शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पदवीपेक्षा कौशल्यविकासाला तरुणांनी दिले महत्त्व

By admin | Updated: September 7, 2015 04:26 IST

महाविद्यालयात प्रवेश घेतला, अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी प्रमाणपत्र मिळाले, त्यानंतर कोठे तरी नोकरी मिळवायची, एवढाच उद्देश न ठेवता शिक्षण घेतो

संजय माने, पिंपरीमहाविद्यालयात प्रवेश घेतला, अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी प्रमाणपत्र मिळाले, त्यानंतर कोठे तरी नोकरी मिळवायची, एवढाच उद्देश न ठेवता शिक्षण घेतो, ते परिपूर्ण कौशल्याचे असावे, असे ध्येय निश्चित करून कौशल्य पणाला लावलेल्या पिंपरी-चिंचवडमधील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांनी स्पर्धेसाठी मोटार तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सलग दोन वर्षे यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा हा यंदाचा तिसरा प्रकल्प आहे. सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसएइ) या संस्थेच्या पुढाकाराने दर वर्षी इंदोर येथील पितांपूरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात येते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारे विद्यार्थी देशभरातून या स्पर्धेत सहभागी होतात. त्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण करतात. सुमारे ४०० प्रकल्पांतून १२० प्रकल्पांची निवड केली जाते. त्यात सलग दोन वर्षे निवड झालेल्या आणि यशस्वी कामगिरी केलेल्या हिंजवडीतील अलार्ड इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या वर्षी स्पर्धेत उतरण्याची जय्यत तयारी केली आहे. चुरस, स्पर्धा, यश, पारितोषिक हे टप्पे महत्त्वाचे मानले गेले, तरी त्या पलीकेडे ज्ञान मिळवितो, ते कौशल्यपूर्ण असावे, हा उद्देश बाळगलेले विद्यार्थी अभ्यासाबरोबर कौशल्यगुण विकासाला अधिक महत्त्व देत आहेत. काळेवाडीतील एका सोसायटीत त्यांचे मोटार जोडणीचे काम सुरू आहे. काळेवाडीतील एका गृहसंस्थेत यातील काही विद्यार्थी सदनिका भाड्याने घेऊन राहतात. त्या ठिकाणी ते प्रकल्पाचे काम करीत आहेत. वर्क्सशॉपमध्ये जाऊन वेल्डिंग, ग्राइंडिंगची कामे करून घेतली जातात. मोटारीचे आवश्यक ते सर्व सुटे भाग हे विद्यार्थी स्वत:च तयार करतात. २३ जणांचा गट या प्रकल्पासाठी राबतो आहे. प्रकल्पाचा उपकप्तान असलेला प्रदीप अकोलकर म्हणाला, ‘‘वेगवेगळ्या भागांतून पुण्यात शिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी आलेले विद्यार्थी केवळ पदवी घेऊन बसणार असतील, तर उपयोग काय? जे शिकतो आहे, ते अगदी मनापासून करायचे.’’