शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांकडील खेटे बंद

By admin | Updated: October 13, 2015 01:10 IST

वैद्यकीय बिलांची माफी हे लोकप्रतिनिधींसाठी मतदारांपर्यंत पोहचण्याचे सोयीचे माध्यम समजले जाते.

मंगेश पांडे, पिंपरी वैद्यकीय बिलांची माफी हे लोकप्रतिनिधींसाठी मतदारांपर्यंत पोहचण्याचे सोयीचे माध्यम समजले जाते. मात्र, शासन व महापालिकेच्या योजनांमुळे बिलमाफी होत असल्याने लोकप्रतिनिधींचे महत्त्व कमी होत असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आतापर्यंत १ हजार ७०० जणांनी शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घेतला आहे. यासह महापालिका हद्दीतील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसह आता केशरी शिधापत्रिका असलेल्या रुग्णांवरही महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जात आहेत. हा लाभ घेताना संबंधितांना कोणाचीही मनधरणी करावी लागत नाही. दरम्यान, शासनाने लागू केलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना अनेकांसाठी फायदेशीर ठरत आहे. १ मे २०१४ला ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेत ९७२ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. काही कागदपत्रे रुग्णालयास सादर केल्यानंतर रुग्णास त्याचा लाभ मिळतो व मोफत उपचार केले जातात. वायसीएम रुग्णालयामार्फत आता पर्यंत १ हजार ७०० रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत.सामान्य नागरिकाला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक संरक्षण हवे असते. घरात कोणी आजारी पडल्यास त्याच्या उपचारासाठी खर्च करताना आर्थिक नियोजन बिघडते. पैसा खर्च होत असला, तरी उपचार करणेही गरजेचे असते. अशा वेळी वैद्यकीय बिल माफ होण्याची अथवा सवलत मिळण्याची संबंधितांची अपेक्षा असते. रुग्णाला ‘डिस्चार्ज’ देताना भरमसाठ बिल हातात पडणार असल्याची कल्पना नातेवाइकांना असते. हे बिल कमी व्हावे, अशी अपेक्षा बाळगून नातेवाईक लोकप्रतिनिधींकडे हेलपाटे मारत असतात. नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याकडे गेल्यास त्यांच्याकडून टाळाटाळ केली जाते. मात्र, मतांच्या जोगव्यासाठी ते पुन्हा पुढाकार घेतात. सर्व आपणच केले आहे, असे चित्र निर्माण करत असतात. त्यामुळेच रुग्ण उपचार घेत असताना त्याचे नातेवाईक मात्र नगरसेवकाच्या घरी अथवा कार्यालयात असतात. या योजनेंतर्गत रुग्णांवर करण्यात आलेला खर्चाचा अहवाल शासनाकडे पाठविला जातो. त्यानंतर शासन या खर्चाची रक्कम महापालिकेला अदा करते. या अंतर्गत अद्यापपर्यंत सुमारे दोन कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना यासह महापालिका हद्दीतील पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना असलेली पूर्ण बिलमाफी याचा अनेक रुग्णांना फायदा होत आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या रुग्णांना मोठा हातभार लागत आहे. - मनोज देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, वायसीएम रुग्णालय पूर्वी केवळ पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना सवलत मिळत होती. मात्र, गेल्या वर्षीपासून केशरी शिधापत्रिकाधारकांनाही ही सुविधा लागू झाली आहे. त्यातच केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे अधिकाधिक जणांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र, यामुळे नागरिकांना लोकप्रतिनिधींकडे जाण्याची गरज भासत नाही. रुग्णालयात रुग्ण दाखल असताना लोकप्रतिनिधी बिलमाफीसाठी रुग्णालयात जाऊन बिलमाफी आलो असल्याचे चित्र निर्माण करतात. यामुळे नागरिकांनादेखील काही प्रमाणात समाधान वाटते आणि नगरसेवकांचाही ‘चमकोपणा’ होतो.