शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

भाजीपाल्याबरोबरच द्राक्षांना हवी बांगलादेशापर्यंत रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : द्राक्ष निर्यातदारांना बांगलादेशात द्राक्षे पोहोचवण्यासाठी रेल्वेची आवश्यकता आहे. त्यासाठी नाशिकमधील द्राक्ष बागायतदार व बांगला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : द्राक्ष निर्यातदारांना बांगलादेशात द्राक्षे पोहोचवण्यासाठी रेल्वेची आवश्यकता आहे. त्यासाठी नाशिकमधील द्राक्ष बागायतदार व बांगला देशातील व्यापाऱ्यांमध्ये नुकतीच संयुक्त चर्चा झाली असून आता भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर यासंदर्भात बैठक होणार आहे.

बांगलादेशात सध्या भारतातून भाजीपाल्यासाठी रेल्वे जाते, मात्र ती आठवड्यातून फक्त दोनच दिवस आहे. द्राक्ष बागायतदारांना ती रोज हवी आहे. बांगलादेशात द्राक्ष हंगामात ३० ते ४० हजार टन द्राक्ष जातात. बहुतेक द्राक्षे नाशिक जिल्ह्यातील आहेत. सध्या नाशिकची द्राक्षे कोलकात्याहून रस्तेमार्गे बांगलादेशात पाठवली जातात. यात नाशिकमधील व्यापाऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळेच नाशिकमधील व्यापाऱ्यांनी थेट रेल्वे उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.

राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी कैलास भोसले यांनी सांगितले की, नाशकातले व्यापारी व बांगलादेशातील व्यापाऱ्यांची याबाबत नुकतीच एक बैठक झाली. आता रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे. याच हंगामात द्राक्षासाठी रेल्वे मिळावी, असा प्रयत्न आहे. कृषी निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले की, केंद्र सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. अशी रेल्वे सुरू झाल्यास द्राक्ष उत्पादकांचा फायदाच आहे. सुरुवातीला द्राक्षे व त्यानंतर केळी व अन्य फळांच्या निर्यातीसाठीही याचा चांगला उपयोग होऊ शकतो.