शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
14
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
15
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
16
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
17
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
18
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
19
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
20
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

भोर औद्योगिक वसाहतीची आता ‘सोशल’ चर्चा

By admin | Updated: December 27, 2016 03:10 IST

निवडणुका आल्या की भोर तालुक्यात चर्चा सुरू होते ती औद्योगिक वसाहतीची. राजकारणी त्याचा निवडणुकीपुरता पुरेपूर वापर करतात आणि निवडणुका झाल्या, की प्रश्न सोडून

भोर : निवडणुका आल्या की भोर तालुक्यात चर्चा सुरू होते ती औद्योगिक वसाहतीची. राजकारणी त्याचा निवडणुकीपुरता पुरेपूर वापर करतात आणि निवडणुका झाल्या, की प्रश्न सोडून देतात. आता तरुणांनीच ही मागणी पुढे रेटण्यास सुरुवात केली असून, यात राजकारण न करता प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची मागणी सुरू झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगू लागली आहे.भोर हे संस्थानकालीन अग्रेसर राहिलेले शहर असून, ठाकरसी ग्रुपने फोम लेदरमध्ये मार्केट मिळवले तर आरलॅब्जने रंग तयार करुन रशियाची बाजारपेठ मिळवली आणि भोरचे नाव जगाच्या नकाशावर नेले. बॉम्बे नेट, स्टील ग्रुप टेप, सहकारी सुतगिरणी, भोर शहरातील ३७ एकरावरील मिनी औद्योगिक वसाहत अशा सर्व ठिकाणी सुमारे ४ ते ५ हजार कामगार शेती करुन घरप्रपंच संभाळून काम करीत होते. सर्व काही अलबेल होते.१९९० नंतर जागतिकीकरण, आर्थिक मंदी, कामगार संघटनांचा वाद यांसारख्या अनेक कारणांमुळे भोर शहराजवळचे उद्योग-व्यवसाय, कारखाने एकामागून एक बंद पडल. नुसते बंदच झाले नाही, तर इमारतीही जमीनदोस्त झाल्या. एकेकाळी कामगारांच्या वावराने फुलून जाणारा परिसर सुनसान झाला. याच कारणाने भोरच्या बाजारपेठेवर मंदीचे सावट येऊन आर्थिक उलाढाल मंदावली. लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे हातात दाम नाही. सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढत गेले. उद्योगधंदा उरला नाही त्यामुळे अनेकांनी स्थलांतर केले. तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम डोंगरी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. यामुळे नोकरी, कामधंद्यासाठी भोरसोडुन स्थलांतर करावे लागले.जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, मावळ, मुळशी तालुक्यांचा शेजारचा खंडाळा, वाई तालुक्यांत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाल्याने सदर तालुक्याचा झपाट्याने विकास झाला. मात्र भोर पुण्यापासून ५० किलो मीटरवर असतानाही आहे त्या औद्योगिक वसाहती बंद झाल्याने भोर, वेल्हे तालुक्यांचा फारसा विकास झाला नाही. तो खुंटत गेला. भोर शहरातील ३७ एकरावर असलेली मिनी औद्योेगिक वसाहत बंद पडली आहे. ती पुन्हा सुरू करावी आणि तालुक्यात नवीन औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) सुरू करण्याची मागणी बेरोजगार तरुण युवक करीत आहेत. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष भोर तालुक्यातील तरुण बेकार झाले असून, त्यांना काम मिळावे म्हणून तालुक्यात नवीन औद्योगिक वसाहत सुरु करण्याची घोषणा केली जाते. निवडणुका संपल्या की सदरची घोषणा ही घोषणाच राहते. त्याची आठवण पुढच्या पाच वर्षांनी निवडणुका आल्यावरच राजकीय नेत्यांना होते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी एमआयडीसीचे निवडणुकीपुरते भांडवल न करता सर्वांनी एकत्र येऊन राजकारणविरहित औद्यौगिक वसाहत व्हावी यासाठी प्रयत्न करायला हवेत तरच ते शक्य होणार आहे.पर्यटनदृष्टीनेही विकास व्हावा...१ भोर, वेल्हे तालुक्यांत औद्योगिक वसाहती करण्यासह येथील निर्सगसौंदर्य, घाट, गडकोट किल्ले, धार्मिक स्थळे इतिहासकालीन, संस्थानकालीन वाडे, मंदिरे, धरणे यांचा विकास केल्यास तालुक्यात पर्यटनदृष्टीने वाढ होणार आहे.२ भोर शहर व तालुक्यात सध्या लक्ष एमआयडीसी नावाचा ग्रुप तरुणांनी एकत्र येऊन केला आहे. त्या माध्यमातून एमआयडीसी करावी म्हणून तरुणांत जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. सदरच्या चळवळीत दिवसेंदिवस तरुणांचा सहभाग वाढत असून राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या निवडणुकांवर याचा परिणाम जाणवेल अशीही चर्चा सर्वत्र सध्या सुरु आहे.