शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

रोजगारक्षम विद्यार्थी घडवावेत!

By admin | Updated: January 11, 2016 01:11 IST

शिक्षण क्षेत्रात पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे योगदान मोलाचे आहे. सेवावृत्तीचा भाव ठेवून या संस्थेने आजवर कार्य केले.

पिंपरी : शिक्षण क्षेत्रात पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे योगदान मोलाचे आहे. सेवावृत्तीचा भाव ठेवून या संस्थेने आजवर कार्य केले. शिक्षण संस्थांनी ज्ञानदानाचे व्रत कायम ठेवून विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी न बनवता रोजगारक्षम बनविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी आकुर्डी येथे रविवारी केले. आकुर्डी-प्राधिकरण येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील,अमर साबळे, ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, एआरसीटीचे चेअरमन डॉ. ए. डी. देशपांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, माजी खासदार नानासाहेब नवले, ट्रस्टचे सचिव विठ्ठल काळभोर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खजिनदार शांताराम गराडे, पद्मा भोसले, भाईजान काझी, माजी आमदार कृष्णराव भेगडे, आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, ‘‘आपल्या देशात उच्च शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात सार्वत्रिकीकरण झाले आहे. पण गुणात्मक दर्जा उंचावण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी पदवीधर होतो, पण तो रोजगारक्षम नसतो. देशात सध्या बेरोजगारी ही समस्या राहिलेली नसून रोजगारक्षम तरुण मिळण्याची समस्या निर्माण झाली आहे. नोकरीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये सध्याच्या तरुण पिढीकडे नसल्याची खंत उद्योगसमूहाकडून केली जाते.’’राज्यपाल म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश झाला आहे. सर्वाधिक वेगाने वाढणारे पिंपरी-चिंचवड शहर आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात आॅटो, फार्मास्युटिकल्स, मॅकेनिकल, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आदी क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडची ओळख आशिया खंडात आहे. उद्योगक्षेत्राचा विकास साधायचा असेल, तर उद्योगांना कुशल कामगार अधिक उपलब्ध होण्याची गरज आहे.’’ शिक्षण क्षेत्राविषयी राज्यपाल म्हणाले, ‘‘शिक्षण संस्थांनी उद्योगांच्या सहकार्याने त्यांना कोणती कौशल्ये असणारे विद्यार्थी हवे आहेत, याचा अभ्यास करून त्या अनुषंगाने अभ्यासक्रम निश्चित करावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढीस लागेल आणि उद्योगसमूहांनाही त्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ मिळेल. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांनी उद्योजकता आणि नावीन्याचा ध्यास घेण्याची वृत्ती जोपासण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नोकऱ्या मागणारे पदवीधर संस्थेतून बाहेर पडण्याऐवजी नोकऱ्या देणारे उद्योजक घडविण्यात शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा.’’‘‘शिस्तबद्धपणे शिक्षण देणारी ही संस्था आहे. भाऊंनी सहकार, राजकारण, समाजकारणाचे धडे दिले. त्यांच्या योगदानातूनच ही संस्था उभी राहिली आहे,’’असे आढळराव पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘शंकरराव बाजीराव पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अशा केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण ही संस्था देत चांगले व गुणवत्तात्मक शिक्षण देत आहे. भविष्यात अभिमत विद्यापीठासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.’’ रौप्यमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन झाले. अध्यक्ष लांडगे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. भाईजान काझी यांनी आभार मानले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)