शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

शहरात नियोजनाअभावी पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 03:21 IST

नदीतून पाणी उचलण्याची महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

पिंपरी : पवना धरणातून रावेतच्या नदीत पाणी सोडले जाते. पिंपरी-चिंचवड शहराला आरक्षणानुसार पाणी सोडले जाते. मात्र, नदीतून पाणी उचलण्याची महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.महापालिकेला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत आणि रावेत येथील बंधाºयातून उपसा केंद्राद्वारे पाणी उचलले जाते. रावेतमधील पाणी पातळी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेला असलेल्या आरक्षणानुसार ८५० एमएलडी ते ११०० एमएलडी पाणी सोडले जाते.रावेत बंधाºयातील पाण्याची पातळी कमी झाली किंवा रावेत येथील उपसा केंद्राच्या कामासाठी आठवड्यातून एकदा अघोषितपणे म्हणजेच गुरुवारी पाणीकपात केली जाते. दोन दिवसांपूर्वी रावेत बंधाºयातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. दर बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा येणार नाही, असे प्रकटन दिले जाते.मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. रावेत येथील बंधाºयातून महापालिका पाण्याचा उपसा करते. पाणी शुद्ध करून शहरवासीयांनी पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाणी सोडले जात असले, तरी प्रत्यक्षात रावेतपर्यंत पाणी येईपर्यंत मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. परिणामी रावेत बंधाºयातील पाण्याची पातळी कमी होते. यामुळे अशुद्ध जलउपसा केंद्रातील काही पंप बंद करावे लागतात. पाण्याचा उपसा कमी झाल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या भरत नाहीत. परिणामी पाणी सोडण्याची यंत्रणा विस्कळीत होते. मागील आठवड्यात दोन दिवस सलग पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची ओरड आली, की पाणीपुरवठा विभागातील जबाबदार अधिकारी फक्त कारणे देतात. आज काय बंधाºयाची पातळी कमी झाली, उद्या काय टाक्याच भरल्या नाहीत. वीजपुरवठा खंडित झाला. जलवाहिनी फुटली, अशी कारणे देण्यात अधिकारी माहीर आहेत. स्वत:च्या चुका झाकण्यासाठी कारणे देण्यात अधिकारी धन्यता मानत आहेत. पाणीटंचाई झाली, की ती सुरळीत करण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभाग करीत असतो.आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्षमहापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून रणकंदन झाल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपाययोजना जाहीर केल्या होत्या. दहा दिवसांत पाणीपुरठा सुरळीत करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. मात्र, शहरातील अनेक भागात अजूनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दम दिला आहे. मात्र, अजूनही पाणीपुरवठा विस्कळीत झालेला नाही. आयुक्तांच्या आदेशाला फाट्यावर दिले जात आहे, अशी तक्रार नागरिक करीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड