली पाहिजे.

पुणो : पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्याकडे कायदे आहेत; परंतु त्यांची अंमलबजावणी होत  नाही. पर्यावरणाची जागृती होण्याच्या दृष्टीने ही जागृती झाली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनीही तेवढेच सजग राहून त्याची माहिती घेतली पाहिजे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
‘गंगोत्री’ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘निसर्गस्नेही जीवनशैली’ या कार्यक्र मात ते बोलत होते. संस्थेचे संचालक गणोश जाधव, राजेंद्र आवटे, मकरंद केळकर या वेळी उपस्थित होते.
गाडगीळ म्हणाले, ‘‘आपल्याकडे पर्यावरणीय कायदे आहेत; मात्र नागरिकांना त्याची माहिती नसते. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी नीटपणो होत नाही. महापालिकेकडून पर्यावरण अहवाल जाहीर होत असतात. मात्र, नागरिकांनी स्वत:हून त्याची माहिती करून घेतली पाहिजे. नागरिकांचा पर्यावरणीय कार्यक्रमात सहभाग वाढला, तरच कायद्याची योग्य अंमलबजावणी होईल. आस्ट्रेलियामध्ये ‘सिटझन रिव्हर वॉच’ असा उपक्र म राबविला जातो. त्यामध्ये शहरातील नद्यांची परिस्थिती नागरिकांच्या लक्षात आणून दिली जाते. त्यातून नागरिकांमध्ये जागृती होते. प्रयोगशाळेत नेऊन नागरिकांच्या सहभागातून प्रयोग केले जातात. मात्र, पर्यावरणाचा विषय निघाला, की सध्या पर्यावरणाची हानी होत आहे, विज्ञान-तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा :हास होत आहे, असे बोलले जाते. तेवढेच आपल्याला माहीत असते.’’
 
4विज्ञान आणि वाढत्या लोकसंख्येमुळे केवळ अधोगतीच झाली आहे, असे नाही. त्यामुळे प्रगतीही खूप झाली आहे. मात्र, ही प्रगती पर्यावरणाच्या मुळावर येऊ नये, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शहरातील टिंबर मार्केटवाले फर्निचरसाठी वडाची झाडे सर्रास कापतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकार आणि प्रशासनामध्ये चांगले लोक आहेत; परंतु यंत्रणा नक्कीच सडली आहे. पुण्यात अनेक वेळा नागरिकांनी उत्स्फूर्तपणो टेकडी बचावसारखी आंदोलने केली आहेत. त्याची व्यापकता वाढली पाहिजे. निसर्गामध्ये असणा:या गोष्टींशी आपण जुळवून घ्यायला हवे. 
 
4टेकडय़ांवर गेल्या काही वर्षात विदेशी झाडे लावली जात आहेत. मात्र, या झाडांचा पशू, पक्षी, कीटकांना काहीच फायदा होत नाही. अशा झाडांवर पक्षी घरटी करीत नाहीत. त्यामुळे अशी झाडे लावण्याऐवजी ती काढून त्याजागी देशी झाडे लावावीत.