शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांत पकडले २३५ बिबटे

By admin | Updated: May 15, 2015 05:21 IST

या बिबट्यांच्या चार कॅटेगरी करण्यात आल्या असून १) लहानपणापासून वाढवलेले बिबटे, २) अपंग बिबटे ३) वृद्ध बिबटे, ४) २००४ ते २००५ दरम्यान नागरी

अतुल परदेशी, जुन्नरजुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर अशा चार तालुक्यांच्या मिळून असणाऱ्या विभागामध्ये किमान ५० बिबट्यांचे अस्तित्वात असून, १९९५ ते २०१५ दरम्यानच्या २० वर्षांत या भागातून २३५ बिबटे पकडण्यात आले आहेत़ डिंगोरे व या परिसरात घडलेल्या घटना पाहता सध्या ८ ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली.खामुंडी येथील एका पिंजऱ्यात आज एक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले़ जुन्नर तालुक्यातील माणिकडोह या ठिकाणी संपूर्ण भारतातील एकमेव बिबट निवारण केंद्र असून सद्या या केंद्रात एकूण २९ बिबटे असून त्यात २२ मादी व ७ नर बिबटे आहेत़ नाशिक येथे पकडलेल्या बिबट्याचा आॅपरेशन करून एक डोळा काढण्यात आला आहे तर एका बिबट्याला तीनच पाय असून एका ला पूर्ण पंजा नाही़ त्यामुळे त्यांची संपूर्ण शेवटपर्यंत देखभाल या केंद्रात केली जाणार आहे़ देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार माणीकडोह येथील बिबट निवारण केंद्र हे डिसेंबर २००९ पासून वाईड लाईफ, दिल्ली ही संस्था वनविभागाच्या सामजस्याने चालवत असून येथे या आधी २७ बिबटे होते, त्यांचा दर महा खर्च हा ५ लाख रुपये एवढा असून त्यांना दिवसाला साधारण ८० किलो मास द्यावे लागत आहे. तसेच वरील सर्व बिबट्यांची देखरेख करण्यासाठी डॉ. अजय देशमुख यांच्या बरोबर सात लोकांचे पथक करत आहे़ या कर्मचाऱ्यांचा सर्व खर्च ही संस्था, करते असे डॉ. देशमुख यांनी सांगितले़ चार तालुक्यात गेल्य २० वर्षात २३५ बिबटे पकडण्यात आले असले तरी त्यातील बहुतांशी बिबट्यांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना पुन्हा जंगलात सोडून देण्यात आले आहे़ त्यात प्रामुख्याने शिकार करताना विहिरीत पडले, ऊस शेतीत सापडलेले बछडे अशांना काही काळाने जंगलात सोडून दिले आहे़ जे जखमी झाले अथवा अपंग आहेत, निवारण केंद्रात अधिक काळ राहिल्याने जे शिकार करणे विसरले आहेत, अशांनाच या केंद्रात कायमस्वरुपी ठेवण्यात येते़ या बिबट्यांच्या चार कॅटेगरी करण्यात आल्या असून १) लहानपणापासून वाढवलेले बिबटे, २) अपंग बिबटे ३) वृद्ध बिबटे, ४) २००४ ते २००५ दरम्यान नागरी वस्तीत पकडण्यात आलेले बिबटे असे चार प्रकार असून यांना जागेवरच खाद्य देऊन देखरेख करावी लागत आहे़ नाशिक येथे २००८ साली पकडलेल्या बिबट्या त्यावेळी ६ वर्षाचा होता़ आता तो १५ वर्षांचा असून सर्व साधारणपणे बिबट्यांचे आयुष्य हे १७ ते १८ वर्षे एवढे असते़ या ठिकाणी त्यांची योग्य देखरेख होत असल्याने ते २० ते २१ वर्षांपर्यंत जगतील, तसेच नाशिक येथे एका अपघातात एका मादी बिबट्याचा अपघात झाला होता़ त्यावेळी ती गरोदर असताना तिने दोन छावा पिल्लांना जन्म दिला़ त्यांची २००८ पासून आजतागायत माणिकडोह बिबटे निवारण केंद्रात देखरेख होत आहे़ सध्या निवारण केंद्रात 29 बिबटे असून 22 मादी तर 7 नर बिबटे आहेत, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले़