शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

रस्त्यावरची गुंडगिरी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रसंग मध्यरात्रीचा एका चौकातील. एक कार सिग्नलला थांबते. दुचाकीवरुन काही टपोरी तरुण कारजवळ येऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रसंग मध्यरात्रीचा एका चौकातील. एक कार सिग्नलला थांबते. दुचाकीवरुन काही टपोरी तरुण कारजवळ येऊन काहीतरी कारण सांगून त्याला खाली उतरायला सांगून धमकाविण्यास सुरुवात करतात. पण चालक वेळीच पुढचा धोका ओळखून सिग्नल तोडून कार पुढे दामटतात. हे तरुण त्यांचा पाठलाग सुरु करतात. ते पाहून कारचालक एका पोलीस चौकीत शिरतात. मध्यरात्रीच्या वेळी पोलीस चौकीत कोणी नव्हते. हे तरुण तो कधी बाहेर येईल याची वाट पहात बाहेर घिरट्या घालू लागतात. पण तासाभरानंतरही पोलीस चौकीत कोणीही फिरकत नाही. या तरुणांना चौकीत कोणी नाही, हे न समजल्याने शेवटी ते निघून जातात.

असे प्रसंग शहरात ठिकठिकाणी घडताना दिसत आहेत. अनेकांना काही तरी कारण सांगून मारहाण करुन लुटले जात आहे. शिवाजी रोडवर निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करुन लुटले होते. स्वारगेट बसस्थानकावर प्रतिकार केल्याने एकाचा खून करण्यात आला. रात्री-अपरात्री बाहेरगावाहून येणाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुखापतीच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय असंख्य गुन्हे तर पोलिसांपर्यंत पोहचत नाही. रस्त्यावर रात्री अपरात्री घडणारी ही गुन्हेगारी रोखणे व नागरिकांना दिलासा देणे हे शहर पोलिसांसमोरील नव्या वर्षातील मोठे आव्हान असणार आहे.

लॉकडाऊनमुळे जवळपास चार महिने गुन्ह्यांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे २०२० मधील गुन्ह्यांची तुलना २०१९ शी केल्यास शहरातील गुन्हेगारी कमी झाली असा समज होऊ शकतो. सुदैवाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर स्पष्टपणे सांगितले होते की, अनेकदा आकडेवारी ही फसवी असते. त्यावर आपण जास्त अवलंबून रहात नाही.

ऑनलाईन व्यवहार वाढल्याने शहरातील सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर गुन्ह्यांचा तपास हा काहीचा जिकरीचा आणि वेळखाऊ असतो. शिवाय हे गुन्हेगार जगाच्या पाठीवर कोठेही बसून गुन्हे करत असतात. त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे काम अधिक वेगाने करुन गुन्हे उघडकीस आणणे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

चौकट

नव्या वर्षात शहरात मेट्रो सुरु होण्याची शक्यता आहे. मेट्रोमुळे शहरातील रस्ते वाहतूकीची कोंडी काही प्रमाणात तरी कमी होण्याची अपेक्षा आहे. त्याचा आत्ताच विचार करुन त्यानुसार पुढील २० ते २५ वर्षाचे नियोजन वाहतूक पोलिसांना, महापालिका, पीएमआरडीए यांच्यासमवेत करावे लागणार आहे. नाही तर संपूर्ण पुण्यातली वाहतूक कोंडी दिवसेंदिवस जीवघेणी होण्याचा धोका आहे.