शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

बारामतीचा ‘आवाज’ पुण्याहूनही जास्त

By admin | Updated: September 10, 2015 04:14 IST

दर वर्षी नव्याने रस्त्यावर येणारी २० ते ३० हजार वाहने तसेच रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन नसल्याने वारंवार होणारी वाहतूककोंडी यामुळे बारामती शहरातील ध्वनिप्रदूषणाने

- सुनील राऊत, बारामतीदर वर्षी नव्याने रस्त्यावर येणारी २० ते ३० हजार वाहने तसेच रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन नसल्याने वारंवार होणारी वाहतूककोंडी यामुळे बारामती शहरातील ध्वनिप्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. विशेष म्हणजे हे ध्वनिप्रदूषण पुणे शहरापेक्षाही जास्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार, शहरातील रहिवासी तसेच शांतता क्षेत्रातील ध्वनीची पातळी सरासरी ९० डेसिबल आहे; तर पुणे शहराची हीच पातळी सरासरी ७५ डेसिबल आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणात बारामती शहराने पुणे शहराला मागे टाकले आहे. देशात राजकीय अशांततेचे वादळ उठविणारे शहर म्हणून बारामती शहराची ख्याती आहे. मात्र, ध्वनिप्रदूषणात बारामती शहराचीच शांतता भंग झाली आहे. शहर पोलिसांच्या वतीने दहीहंडी उत्सवात शहरात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली होती. दहीहंडीच्या एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी (दि. ५) या यंत्रणेच्या माध्यमातून शहरातील प्रमुख चौकांमध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या काळात ध्वनिपातळी मोजण्यात आली आहे. त्या मोजणीत रहिवासी क्षेत्र तसेच शांतता क्षेत्रात आवाजाची मर्यादा सरासरी ९० ते ९८ डेसिबलपर्यंत नोंदविण्यात आली आहे. प्रदूषण नियामक मंडळाच्या मानकानुसार, दिवसा ही ध्वनिपातळी शांतता क्षेत्रासाठी ५० डेसिबल, तर रहिवासी क्षेत्रासाठी ५५ डेसिबल असणे आवश्यक आहे. मात्र, बारामती शहरात ही ध्वनिपातळी त्यापेक्षा जवळपास १ पटीने अधिक आहे. शांतता क्षेत्रे आहेत तरी कुठे?ध्वनिप्रदूषण मानकांनुसार, शैक्षणिक संस्था, न्यायालये तसेच रुग्णालयांच्या परिसरात १०० मीटरच्या परिसर शांतता क्षेत्र असणे बंधनकारक आहे. त्यासाठीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. त्यानुसार, बारामती नगर परिषदेने अशा ठिकाणी शांतता क्षेत्रांचे फलक लावणे आवश्यक असून त्या ठिकाणी आवाज होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. मात्र, नगर परिषदेकडून अशा ठिकाणी फलकच लावले जात नसल्याचे दिसून येते. याउलट शहरात सण, उत्सव तसेच इतर राजकीय अथवा खासगी कार्यक्रमांच्यासाठी नगर परिषदेकडून तसेच पोलिसांकडून शांतता क्षेत्राच्या परिसरातच सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली जात असल्याचे दिसून येते.रहिवासी क्षेत्राला प्रदूषणाचा विळखा शहरांमधील ध्वनिप्रदूषणांबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण) नियम २००० ची अंमलबजावणी सर्व नागरी क्षेत्रांमध्ये करण्याचे आदेश दिलेले आहेत.