शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

'...कारण आता माझं वय देखील ८४ झालं आहे", शरद पवार यांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 19:50 IST

'वय झालं म्हणून थकायचं नाही, वय झालं म्हणून विचार सोडायचा नाही. आपण चालत राहू एवढीच खूणगाठ बांधा'

बारामती - 'आता ज्येष्ठांच्या ओळीत मी पण बसतो, कारण आता माझं वय ८४  झालं आहे. जेष्ठ नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत. ज्येष्ठ नागरिकांचा मोठा वर्ग असून देशाच्या उभारणीत यांचा मोठा वाटा आहे. नव्या पिढीला ज्ञान देणारे घटक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी व्यक्त केले . रविवारी (दि. १०)सायंकाळी ते बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अनौपचारिक कार्यकमात बोलत होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरीकांसमवेत संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पवार पुढे म्हणाले, वय वाढले हे ठीक आहे, परंतू वय वाढलं आणि आपण जेष्ठत्वाकडे झुकलो तरी कदाचित आपले पाय दुखतील, गुडघे दुखतील, दात दुखतील, पण त्याचा आपल्या डोक्यावर परिणाम होत नाही, म्हणजेच मेंदूवर परिणाम होत नाही. हा मेंदू जोपर्यंत सशक्त आहे, तोपर्यंत आपल्याला या वय वाढण्याचे, चिंता करण्याचे कारण नाही. जेष्ठ नागरिक हे समाजाचा ठेवा आहेत. तो ठेवा असाच जपण्याची गरज आहे, असं मत पवार यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, आपल्याकडे आधी कापसाच्या जिनिंग मिल होत्या, तसंच अनेक गुऱ्हाळे होती. त्यानंतर जाचक, घोलप माझे वडील असतील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर सोमेश्वर कारखाना मुकुटराव काकडे यांनी स्थापन केला, त्यानंतर माळेगाव कारखाना सुरू झाला आणि या दरम्यानच्या काळामध्ये येथील गुऱ्हाळे गेली आणि कारखानदारी वाढीस लागली आणि इथून सगळे परिस्थिती बदलण्यास सुरवात झाल्याचे पवार म्हणाले.

सुरुवातीला फक्त एम.ई.एस संस्थेची शाखा होती. त्यानंतरच्या काळामध्ये विद्या प्रतिष्ठान शारदानगरचे कृषी विकास प्रतिष्ठान त्यानंतर माळेगावचं इंजिनिअरिंग कॉलेज, सोमेश्वरचे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले आणि शिक्षणाने परिस्थिती बदलली. पुण्यानंतर ज्ञानाचे केंद्र बारामती हे झाले. त्यानंतर आपण येथे एमआयडीसी सुरू केली. प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी सुरू झाल्याची आठवण पवार यांनी सांगितली.

तो काळ असा होता की समोर कोणीही आले तर त्याचे नाव माहिती असायचे, आता  टक्के लोक ओळखू येत नाहीत. कारण अनेक लोक इथे बाहेरून आले त्यांनी बारामतीला आपले मानले आणि बारामतीचा लौकिक वाढवला. तिथे स्थायिक झाले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बारामतीचे योगदान मोठे आहे. माझा जन्म झाला तेव्हा स्वातंत्र्यलढा सुरू होता, त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात माझे योगदान नाही, मात्र स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेली खूप मोठी माणसे या ठिकाणी असल्याचे पवार म्हणाले. मोरोपंतांनी विपुल लेखन केलं, केकावली लिहिली. श्रीधर स्वामींनी इथल्याच कसब्यातल्या मंदिरात शिवलीलामृत ग्रंथ लिहिला, बारामतीचे योगदान खूप मोठं आहे. हे मोठं योगदान आपण नव्या पिढीला शिकवलं पाहिजे’, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

....वय झालं म्हणून थकायचं नाही

बारामतीनगरी राज्यामध्ये आणि देशामध्ये आदर्श नगरी म्हणून मान्यता पावली आहे. तुम्हा लोकांच्या कष्टामुळे हा तालुका नावारूपाला आला आहे. मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. वय वाढलं की त्याचा परिणाम गुडघ्यांवर होईल,पायांवर होईल पण डोक्यावर होणार नाही. त्यामुळे वय झालं म्हणून थकायचं नाही, वय झालं म्हणून विचार सोडायचा नाही. आपण चालत राहू एवढीच खूणगाठ बांधा ,असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.  

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण