शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

बारामती शहर विकास आराखड्यात दडलीत ‘आरक्षणे’

By admin | Updated: January 12, 2016 03:56 IST

बारामतीच्या वाढीव हद्दीतील विकास आराखड्याची उत्सुकता वाढलेली आहे. नगररचना खात्याने विकास आराखड्याचा बंद लखोटा नगरपालिकेला दिला आहे.

बारामती : बारामतीच्या वाढीव हद्दीतील विकास आराखड्याची उत्सुकता वाढलेली आहे. नगररचना खात्याने विकास आराखड्याचा बंद लखोटा नगरपालिकेला दिला आहे. त्याला दि. १६ जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. नगरपालिकेने आराखडा खुला केल्यानंतर त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत. हरकती सूचनांसाठी नियुक्त केलेल्या नियोजन समितीच्या अहवालानंतरच अंतिम विकास आराखडा मंजुरीसाठी शासनाला पाठविण्यात येणार आहे. विकास आराखड्याबाबत राजकीय द्वंद्व सुरू असताना नगरपालिकेने १६ जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये सादर झालेल्या आराखड्याला मंजुरी देण्यात येणार आहे. आराखडा नागरिकांसाठी खुला झाल्यावर त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत. या हरकती सूचना नगरपालिकेकडे देण्याची मुभा नागरिकांना आहे. बारामती ग्रामीण, रुई, जळोची, तांदूळवाडी या गावांचा समावेश २०१२ मध्ये बारामतीच्या हद्दीत झाला. बारामती शहराचा विस्तार वाढला. वाढीव हद्दीत कोट्यवधी रुपयांची विकासकामे सध्या सुरू आहेत. या सर्व भागांत जमिनींचे दर मोठ्या प्रमाणात आहेत. नगरपालिकेच्या हद्दीत जाण्यापूर्वी अनेक बड्या मंडळींनी गुंतवणूक म्हणून या भागात जमिनी घेतल्या आहेत. आता विकास आराखड्यातील तरतुदीनुसार सार्वजनिक वापरासाठी पडलेल्या आरक्षणांची उत्सुकताच सर्वांना आहे. मागील दोन वर्षांत या भागातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारदेखील विकास आराखडा सादर असल्यामुळे ठप्प आहेत. अनेक जमिनी खरेदी-विक्रीतील व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ग्राहक कमी दराने भूखंडाची मागणी करीत आहेत. २००६ ते २०१२ पर्यंत या भागात ५ लाखांपासून ते ३० लाखांपर्यंत गुंठ्याला मागणी होती. आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्याचा फटका ‘रिअल इस्टेट’ व्यावसायिकांना बसला आहे. याच पार्श्वभूमीवर वाढीव हद्दीतील विकास आराखडा सादर होणार असल्यामुळे संभाव्य आरक्षणाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.हरकतींवर समिती घेते निर्णयनगररचना खात्याच्या वतीने बारामतीच्या वाढीव हद्दीचा विकास आराखडा तयार केला आहे. तो नगरपालिकेला सादर केला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरी घेतली जाते. त्यानंतर नागरिकांसाठी हा आराखडा खुला करण्यात येईल. त्यावर हरकती सूचना मागविल्या जातील. या आलेल्या हरकती सूचनांवर निर्णय घेण्यासाठी राज्य शासन ७ जणांची नियोजन समिती नियुक्ती करते, असे नगररचना विभागाचे नगर रचनाकार दत्तात्रय काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.हरकतदाराने घेतलेल्या हरकतींवर निर्णय घेण्याचा अधिकार या समितीला आहे. मात्र, तरतूद केलेली आरक्षणे बदलली तरी त्याला पर्यायी ठिकाणी आरक्षण टाकले जाते. या समितीमध्ये नगरपालिकेच्या स्थायी समितीचे ३ सदस्य, शासनाचे ४ प्रतिनिधी, त्यामध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या समितीने हरकती सूचनांवर घेतलेल्या निर्णयाच्या अहवालासह नगरपालिका पुन्हा सर्वसाधारण सभेत मंजुरी देते. त्यानंतर हा अंतिम अहवाल राज्य शासनाला मंजुरीसाठी पाठविण्यात येतो. त्यानुसार कार्यवाही होईल.