शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

१६१ उद्यानांचा ‘भार’ २८५ जणांवरच

By admin | Updated: May 16, 2015 04:34 IST

सुमारे १६१ उद्याने, ५०८ एकर जागा... कर्मचारी मात्र अवघे २८५. त्यातील जवळपास ५० ते ६० कर्मचारी दररोज सुटीवर... ही अवस्था आहे पुणे महापालिकेच्या

सुनील राऊत, पुणेसुमारे १६१ उद्याने, ५०८ एकर जागा... कर्मचारी मात्र अवघे २८५. त्यातील जवळपास ५० ते ६० कर्मचारी दररोज सुटीवर... ही अवस्था आहे पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाची. गेल्या काही वर्षांपासून बंगळुरूपाठोपाठ देशात सर्वाधिक उद्याने असलेले शहर म्हणून पुणे विकसित होत असले, तरी, या उद्यानांच्या दैनंदिन देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी महापालिकेकडे मनुष्यबळच नसल्याने या उद्यानांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. परिणामी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली अनेक उद्याने केवळ कागदवरच राहिली असून, त्या ठिकाणी केवळ मैदानेच असल्याचा भास व्हावा, अशी अवस्था झाली आहे. तर या कर्मचाऱ्यांकडे केवळ उद्यानांचीच जबाबदारी नाही तर, शहरातील रस्ता दुभाजक आणि वाहतूक बेटांचीही जबाबदारी असल्याने उद्यानांकडे दुर्लक्ष होत आहे.गरज ९६१ कर्मचाऱ्यांची! गेल्या दशकापासून शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे केवळ ६० ते ७० असलेल्या उद्यानांची संख्या तब्बल १६१ च्या घरात पोहोचली आहे. गार्डन अ‍ॅन्ड पार्कच्या निकषांनुसार, उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीच्या एक एकर क्षेत्रासाठी दोन मजुरांची आवश्यकता असते. तर रस्त्यावरील दुभाजक आणि वाहतूक बेटांसाठी १ हजार चौरस मीटर क्षेत्रासाठी एक मजूर आवश्यक असतो. पण महापालिकेच्या उद्यान विभागाचा विस्तार पाहता अवघे २५ टक्केच मनुष्यबळ पालिकेकडे आहे. निकषांनुसार, महापालिकेस उद्यानांसाठी ९६१ कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात २८५ कर्मचारीच आहेत. त्यातील अनेक कर्मचारी निवृत्तीच्या मार्गावर असून, नव्या सेवा नियमावलीनुसार, ही रिक्त पदे भरणे अशक्य आहे. त्यामुळे उद्यान विभागास ठेकेदार स्वरूपात कर्मचारी भरावे लागतात.ठेकेदार नेमूनही संख्याबळ अपुरेच महापालिकेकडे उपलब्ध असलेली कर्मचारी संख्या पाहता, पालिकेस आणखी ६७६ कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याने उद्यान विभागास अंदाजपत्रकात दिलेल्या निधीतून केवळ २०० ते २५० कर्मचारी घेता येतात. त्यामुळे दरदिवशी जवळपास आणखी ४५० कर्मचाऱ्यांची गरज उद्यान विभागास भासते. एवढ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची झाल्यास पालिकेच्या अंदाजपत्रकात मोठी तरतूद करणे आवश्यक आहे. मात्र, ती होताना दिसत नाही. उद्यानांच्या निर्मितीसाठी आणि विकासासाठी पुढाकार घेतला जातो. मात्र, त्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे उद्यानांची दुरवस्था होते. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.