शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

शहरात नियोजनाअभावी पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 03:21 IST

नदीतून पाणी उचलण्याची महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

पिंपरी : पवना धरणातून रावेतच्या नदीत पाणी सोडले जाते. पिंपरी-चिंचवड शहराला आरक्षणानुसार पाणी सोडले जाते. मात्र, नदीतून पाणी उचलण्याची महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.महापालिकेला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत आणि रावेत येथील बंधाºयातून उपसा केंद्राद्वारे पाणी उचलले जाते. रावेतमधील पाणी पातळी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेला असलेल्या आरक्षणानुसार ८५० एमएलडी ते ११०० एमएलडी पाणी सोडले जाते.रावेत बंधाºयातील पाण्याची पातळी कमी झाली किंवा रावेत येथील उपसा केंद्राच्या कामासाठी आठवड्यातून एकदा अघोषितपणे म्हणजेच गुरुवारी पाणीकपात केली जाते. दोन दिवसांपूर्वी रावेत बंधाºयातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. दर बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा येणार नाही, असे प्रकटन दिले जाते.मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. रावेत येथील बंधाºयातून महापालिका पाण्याचा उपसा करते. पाणी शुद्ध करून शहरवासीयांनी पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाणी सोडले जात असले, तरी प्रत्यक्षात रावेतपर्यंत पाणी येईपर्यंत मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. परिणामी रावेत बंधाºयातील पाण्याची पातळी कमी होते. यामुळे अशुद्ध जलउपसा केंद्रातील काही पंप बंद करावे लागतात. पाण्याचा उपसा कमी झाल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या भरत नाहीत. परिणामी पाणी सोडण्याची यंत्रणा विस्कळीत होते. मागील आठवड्यात दोन दिवस सलग पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची ओरड आली, की पाणीपुरवठा विभागातील जबाबदार अधिकारी फक्त कारणे देतात. आज काय बंधाºयाची पातळी कमी झाली, उद्या काय टाक्याच भरल्या नाहीत. वीजपुरवठा खंडित झाला. जलवाहिनी फुटली, अशी कारणे देण्यात अधिकारी माहीर आहेत. स्वत:च्या चुका झाकण्यासाठी कारणे देण्यात अधिकारी धन्यता मानत आहेत. पाणीटंचाई झाली, की ती सुरळीत करण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभाग करीत असतो.आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्षमहापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून रणकंदन झाल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपाययोजना जाहीर केल्या होत्या. दहा दिवसांत पाणीपुरठा सुरळीत करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. मात्र, शहरातील अनेक भागात अजूनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दम दिला आहे. मात्र, अजूनही पाणीपुरवठा विस्कळीत झालेला नाही. आयुक्तांच्या आदेशाला फाट्यावर दिले जात आहे, अशी तक्रार नागरिक करीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड