शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

वायसीएममध्ये रुग्णवाहिका नेण्यास अडचणी

By admin | Updated: June 1, 2017 02:08 IST

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाची वाहने जाऊ शकतील, अशी जागा इमारतींच्या जवळ सोडणे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाची वाहने जाऊ शकतील, अशी जागा इमारतींच्या जवळ सोडणे बांधकाम नियमावलीत बंधनकारक आहे. असे असताना, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडे जाण्यास मात्र अतिक्रमणांमुळे अडथळे निर्माण झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा आगोदरपासून टपऱ्या आहेत़ अलीकडच्या काळात त्यात आणखी भर पडू लागल्याने बुधवारी महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाने अतिक्रमण विरोधी कारवाई करून २४ टपऱ्या आणि ४ हातगाड्या हटविल्या. रुग्णांना तातडीक सेवा मिळावी, यासाठी देशपातळीवर विविध प्रयत्न होत आहेत. अवयव प्रत्यारोपणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरापर्यंतचा अवयव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा प्रवास विनाअडथळा व्हावा, या करिता ग्रिन कॉरिडोरची संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणली जात आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला (वायसीएम) मात्र अतिक्रमणाचा विळखा पडू लागला आहे. संत तुकारामनगर परिसरात शैक्षणिक संकुल, रुग्णालय आणि प्रेक्षागृह आहे. त्यामुळे येथील अंतर्गत रस्त्यांवर कायम वर्दळ असते. व्यावसायिकदृष्ट्या पूरक वातावरण असल्याने या प्रभागात पावलापावलावर टपऱ्या आहेत. औषध दुकाने, खाणावळ, हॉटेल, टपऱ्या, हातगाड्यांनी परिसर वेढला आहे. दुकानांच्यासमोर रस्त्यावरच दुचाकी,चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होतो. या मार्गावरून पीएमपीच्या बस ये-जा करतात. या बसलासुद्धा रस्त्यात अनेक ठिकाणी अडथळे निर्माण होतात. रुग्णालयाकडे येणाऱ्या मार्गावर अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने रुग्णवाहिकासुद्धा सहजपणे रुग्णालयापर्यंत येणे कठीण झाले असल्याची स्थिती निर्माण झाली होती. ही बाब सजग नागरिकांनी सारथी हेल्पलाइनवर अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे महापालिकेला कारवाई करणे भाग पडले. स्वखर्च : टपरीधारकांनीही वापरली क्रेनमहापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने टपऱ्या उचलण्यासाठी क़्रेन आणली होती. तशीच क्रेन टपरीधारकांनी आपल्या टपऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आणली होती. महापालिकेचे अधिकारी कारवाईसाठी येताच, टपरीधारकांनी स्वखर्चाने आणलेल्या क्रेनच्या माध्यमातून टपऱ्या अलगद उचलल्या जात होत्या. टपरीधारकही टपऱ्यातील माल वाचविण्यासाठी स्वत: क्रेन आणू शकतात. हे दृश्य पहिल्यांदाच संत तुकारामनगरमध्ये पहावयास मिळाले. जुन्या टपऱ्यांना नाही धक्कामहापालिका निवडणूक काळात नव्याने टपऱ्या थाटण्यात आल्या होत्या. त्यामुळे या वाढीव अतिक्रमणांवर महापालिकेने बुधवारी कारवाई केली. जुन्या टपऱ्यांना धक्का लावला नाही. जुन्या टपऱ्यांना धक्का नाही, नव्याने टाकलेल्या टपऱ्या हटविल्या. यात राजकारण झाले, अशी चर्चा परिसरात होती.