शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

बारामती शहर विकास आराखड्यात दडलीत ‘आरक्षणे’

By admin | Updated: January 12, 2016 03:56 IST

बारामतीच्या वाढीव हद्दीतील विकास आराखड्याची उत्सुकता वाढलेली आहे. नगररचना खात्याने विकास आराखड्याचा बंद लखोटा नगरपालिकेला दिला आहे.

बारामती : बारामतीच्या वाढीव हद्दीतील विकास आराखड्याची उत्सुकता वाढलेली आहे. नगररचना खात्याने विकास आराखड्याचा बंद लखोटा नगरपालिकेला दिला आहे. त्याला दि. १६ जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. नगरपालिकेने आराखडा खुला केल्यानंतर त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत. हरकती सूचनांसाठी नियुक्त केलेल्या नियोजन समितीच्या अहवालानंतरच अंतिम विकास आराखडा मंजुरीसाठी शासनाला पाठविण्यात येणार आहे. विकास आराखड्याबाबत राजकीय द्वंद्व सुरू असताना नगरपालिकेने १६ जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये सादर झालेल्या आराखड्याला मंजुरी देण्यात येणार आहे. आराखडा नागरिकांसाठी खुला झाल्यावर त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत. या हरकती सूचना नगरपालिकेकडे देण्याची मुभा नागरिकांना आहे. बारामती ग्रामीण, रुई, जळोची, तांदूळवाडी या गावांचा समावेश २०१२ मध्ये बारामतीच्या हद्दीत झाला. बारामती शहराचा विस्तार वाढला. वाढीव हद्दीत कोट्यवधी रुपयांची विकासकामे सध्या सुरू आहेत. या सर्व भागांत जमिनींचे दर मोठ्या प्रमाणात आहेत. नगरपालिकेच्या हद्दीत जाण्यापूर्वी अनेक बड्या मंडळींनी गुंतवणूक म्हणून या भागात जमिनी घेतल्या आहेत. आता विकास आराखड्यातील तरतुदीनुसार सार्वजनिक वापरासाठी पडलेल्या आरक्षणांची उत्सुकताच सर्वांना आहे. मागील दोन वर्षांत या भागातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारदेखील विकास आराखडा सादर असल्यामुळे ठप्प आहेत. अनेक जमिनी खरेदी-विक्रीतील व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ग्राहक कमी दराने भूखंडाची मागणी करीत आहेत. २००६ ते २०१२ पर्यंत या भागात ५ लाखांपासून ते ३० लाखांपर्यंत गुंठ्याला मागणी होती. आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्याचा फटका ‘रिअल इस्टेट’ व्यावसायिकांना बसला आहे. याच पार्श्वभूमीवर वाढीव हद्दीतील विकास आराखडा सादर होणार असल्यामुळे संभाव्य आरक्षणाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.हरकतींवर समिती घेते निर्णयनगररचना खात्याच्या वतीने बारामतीच्या वाढीव हद्दीचा विकास आराखडा तयार केला आहे. तो नगरपालिकेला सादर केला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरी घेतली जाते. त्यानंतर नागरिकांसाठी हा आराखडा खुला करण्यात येईल. त्यावर हरकती सूचना मागविल्या जातील. या आलेल्या हरकती सूचनांवर निर्णय घेण्यासाठी राज्य शासन ७ जणांची नियोजन समिती नियुक्ती करते, असे नगररचना विभागाचे नगर रचनाकार दत्तात्रय काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.हरकतदाराने घेतलेल्या हरकतींवर निर्णय घेण्याचा अधिकार या समितीला आहे. मात्र, तरतूद केलेली आरक्षणे बदलली तरी त्याला पर्यायी ठिकाणी आरक्षण टाकले जाते. या समितीमध्ये नगरपालिकेच्या स्थायी समितीचे ३ सदस्य, शासनाचे ४ प्रतिनिधी, त्यामध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या समितीने हरकती सूचनांवर घेतलेल्या निर्णयाच्या अहवालासह नगरपालिका पुन्हा सर्वसाधारण सभेत मंजुरी देते. त्यानंतर हा अंतिम अहवाल राज्य शासनाला मंजुरीसाठी पाठविण्यात येतो. त्यानुसार कार्यवाही होईल.