शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

पाण्याचा अपव्यय थांबवा

By admin | Updated: November 2, 2015 00:40 IST

‘‘दुष्काळ, अवर्षण व पूर अशा नैसर्गिक आपत्तीपासून पुढच्या पिढीला वाचवायचे असेल, तर ऊर्जा व पाण्याची बचत करून पर्यावरणरक्षण केले पाहिजे.

पिंपरी : ‘‘दुष्काळ, अवर्षण व पूर अशा नैसर्गिक आपत्तीपासून पुढच्या पिढीला वाचवायचे असेल, तर ऊर्जा व पाण्याची बचत करून पर्यावरणरक्षण केले पाहिजे. विकासाच्या नावाखाली सर्व बाजूंनी पाणी व ऊर्जेचा अपव्यय होत आहे. हे रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी शास्त्र, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रांतील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन व्यवस्थापन राबविले पाहिजे,’’ असे मार्गदर्शन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले. पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालय ‘ऊर्जा व्यवस्था व उपयोग’ या विषयावर आंतरराष्ट्रीय शिबिर झाले. त्याअंतर्गत डॉ. राजेंद्र सिंह यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, कुलगुरु पी. एन. राजदान, प्राचार्य डॉ. आर. के. जैन, अधिष्ठाता डॉ. पी. एम. घाणेगावकर, किशोर धारीया आदी उपस्थित होते. डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, ‘‘ २१ व्या शतकाच्या सुरुवातीलाच जमीन, ऊर्जा स्रोत आणि पाण्यासाठी युद्ध होत आहेत. त्याविषयी खूप गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांचे पुर्नभरण झाले पाहिजे आणि मानवनिर्मित त्यातील अडथळे दूर करून पर्यावरणरक्षण केले पाहिजे. जलसंधारणाच्या नावाखाली काही ठिकाणी मुबलक पाणी वापरले जाते. तर त्याच जिल्ह्यात दुष्काळ पडतो. ’’(प्रतिनिधी)