शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

इतरांना गप्प करण्याआधी ‘सेलिब्रिटीं’नी उघडावे तोंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “शेतकरी हे आपले शत्रू नव्हेत. ते परदेशातील लोक नसून याच देशाचे नागरिक आणि आपले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “शेतकरी हे आपले शत्रू नव्हेत. ते परदेशातील लोक नसून याच देशाचे नागरिक आणि आपले अन्नदाते असल्याचा बहुदा केंद्र सरकारला विसर पडला आहे. बाहेरच्या देशातील लोकांना आंदोलनाबाबत बोलू नका, असे सांगण्याआधी सेलिब्रिटींनी स्वत: बोलते झाले पाहिजे. तुम्हाला कोणी अडवलेय? इतके दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. हा देशाचा अंतर्गत प्रश्न आहे, हे बरोबर आहे. त्यावर आधी तुम्ही बोलते व्हा आणि मग इतरांना अडवा. शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रहा,” असे आवाहन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांची भेट घेतल्यानंतर भुजबळ गुुरुवारी (दि.४) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद आणि शिवसेनेकडे विधानसभेचे अध्यक्षपद याबाबत केवळ चर्चा आहे. ज्यावेळी चर्चा थांबेल, तेव्हाच खरे ते काय बाहेर येईल. कविता राऊत यांच्याबाबत राज्यपाल म्हणाले ते योग्य आहे. राऊत यांना काही कागदपत्रांची पूर्तता करायची होती. ती त्या करत आहेत.

धनंजय मुंडे प्रकरणावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, “मुंडे यांच्या विरोधात पुन्हा तक्रार करण्यात आली आहे. पण या आधीदेखील जी तक्रार देण्यात आली होती, ती पुन्हा मागे घेण्यात आली. त्या महिलेच्या विरोधातच अनेकांनी तक्रारी दिल्या.”

चौकट

शर्जिल चुकलाच पण...

“शर्जिल उस्मानीने हिंदू समाजाबाबत वापरलेले शब्द चुकीचे होते. आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतो. पण याचा अर्थ कोणाच्या भावना दुखावणे असा होत नाही,” असे छगन भुजबळ म्हणाले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावर मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकते, असे ते म्हणाले. ‘ते पक्षात येणार का,’ हे मुनगंटीवारांना विचारा, असा चिमटा त्यांनी काढला.