शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शहरात नियोजनाअभावी पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 03:21 IST

नदीतून पाणी उचलण्याची महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

पिंपरी : पवना धरणातून रावेतच्या नदीत पाणी सोडले जाते. पिंपरी-चिंचवड शहराला आरक्षणानुसार पाणी सोडले जाते. मात्र, नदीतून पाणी उचलण्याची महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.महापालिकेला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत आणि रावेत येथील बंधाºयातून उपसा केंद्राद्वारे पाणी उचलले जाते. रावेतमधील पाणी पातळी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेला असलेल्या आरक्षणानुसार ८५० एमएलडी ते ११०० एमएलडी पाणी सोडले जाते.रावेत बंधाºयातील पाण्याची पातळी कमी झाली किंवा रावेत येथील उपसा केंद्राच्या कामासाठी आठवड्यातून एकदा अघोषितपणे म्हणजेच गुरुवारी पाणीकपात केली जाते. दोन दिवसांपूर्वी रावेत बंधाºयातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. दर बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा येणार नाही, असे प्रकटन दिले जाते.मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. रावेत येथील बंधाºयातून महापालिका पाण्याचा उपसा करते. पाणी शुद्ध करून शहरवासीयांनी पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाणी सोडले जात असले, तरी प्रत्यक्षात रावेतपर्यंत पाणी येईपर्यंत मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. परिणामी रावेत बंधाºयातील पाण्याची पातळी कमी होते. यामुळे अशुद्ध जलउपसा केंद्रातील काही पंप बंद करावे लागतात. पाण्याचा उपसा कमी झाल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या भरत नाहीत. परिणामी पाणी सोडण्याची यंत्रणा विस्कळीत होते. मागील आठवड्यात दोन दिवस सलग पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची ओरड आली, की पाणीपुरवठा विभागातील जबाबदार अधिकारी फक्त कारणे देतात. आज काय बंधाºयाची पातळी कमी झाली, उद्या काय टाक्याच भरल्या नाहीत. वीजपुरवठा खंडित झाला. जलवाहिनी फुटली, अशी कारणे देण्यात अधिकारी माहीर आहेत. स्वत:च्या चुका झाकण्यासाठी कारणे देण्यात अधिकारी धन्यता मानत आहेत. पाणीटंचाई झाली, की ती सुरळीत करण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभाग करीत असतो.आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्षमहापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून रणकंदन झाल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपाययोजना जाहीर केल्या होत्या. दहा दिवसांत पाणीपुरठा सुरळीत करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. मात्र, शहरातील अनेक भागात अजूनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दम दिला आहे. मात्र, अजूनही पाणीपुरवठा विस्कळीत झालेला नाही. आयुक्तांच्या आदेशाला फाट्यावर दिले जात आहे, अशी तक्रार नागरिक करीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड