शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने भोर तालुक्यात ४५७ हेक्टर भातपिकाचे नुकसान, भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:10 IST

भोर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातील दगड, माती, झाडे पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली वाहून तालुक्यातील ६६ गावांतील १११७ लाभार्थ्यांचे सुमारे ४५७.२० ...

भोर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातील दगड, माती, झाडे पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली वाहून तालुक्यातील ६६ गावांतील १११७ लाभार्थ्यांचे सुमारे ४५७.२० हेक्टर भातपिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने तालुक्यात भात, नाचणी, सोयाबीन,भुईमुग पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र सर्वाधिक नुकसान भातपिकाचे झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे सदर पिकांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

भोर तालुक्यात १९ जुलै ते २२ जुलैदरम्यान झालेल्या पावसामुळे दुर्गम डोंगरी भागातील दगड माती झाडे झुडपे पाण्याच्या प्रवाहासह वाहत येऊन तर नदीनाल्याचे प्रवाह खाचरात आल्याने खाचरे गाडणे यामुळे दरड कोसळणे, जमीन खरडणे,नदीपात्र प्रवाह बदलणे यामुळे शेती वाहून जाणे याचे १६९.८० हेक्टरवर तर शेतात गाळ माती ३ इंचापेक्षा अधिक जमा होणे ८.५० हेक्टरचे ६६ गावांतील ६८२ हेक्टरचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अजून प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे केले जाणार आहेत.

दरम्यान, १९ ते २२ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. प्रमुख पीक असलेल्या भातपिकाचे ताली वाहून जाणे भातपीक गाळाने गाडून जाणे, पाण्याबरोबर वाहून जाणे यामुळे ६६ गावांतील १११७ शेतकऱ्यांचे सुमारे ४५७.२० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. नाचणी ११८.२० हेक्टर क्षेत्र ४३९ लाभार्थी सोयाबीन १७.८० हेक्टर ९१ लाभार्थी भुईमूग १६ हेक्टर क्षेत्र ७२ लाभार्थी अशा १९१७ लाभार्थीचे एकूण ६१९.२० हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे.

भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी गावात डोंगर कोसळून तर नदीनाले ओढ्यांचे पाणी शिरून गाळाने भात खाचरे भरून पिकाचे नुकसान झालेले आहे. तर डोंगरउतारावरील नाचणी दगड मातीबरोबर वाहून गेल्याने मोठे नुकसान झालेले आहे. खाचरात लावलेले भाताच्या पिकाचे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांना भाताचे पीकच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे भवितव्य तांदूळ विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. मागील दोन वर्षात दरवेळी अतिवृष्टीने नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून नुकसानभरपाई मिळण्याची वाट शेतकरी पाहत आहेत.

भातखाचरात किंवा शेतात दरडी कोसळणे जमीन खरडणे नदीपात्र किंवा ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने शेतजमीन वाहून जाणे यासाठी प्रतिहेक्टरी ३७५०० रु अनुदान आहे. तर शेतजमिनीत ३ इंचापेक्षा अधिक गाळ जमा झालेला काढणे यासाठी प्रतिहेक्टरी १२२०० रु अनुदान शासन देते. तालुक्यात १६९ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. त्यासाठी ६३६७५०० अनुदान मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे.तर ८.५० हेक्टर शेतजमिनीत गाळ साचला आहे.त्यासाठी प्रतिहेक्टरी १२२०० प्रमाणे १०३७०० रु अनुदान मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात वाढही होऊ शकते. तर भात, नाचणी, सोयाबीन, भुईमुग या पिकांचे ६१९.२० हेक्टरचे नुकसान झालेले असून त्यासाठी ६८०० प्रतिहेक्टरी याप्रमाणे ४२१०५६० अनुदान मिळेल, असा प्राथमिक अंदाज आहे.

कृषी विभागाकडून अद्याप पंचनामे नाहीत

भोर तालुक्यात नुकसान झालेल्या भातशेतीचे व खाचरांची पाहणी अद्याप कृषी विभागाकडून केली गेलेली नाही. फक्त अंदाज वर्तवले आहेत. मात्र प्रत्यक्ष पंचनामे कधी होणार आणि अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर नुकसानभरपाई कधी मिळणार, असा सवाल शेतकरी करीत आहेत.