शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

भाजीपाल्याबरोबरच द्राक्षांना हवी बांगलादेशापर्यंत रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : द्राक्ष निर्यातदारांना बांगलादेशात द्राक्षे पोहोचवण्यासाठी रेल्वेची आवश्यकता आहे. त्यासाठी नाशिकमधील द्राक्ष बागायतदार व बांगला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : द्राक्ष निर्यातदारांना बांगलादेशात द्राक्षे पोहोचवण्यासाठी रेल्वेची आवश्यकता आहे. त्यासाठी नाशिकमधील द्राक्ष बागायतदार व बांगला देशातील व्यापाऱ्यांमध्ये नुकतीच संयुक्त चर्चा झाली असून आता भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर यासंदर्भात बैठक होणार आहे.

बांगलादेशात सध्या भारतातून भाजीपाल्यासाठी रेल्वे जाते, मात्र ती आठवड्यातून फक्त दोनच दिवस आहे. द्राक्ष बागायतदारांना ती रोज हवी आहे. बांगलादेशात द्राक्ष हंगामात ३० ते ४० हजार टन द्राक्ष जातात. बहुतेक द्राक्षे नाशिक जिल्ह्यातील आहेत. सध्या नाशिकची द्राक्षे कोलकात्याहून रस्तेमार्गे बांगलादेशात पाठवली जातात. यात नाशिकमधील व्यापाऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळेच नाशिकमधील व्यापाऱ्यांनी थेट रेल्वे उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.

राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी कैलास भोसले यांनी सांगितले की, नाशकातले व्यापारी व बांगलादेशातील व्यापाऱ्यांची याबाबत नुकतीच एक बैठक झाली. आता रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे. याच हंगामात द्राक्षासाठी रेल्वे मिळावी, असा प्रयत्न आहे. कृषी निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले की, केंद्र सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. अशी रेल्वे सुरू झाल्यास द्राक्ष उत्पादकांचा फायदाच आहे. सुरुवातीला द्राक्षे व त्यानंतर केळी व अन्य फळांच्या निर्यातीसाठीही याचा चांगला उपयोग होऊ शकतो.