शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लाल मिरचीला महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 04:36 IST

परराज्यांतून आवक : गतवर्षीच्या तुलनेत भाववाढ होऊनही मसाला तयार करण्यासाठी मागणी

पिंपरी : वर्षभरासाठी लागणारा मसाला करण्याची लगबग आणि लग्नसराई यामुळे लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत ग्राहकांची मिरचीला मागणी वाढली आहे. विविध प्रकारच्या मिरच्या आणि मसाल्यासाठी लागणारे पदार्थांचे भाव वधारले आहेत.बाजारात साधारण १२० रुपयांपासून २०० रुपये किलोपर्यंत मिरची उपलब्ध आहे. लवंगी, तेजा, गुंटुर, शंकेश्वरी, चपाटा, रसगुल्ला, बॅडगी, काश्मिरी, रेशमपट्टा या प्रकारच्या मिरच्या बाजारात उपलब्ध आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश या ठिकाणहून मिरची बाजारात दाखल होते. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी भाव थोडे वाढल्याची चर्चा ग्राहकांमध्ये आहे.गेल्या वर्षी साधारणपणे १०० रुपये किलो असा भाव मिरचीला होता त्यात या वर्षी काही प्रमाणात वाढ झाली आहे. गृहिणींची सध्या वर्षभरासाठी लागणारा मसाला तयार करण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे मसाल्यासाठी लागणारी मिरची व मसाल्याचे पदार्थ घेण्यासाठी गृहिणी मिरची बाजाराकडे वळू लागल्या आहेत. मसाल्यासाठी लागणारे इंदोरी, गावरान, ग्रीन धने बाजारात उपलब्ध आहेत. गृहिणींकडून धन्यांना सर्वाधिक मागणी आहे.हॉटेल व्यावसायिकांकडून देखील याच दिवसांत मिरची खरेदी करून ठेवली जाते. पदार्थ झणझणीत करण्यासाठी व त्याला तर्री येण्यासाठी शंकेश्वरी व रेशमपट्टा मिरची हॉटेल व्यावसायिक खरेदी करीत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. त्याचप्रमाणे लग्नसराई सुरू असल्यामुळेही लग्नातील चमचमीत जेवण तयार करण्यासाठी मिरची व मसाल्याची मागणी वाढली आहे.गुंटूर, लवंगी : तिखट खाणाऱ्यांना चवपिंपरीच्या लालबहादूर शास्त्री मंडईत शंकेश्वरी (१४० रु. किलो), रेशमपट्टा (२०० रु. किलो) व ब्याडगी (१८० रु. किलो) या मिरचीला सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय लवंगी (१२० रु. किलो), तेजी (१४० रु. किलो), चपाटा (१६० रु. किलो), रसगुल्ला (२०० रु. किलो), काश्मिरी (२०० रु. किलो) या मिरच्याही उपलब्ध आहेत. कमी तिखट खाणाºया कुटुंबाची ब्याडगी मिरचीला पसंती आहे. ही मिरची चवदार व गडद रंगाची असते. तर झणझणीत व जास्त तिखट खाणाºया कुटुंबाची गुंटूर, लवंगी व तेजा या मिरचीला अधिक मागणी आहे. लवंगी, तेजा, गुंटुर, शंकेश्वरी, चपाटा, रसगुल्ला, बॅडगी, काश्मिरी, रेशमपट्टा या प्रकारच्या मिरच्या बाजारात उपलब्ध आहेत.दर वर्षीच एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मिरचीची मागणी वाढते. मिरचीप्रमाणेच मसाल्याचे पदार्थही आवर्जून खरेदी केले जातात. मसाले तयार करणाºया बचत गटांकडून या दिवसात मिरचीला जास्त मागणी असते.’’- नितीन ब्राह्मणकर, विक्रेतेआम्ही दर वर्षी घरगुती मसाला तयार करतो. बाजारातील रेडिमेड मसाल्यापेक्षा घरी तयार केलेला मसाला परवडतो. त्याचप्रमाणे आपल्याला हवा तसा कमी-जास्त तिखट करता येतो. त्यामुळे आम्ही मिरची खरेदी करूनच मसाला तयार करतो.- अश्विनी कुंभार, गृहिणीहॉटेलमधील चमचमीत पदार्थ तयार करण्यासाठी उत्तम दर्जाची मिरची आवश्यक असते. रेडिमेड मसाल्यात वापरलेल्या मिरचीची गुणवत्ता आपण तपासू शकत नाही. त्यामुळे पदार्थांना चवदेखील येत नाही. उत्तम दर्जाची मिरची वापरल्यामुळे पदार्थांची गुणवत्ता टिकून ठेवता येते.’’- मनोज चव्हाण, हॉटेल व्यावसायिक

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड