शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

उजनीतील मासेमारी व्यवसायाचा अस्तित्वासाठी संघर्ष

By admin | Updated: December 27, 2016 03:02 IST

उजनी धरणाने पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्याचा कायापालट केला. धरणामुळे कृषी, उद्योगक्षेत्राला भरभराटीचे दिवस आले तशीच भरभराट मासेमारी व्यवसायाला

कळस : उजनी धरणाने पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्याचा कायापालट केला. धरणामुळे कृषी, उद्योगक्षेत्राला भरभराटीचे दिवस आले तशीच भरभराट मासेमारी व्यवसायाला आली. मात्र मासेमारी व्यवसायातील ही प्रगती वाढण्याऐवजी उजनीतील हा व्यवसाय आज अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. २००८ पासून उजनी जलाशयात मत्स्यबीजच न सोडल्याने मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १९८० ला धरणात पाणी अडवण्यास सुरवात केल्यानंतर मासेमारी व्यवसायालाही जोरात सुरुवात झाली. २००८ पर्यंत हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू होता. तेव्हा मासेमारीचे हक्क मत्स्य विभागाकडे होते. मात्र, २००८ मध्ये सुरक्षिततेच्या कारणावरून हे हक्क जलसंपदा विभागाकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाला घरघर लागली. धरणातील मासेमारीवर व्यवसायावर पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतील जवळपास ३० हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. सुरुवातीच्या काळात हमखास रोजगाराचे एक चांगले साधन म्हणून सुरू झालेल्या या व्यवसायामध्ये अलीकडच्या काळात अनेक अपप्रवृत्तीने शिरकाव केला आहे. मच्छीमारांकडून मासेमारीसाठी लहान जाळीचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे मत्स्यबीजाची शिकार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे माशांच्या पैदासीमध्येही मोठी घट झाली आहे. मत्स्यबीज न सोडल्याचा व परप्रांतीय मच्छीमारांनी केलेल्या बेकायदेशीर मासेमारीमुळे उजनीतील माशांचे उत्पादन पूर्णपणे घटून त्याचा गंभीर परिणाम यंदाच्या मासेमारी हंगामावर झाला आहे. धरण १०० टक्के भरूनही मच्छीमारांची मासेमारीसाठी सोडलेली जाळी रिकामीच निघत असल्याने मच्छीमारांच्या पदरी निराशाच आली आहे. भिगवण व इंदापूर मासळी बाजारात पूर्वी वीस टन माशांची आवक होत असते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही आवक कमी झाली आहे. २००८ नंतर मत्स्यबीजच सोडले नाही. एका वर्षात धरणामध्ये सुमारे एक कोटी मत्स्यबीज सोडणे अपेक्षित आहे. मात्र, मासेमारीचे हक्क मत्स्य विभागाकडून जलसंपदा विभागाकडे आल्यानंतर धरणामध्ये एकदाही मत्स्यबीज सोडले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. लहान जाळीतून होणारी मासेमारी, अनेक वर्षांपासून मत्स्यबीज न सोडल्याने आज धरणात मासे मिळणे मुश्कील झाले आहे. वास्तविक पाहता एका वर्षात धरणामध्ये सुमारे एक कोटी मत्स्यबीज सोडणे गरजेचे असून गत आठ वर्षांत आठ कोटी मत्स्यबीज सोडणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने केवळ नैसर्गिक पैदाशीवरच धरणातील मत्स्यसंपदा अवलंबून राहिली. त्यातही केवळ चिलापी या घाण पाण्यात वाढणाऱ्या माशाचे उजनीतील प्रमाण वाढल्याने त्याचाही फटका इतर जातीच्या माशांच्या उत्पादनास बसला आहे. उजनीत सुरुवातीला आढळणारे प्रामुख्याने वाम, मरळ, कटला, आहेर, बोदवा, शिंगी, मांगूर रोहू, शिंगटा, गुगळी, झिंगा, गवत्या असे विविध प्रकारचे चवदार मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उजनीतील चिलापीव्यतिरिक्त इतर माशांच्या जाती जवळपास कमी झाल्या आहेत.