शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

पाण्याचा अपव्यय थांबवा

By admin | Updated: November 2, 2015 00:40 IST

‘‘दुष्काळ, अवर्षण व पूर अशा नैसर्गिक आपत्तीपासून पुढच्या पिढीला वाचवायचे असेल, तर ऊर्जा व पाण्याची बचत करून पर्यावरणरक्षण केले पाहिजे.

पिंपरी : ‘‘दुष्काळ, अवर्षण व पूर अशा नैसर्गिक आपत्तीपासून पुढच्या पिढीला वाचवायचे असेल, तर ऊर्जा व पाण्याची बचत करून पर्यावरणरक्षण केले पाहिजे. विकासाच्या नावाखाली सर्व बाजूंनी पाणी व ऊर्जेचा अपव्यय होत आहे. हे रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी शास्त्र, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रांतील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन व्यवस्थापन राबविले पाहिजे,’’ असे मार्गदर्शन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले. पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालय ‘ऊर्जा व्यवस्था व उपयोग’ या विषयावर आंतरराष्ट्रीय शिबिर झाले. त्याअंतर्गत डॉ. राजेंद्र सिंह यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, कुलगुरु पी. एन. राजदान, प्राचार्य डॉ. आर. के. जैन, अधिष्ठाता डॉ. पी. एम. घाणेगावकर, किशोर धारीया आदी उपस्थित होते. डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, ‘‘ २१ व्या शतकाच्या सुरुवातीलाच जमीन, ऊर्जा स्रोत आणि पाण्यासाठी युद्ध होत आहेत. त्याविषयी खूप गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांचे पुर्नभरण झाले पाहिजे आणि मानवनिर्मित त्यातील अडथळे दूर करून पर्यावरणरक्षण केले पाहिजे. जलसंधारणाच्या नावाखाली काही ठिकाणी मुबलक पाणी वापरले जाते. तर त्याच जिल्ह्यात दुष्काळ पडतो. ’’(प्रतिनिधी)