शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अंमलबजावणीअभावी पर्यावरणाची हानी

By admin | Updated: November 26, 2014 00:05 IST

पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्याकडे कायदे आहेत; परंतु त्यांची अंमलबजावणी होत नाही. पर्यावरणाची जागृती होण्याच्या दृष्टीने ही जागृती झाली पाहिजे.

पुणो : पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्याकडे कायदे आहेत; परंतु त्यांची अंमलबजावणी होत  नाही. पर्यावरणाची जागृती होण्याच्या दृष्टीने ही जागृती झाली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनीही तेवढेच सजग राहून त्याची माहिती घेतली पाहिजे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
‘गंगोत्री’ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘निसर्गस्नेही जीवनशैली’ या कार्यक्र मात ते बोलत होते. संस्थेचे संचालक गणोश जाधव, राजेंद्र आवटे, मकरंद केळकर या वेळी उपस्थित होते.
गाडगीळ म्हणाले, ‘‘आपल्याकडे पर्यावरणीय कायदे आहेत; मात्र नागरिकांना त्याची माहिती नसते. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी नीटपणो होत नाही. महापालिकेकडून पर्यावरण अहवाल जाहीर होत असतात. मात्र, नागरिकांनी स्वत:हून त्याची माहिती करून घेतली पाहिजे. नागरिकांचा पर्यावरणीय कार्यक्रमात सहभाग वाढला, तरच कायद्याची योग्य अंमलबजावणी होईल. आस्ट्रेलियामध्ये ‘सिटझन रिव्हर वॉच’ असा उपक्र म राबविला जातो. त्यामध्ये शहरातील नद्यांची परिस्थिती नागरिकांच्या लक्षात आणून दिली जाते. त्यातून नागरिकांमध्ये जागृती होते. प्रयोगशाळेत नेऊन नागरिकांच्या सहभागातून प्रयोग केले जातात. मात्र, पर्यावरणाचा विषय निघाला, की सध्या पर्यावरणाची हानी होत आहे, विज्ञान-तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा :हास होत आहे, असे बोलले जाते. तेवढेच आपल्याला माहीत असते.’’
 
4विज्ञान आणि वाढत्या लोकसंख्येमुळे केवळ अधोगतीच झाली आहे, असे नाही. त्यामुळे प्रगतीही खूप झाली आहे. मात्र, ही प्रगती पर्यावरणाच्या मुळावर येऊ नये, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शहरातील टिंबर मार्केटवाले फर्निचरसाठी वडाची झाडे सर्रास कापतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकार आणि प्रशासनामध्ये चांगले लोक आहेत; परंतु यंत्रणा नक्कीच सडली आहे. पुण्यात अनेक वेळा नागरिकांनी उत्स्फूर्तपणो टेकडी बचावसारखी आंदोलने केली आहेत. त्याची व्यापकता वाढली पाहिजे. निसर्गामध्ये असणा:या गोष्टींशी आपण जुळवून घ्यायला हवे. 
 
4टेकडय़ांवर गेल्या काही वर्षात विदेशी झाडे लावली जात आहेत. मात्र, या झाडांचा पशू, पक्षी, कीटकांना काहीच फायदा होत नाही. अशा झाडांवर पक्षी घरटी करीत नाहीत. त्यामुळे अशी झाडे लावण्याऐवजी ती काढून त्याजागी देशी झाडे लावावीत.