शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

वतनदार शेतकऱ्यांचा ७/१२ रिकामा

By admin | Updated: July 1, 2015 23:48 IST

एके काळी जमीनदार म्हणून गावात नावाजलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या सात-बारावर (७ /१२) आता जमीनच उरली नाही. विविध कारणांमुळे शेतजमीन घटत गेल्याने आजमितीला

अंकुश जगताप , पिंपरी एके काळी जमीनदार म्हणून गावात नावाजलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या सात-बारावर (७ /१२) आता जमीनच उरली नाही. विविध कारणांमुळे शेतजमीन घटत गेल्याने आजमितीला अशा वतनदारांच्या नावापुढे भूमिहीन असा शिक्का पडला आहे. या कुटुंबातील मुलांची धनिक कुटुंबीयांच्या मुलींसोबत सोयरीक जुळून येणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, अशा शेतकऱ्यांसाठी १ जूनपासून सुरू असलेला कृषी जागृती सप्ताह वांझोटाच असल्याची भावना व्यक्त होत आहे. दहा वर्षांपूर्वीपर्यंत पिंपरी-चिंचवड शहर आणि लगतच्या मावळ, मुळशी तालुक्यांमध्ये बहुतेक शेतकऱ्यांकडे शेतीक्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. एकेका कुटुंबाच्या नावे किमान पाच पंचवीस एकर जमीन असायचीच. एकत्र कुटुंबपद्धती आणि शेतीवर अवलंबित्व असल्याने अशा अनेक घराण्यांचा गावात मोठा दबदबा असायचा. मोठे बागायतदार, जमीनदार म्हणून अशा घरांची पंचक्रोशीत ओळख असायची. अशा घरात आपली मुलगी नांदण्यास जावी, अशी अनेक पित्यांची इच्छा असायची. तालेवार घराणे म्हणून वधूपिता सोयरिक जुळविण्यास तयार व्हायचे. मागील काही वर्षांमध्ये गावामधील अशा तालेवार घराण्यांच्या रुबाबाला अनेक कारणांमुळे घरघर लागली आहे. सुरुवातीला शहरामधील व लगतच्या भागातील एकेका गावातील अनेक घरांच्या सर्वच्या सर्व जमिनी विविध शासकीय कारणांसाठी संपादित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. कुटुंबे विभक्त झाल्याने कुटुंबकर्त्याच्या हातचा कारभार अनेकांहाती गेला आहे. अशातच नागरिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढल्याने जमिनीला मागणी वाढली. काही नवख्या कारभाऱ्यांनी शेतीविक्रीचा सपाटा लावत एकेक करून अनेक शेतांचे सातबारे निकाली काढले. यापैकी अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा शेतजमीन खरेदीबाबत अनास्था दाखविल्याचे प्रकार घरोघरी झाले आहेत. मिळालेल्या पैशांच्या नियोजनाअभावी त्यांच्याकडे शेती नावापुरतीच उरली आहे. एके काळी गावात तालेवार असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडे आता घरापुरतीच जागा उरल्याची स्थिती शहरात, तसेच लगतच्या गावांमध्ये पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आधीच कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना इतर पर्यायच नसल्याने गरजा भागविण्यासाठी, मुलांच्या लग्नांसाठी आहे ती मिळकत विकण्याची वेळ आली. - एकीकडे आधीच मुलींचे प्रमाण घटले असताना नवरी मिळणे कठीण झाले आहे. मुलांसाठी वधूचा शोध घेण्यात अनेक घरांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. वधूपित्याकडून आता भावी काळातील तजवीज म्हणून भावनिक मुद्दयांपेक्षा आर्थिक, व्यावहारिक बाबींची पडताळणी करून घेतली जात आहे. त्यातच केवळ शेती नाही म्हणून अशा घरांमध्ये आपली मुलगी देण्यासाठी अनेक वधूपिता नकार देऊ लागले आहेत. परिणामी, मुलांची लग्ने जुळविण्यात पालकांची चांगलीच दमछाक होत आहे.