शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उजनीतील मासेमारी व्यवसायाचा अस्तित्वासाठी संघर्ष

By admin | Updated: December 27, 2016 03:02 IST

उजनी धरणाने पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्याचा कायापालट केला. धरणामुळे कृषी, उद्योगक्षेत्राला भरभराटीचे दिवस आले तशीच भरभराट मासेमारी व्यवसायाला

कळस : उजनी धरणाने पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्याचा कायापालट केला. धरणामुळे कृषी, उद्योगक्षेत्राला भरभराटीचे दिवस आले तशीच भरभराट मासेमारी व्यवसायाला आली. मात्र मासेमारी व्यवसायातील ही प्रगती वाढण्याऐवजी उजनीतील हा व्यवसाय आज अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. २००८ पासून उजनी जलाशयात मत्स्यबीजच न सोडल्याने मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १९८० ला धरणात पाणी अडवण्यास सुरवात केल्यानंतर मासेमारी व्यवसायालाही जोरात सुरुवात झाली. २००८ पर्यंत हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू होता. तेव्हा मासेमारीचे हक्क मत्स्य विभागाकडे होते. मात्र, २००८ मध्ये सुरक्षिततेच्या कारणावरून हे हक्क जलसंपदा विभागाकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाला घरघर लागली. धरणातील मासेमारीवर व्यवसायावर पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतील जवळपास ३० हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. सुरुवातीच्या काळात हमखास रोजगाराचे एक चांगले साधन म्हणून सुरू झालेल्या या व्यवसायामध्ये अलीकडच्या काळात अनेक अपप्रवृत्तीने शिरकाव केला आहे. मच्छीमारांकडून मासेमारीसाठी लहान जाळीचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे मत्स्यबीजाची शिकार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे माशांच्या पैदासीमध्येही मोठी घट झाली आहे. मत्स्यबीज न सोडल्याचा व परप्रांतीय मच्छीमारांनी केलेल्या बेकायदेशीर मासेमारीमुळे उजनीतील माशांचे उत्पादन पूर्णपणे घटून त्याचा गंभीर परिणाम यंदाच्या मासेमारी हंगामावर झाला आहे. धरण १०० टक्के भरूनही मच्छीमारांची मासेमारीसाठी सोडलेली जाळी रिकामीच निघत असल्याने मच्छीमारांच्या पदरी निराशाच आली आहे. भिगवण व इंदापूर मासळी बाजारात पूर्वी वीस टन माशांची आवक होत असते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही आवक कमी झाली आहे. २००८ नंतर मत्स्यबीजच सोडले नाही. एका वर्षात धरणामध्ये सुमारे एक कोटी मत्स्यबीज सोडणे अपेक्षित आहे. मात्र, मासेमारीचे हक्क मत्स्य विभागाकडून जलसंपदा विभागाकडे आल्यानंतर धरणामध्ये एकदाही मत्स्यबीज सोडले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. लहान जाळीतून होणारी मासेमारी, अनेक वर्षांपासून मत्स्यबीज न सोडल्याने आज धरणात मासे मिळणे मुश्कील झाले आहे. वास्तविक पाहता एका वर्षात धरणामध्ये सुमारे एक कोटी मत्स्यबीज सोडणे गरजेचे असून गत आठ वर्षांत आठ कोटी मत्स्यबीज सोडणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने केवळ नैसर्गिक पैदाशीवरच धरणातील मत्स्यसंपदा अवलंबून राहिली. त्यातही केवळ चिलापी या घाण पाण्यात वाढणाऱ्या माशाचे उजनीतील प्रमाण वाढल्याने त्याचाही फटका इतर जातीच्या माशांच्या उत्पादनास बसला आहे. उजनीत सुरुवातीला आढळणारे प्रामुख्याने वाम, मरळ, कटला, आहेर, बोदवा, शिंगी, मांगूर रोहू, शिंगटा, गुगळी, झिंगा, गवत्या असे विविध प्रकारचे चवदार मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उजनीतील चिलापीव्यतिरिक्त इतर माशांच्या जाती जवळपास कमी झाल्या आहेत.