शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

‘पुरंदर उपसा’च्या पाण्याला मागणी

By admin | Updated: January 12, 2017 02:11 IST

दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या

भुलेश्वर : दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या मोफत सुरू असून ऐन दुष्काळी परिस्थीतीत गावाजवळील ओढे, नाले, गावतळी यांना प्राधान्य दिले जाऊन ती भरली जात असल्याने पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.पुरंदर तालुक्यातील लाभदायक क्षेत्रातील शेतीला आता सुगीचे दिवस आले आहेत; मात्र मोफत पाणी मिळत असल्याने पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. योजनेच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. योजनेचे पाणी शेतात ज्या व्हॉल्व्हवरून सुटते, त्याच्याजवळ राखणही शेतकऱ्यांनाच करावी लागते. मोफत पाणी असल्याने कुणीही कोठेही पाणी घेतात. यामुळे नियोजनानुसार पाणी देता येत नाही.सध्या योजनेचे पाणी मोफत सुरू असून गावाजवळील पाणीसाठे भरण्याला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे गावच्या विहिरी, बोरवेल यांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होत आहे. यामुळे पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेततळी खोदलेली आहेत. तीही सध्या भरण्याचे काम सुरू आहे. यामुळे काहीअंशी शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटत आहे. जे शेतकरी या योजनेच्या लाईनपासून दूर आहेत ते एकत्र येऊन स्वत: महागडी पाईपलाईन करून आपल्या शेतात पाणी नेत आहेत. पाणी व्यवस्थित मिळत असल्याने उत्पन्नही चांगले मिळत आहे.(वार्ताहर)धावपळ४पुरंदर तालुक्यात सध्या दोन पंपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तिसरा पंप सुरू करण्यासाठी योजनेच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाली आहे. थोड्याच दिवसांत तिसराही पंप सुरू होईल. ४पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४,४५०, दौंड तालुक्यातील ३,७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६,४९८ असे २५,४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.पुरंदर उपसा जलसिंचन योजनेमुळे येथील शेतकरी समाधानी आहे. सध्या सुरू असलेल्या मोफत पाण्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याची पातळी टिकून राहणार आहे. पाणी देण्यासाठी या योजनेचे अधिकारी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तारेवरची कसरत करीत आहेत. तरीही, नियोजनानुसार पाणी मिळत आहे.- अरुण कोलते, लाभधारक शेतकरी४शेतातून चांगले उत्पादन मिळाल्याने सर्वसामान्य शेतकरी आज आपल्या मुलांना चांगले शिक्षणही देत आहे. ४नवीन पिढीच्या भवितव्यासाठी ही योजना सोनेरी हिरा, गोरगरिबांच्या भवितव्याचा गळ्यातील ताईत बनली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी नेहमीच प्रयत्न करतात.पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या सुरू आहे. पाण्याची मागणी वाढलेली आहे. यामुळे पाणी मिळण्यास उशीर होत आहे. नियोजनानुसार पाणी सुरू आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.- साहेबराव भोसले, शाखा अभियंता