शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पदवीपेक्षा कौशल्यविकासाला तरुणांनी दिले महत्त्व

By admin | Updated: September 7, 2015 04:26 IST

महाविद्यालयात प्रवेश घेतला, अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी प्रमाणपत्र मिळाले, त्यानंतर कोठे तरी नोकरी मिळवायची, एवढाच उद्देश न ठेवता शिक्षण घेतो

संजय माने, पिंपरीमहाविद्यालयात प्रवेश घेतला, अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी प्रमाणपत्र मिळाले, त्यानंतर कोठे तरी नोकरी मिळवायची, एवढाच उद्देश न ठेवता शिक्षण घेतो, ते परिपूर्ण कौशल्याचे असावे, असे ध्येय निश्चित करून कौशल्य पणाला लावलेल्या पिंपरी-चिंचवडमधील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांनी स्पर्धेसाठी मोटार तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सलग दोन वर्षे यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा हा यंदाचा तिसरा प्रकल्प आहे. सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसएइ) या संस्थेच्या पुढाकाराने दर वर्षी इंदोर येथील पितांपूरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात येते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारे विद्यार्थी देशभरातून या स्पर्धेत सहभागी होतात. त्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण करतात. सुमारे ४०० प्रकल्पांतून १२० प्रकल्पांची निवड केली जाते. त्यात सलग दोन वर्षे निवड झालेल्या आणि यशस्वी कामगिरी केलेल्या हिंजवडीतील अलार्ड इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या वर्षी स्पर्धेत उतरण्याची जय्यत तयारी केली आहे. चुरस, स्पर्धा, यश, पारितोषिक हे टप्पे महत्त्वाचे मानले गेले, तरी त्या पलीकेडे ज्ञान मिळवितो, ते कौशल्यपूर्ण असावे, हा उद्देश बाळगलेले विद्यार्थी अभ्यासाबरोबर कौशल्यगुण विकासाला अधिक महत्त्व देत आहेत. काळेवाडीतील एका सोसायटीत त्यांचे मोटार जोडणीचे काम सुरू आहे. काळेवाडीतील एका गृहसंस्थेत यातील काही विद्यार्थी सदनिका भाड्याने घेऊन राहतात. त्या ठिकाणी ते प्रकल्पाचे काम करीत आहेत. वर्क्सशॉपमध्ये जाऊन वेल्डिंग, ग्राइंडिंगची कामे करून घेतली जातात. मोटारीचे आवश्यक ते सर्व सुटे भाग हे विद्यार्थी स्वत:च तयार करतात. २३ जणांचा गट या प्रकल्पासाठी राबतो आहे. प्रकल्पाचा उपकप्तान असलेला प्रदीप अकोलकर म्हणाला, ‘‘वेगवेगळ्या भागांतून पुण्यात शिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी आलेले विद्यार्थी केवळ पदवी घेऊन बसणार असतील, तर उपयोग काय? जे शिकतो आहे, ते अगदी मनापासून करायचे.’’