शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

वतनदार शेतकऱ्यांचा ७/१२ रिकामा

By admin | Updated: July 1, 2015 23:48 IST

एके काळी जमीनदार म्हणून गावात नावाजलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या सात-बारावर (७ /१२) आता जमीनच उरली नाही. विविध कारणांमुळे शेतजमीन घटत गेल्याने आजमितीला

अंकुश जगताप , पिंपरी एके काळी जमीनदार म्हणून गावात नावाजलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या सात-बारावर (७ /१२) आता जमीनच उरली नाही. विविध कारणांमुळे शेतजमीन घटत गेल्याने आजमितीला अशा वतनदारांच्या नावापुढे भूमिहीन असा शिक्का पडला आहे. या कुटुंबातील मुलांची धनिक कुटुंबीयांच्या मुलींसोबत सोयरीक जुळून येणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, अशा शेतकऱ्यांसाठी १ जूनपासून सुरू असलेला कृषी जागृती सप्ताह वांझोटाच असल्याची भावना व्यक्त होत आहे. दहा वर्षांपूर्वीपर्यंत पिंपरी-चिंचवड शहर आणि लगतच्या मावळ, मुळशी तालुक्यांमध्ये बहुतेक शेतकऱ्यांकडे शेतीक्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. एकेका कुटुंबाच्या नावे किमान पाच पंचवीस एकर जमीन असायचीच. एकत्र कुटुंबपद्धती आणि शेतीवर अवलंबित्व असल्याने अशा अनेक घराण्यांचा गावात मोठा दबदबा असायचा. मोठे बागायतदार, जमीनदार म्हणून अशा घरांची पंचक्रोशीत ओळख असायची. अशा घरात आपली मुलगी नांदण्यास जावी, अशी अनेक पित्यांची इच्छा असायची. तालेवार घराणे म्हणून वधूपिता सोयरिक जुळविण्यास तयार व्हायचे. मागील काही वर्षांमध्ये गावामधील अशा तालेवार घराण्यांच्या रुबाबाला अनेक कारणांमुळे घरघर लागली आहे. सुरुवातीला शहरामधील व लगतच्या भागातील एकेका गावातील अनेक घरांच्या सर्वच्या सर्व जमिनी विविध शासकीय कारणांसाठी संपादित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. कुटुंबे विभक्त झाल्याने कुटुंबकर्त्याच्या हातचा कारभार अनेकांहाती गेला आहे. अशातच नागरिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढल्याने जमिनीला मागणी वाढली. काही नवख्या कारभाऱ्यांनी शेतीविक्रीचा सपाटा लावत एकेक करून अनेक शेतांचे सातबारे निकाली काढले. यापैकी अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा शेतजमीन खरेदीबाबत अनास्था दाखविल्याचे प्रकार घरोघरी झाले आहेत. मिळालेल्या पैशांच्या नियोजनाअभावी त्यांच्याकडे शेती नावापुरतीच उरली आहे. एके काळी गावात तालेवार असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडे आता घरापुरतीच जागा उरल्याची स्थिती शहरात, तसेच लगतच्या गावांमध्ये पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आधीच कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना इतर पर्यायच नसल्याने गरजा भागविण्यासाठी, मुलांच्या लग्नांसाठी आहे ती मिळकत विकण्याची वेळ आली. - एकीकडे आधीच मुलींचे प्रमाण घटले असताना नवरी मिळणे कठीण झाले आहे. मुलांसाठी वधूचा शोध घेण्यात अनेक घरांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. वधूपित्याकडून आता भावी काळातील तजवीज म्हणून भावनिक मुद्दयांपेक्षा आर्थिक, व्यावहारिक बाबींची पडताळणी करून घेतली जात आहे. त्यातच केवळ शेती नाही म्हणून अशा घरांमध्ये आपली मुलगी देण्यासाठी अनेक वधूपिता नकार देऊ लागले आहेत. परिणामी, मुलांची लग्ने जुळविण्यात पालकांची चांगलीच दमछाक होत आहे.