शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

उजनीतील मासेमारी व्यवसायाचा अस्तित्वासाठी संघर्ष

By admin | Updated: December 27, 2016 03:02 IST

उजनी धरणाने पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्याचा कायापालट केला. धरणामुळे कृषी, उद्योगक्षेत्राला भरभराटीचे दिवस आले तशीच भरभराट मासेमारी व्यवसायाला

कळस : उजनी धरणाने पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्याचा कायापालट केला. धरणामुळे कृषी, उद्योगक्षेत्राला भरभराटीचे दिवस आले तशीच भरभराट मासेमारी व्यवसायाला आली. मात्र मासेमारी व्यवसायातील ही प्रगती वाढण्याऐवजी उजनीतील हा व्यवसाय आज अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. २००८ पासून उजनी जलाशयात मत्स्यबीजच न सोडल्याने मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १९८० ला धरणात पाणी अडवण्यास सुरवात केल्यानंतर मासेमारी व्यवसायालाही जोरात सुरुवात झाली. २००८ पर्यंत हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू होता. तेव्हा मासेमारीचे हक्क मत्स्य विभागाकडे होते. मात्र, २००८ मध्ये सुरक्षिततेच्या कारणावरून हे हक्क जलसंपदा विभागाकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाला घरघर लागली. धरणातील मासेमारीवर व्यवसायावर पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतील जवळपास ३० हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. सुरुवातीच्या काळात हमखास रोजगाराचे एक चांगले साधन म्हणून सुरू झालेल्या या व्यवसायामध्ये अलीकडच्या काळात अनेक अपप्रवृत्तीने शिरकाव केला आहे. मच्छीमारांकडून मासेमारीसाठी लहान जाळीचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे मत्स्यबीजाची शिकार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे माशांच्या पैदासीमध्येही मोठी घट झाली आहे. मत्स्यबीज न सोडल्याचा व परप्रांतीय मच्छीमारांनी केलेल्या बेकायदेशीर मासेमारीमुळे उजनीतील माशांचे उत्पादन पूर्णपणे घटून त्याचा गंभीर परिणाम यंदाच्या मासेमारी हंगामावर झाला आहे. धरण १०० टक्के भरूनही मच्छीमारांची मासेमारीसाठी सोडलेली जाळी रिकामीच निघत असल्याने मच्छीमारांच्या पदरी निराशाच आली आहे. भिगवण व इंदापूर मासळी बाजारात पूर्वी वीस टन माशांची आवक होत असते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही आवक कमी झाली आहे. २००८ नंतर मत्स्यबीजच सोडले नाही. एका वर्षात धरणामध्ये सुमारे एक कोटी मत्स्यबीज सोडणे अपेक्षित आहे. मात्र, मासेमारीचे हक्क मत्स्य विभागाकडून जलसंपदा विभागाकडे आल्यानंतर धरणामध्ये एकदाही मत्स्यबीज सोडले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. लहान जाळीतून होणारी मासेमारी, अनेक वर्षांपासून मत्स्यबीज न सोडल्याने आज धरणात मासे मिळणे मुश्कील झाले आहे. वास्तविक पाहता एका वर्षात धरणामध्ये सुमारे एक कोटी मत्स्यबीज सोडणे गरजेचे असून गत आठ वर्षांत आठ कोटी मत्स्यबीज सोडणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने केवळ नैसर्गिक पैदाशीवरच धरणातील मत्स्यसंपदा अवलंबून राहिली. त्यातही केवळ चिलापी या घाण पाण्यात वाढणाऱ्या माशाचे उजनीतील प्रमाण वाढल्याने त्याचाही फटका इतर जातीच्या माशांच्या उत्पादनास बसला आहे. उजनीत सुरुवातीला आढळणारे प्रामुख्याने वाम, मरळ, कटला, आहेर, बोदवा, शिंगी, मांगूर रोहू, शिंगटा, गुगळी, झिंगा, गवत्या असे विविध प्रकारचे चवदार मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उजनीतील चिलापीव्यतिरिक्त इतर माशांच्या जाती जवळपास कमी झाल्या आहेत.