शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांत पकडले २३५ बिबटे

By admin | Updated: May 15, 2015 05:21 IST

या बिबट्यांच्या चार कॅटेगरी करण्यात आल्या असून १) लहानपणापासून वाढवलेले बिबटे, २) अपंग बिबटे ३) वृद्ध बिबटे, ४) २००४ ते २००५ दरम्यान नागरी

अतुल परदेशी, जुन्नरजुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर अशा चार तालुक्यांच्या मिळून असणाऱ्या विभागामध्ये किमान ५० बिबट्यांचे अस्तित्वात असून, १९९५ ते २०१५ दरम्यानच्या २० वर्षांत या भागातून २३५ बिबटे पकडण्यात आले आहेत़ डिंगोरे व या परिसरात घडलेल्या घटना पाहता सध्या ८ ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली.खामुंडी येथील एका पिंजऱ्यात आज एक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले़ जुन्नर तालुक्यातील माणिकडोह या ठिकाणी संपूर्ण भारतातील एकमेव बिबट निवारण केंद्र असून सद्या या केंद्रात एकूण २९ बिबटे असून त्यात २२ मादी व ७ नर बिबटे आहेत़ नाशिक येथे पकडलेल्या बिबट्याचा आॅपरेशन करून एक डोळा काढण्यात आला आहे तर एका बिबट्याला तीनच पाय असून एका ला पूर्ण पंजा नाही़ त्यामुळे त्यांची संपूर्ण शेवटपर्यंत देखभाल या केंद्रात केली जाणार आहे़ देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार माणीकडोह येथील बिबट निवारण केंद्र हे डिसेंबर २००९ पासून वाईड लाईफ, दिल्ली ही संस्था वनविभागाच्या सामजस्याने चालवत असून येथे या आधी २७ बिबटे होते, त्यांचा दर महा खर्च हा ५ लाख रुपये एवढा असून त्यांना दिवसाला साधारण ८० किलो मास द्यावे लागत आहे. तसेच वरील सर्व बिबट्यांची देखरेख करण्यासाठी डॉ. अजय देशमुख यांच्या बरोबर सात लोकांचे पथक करत आहे़ या कर्मचाऱ्यांचा सर्व खर्च ही संस्था, करते असे डॉ. देशमुख यांनी सांगितले़ चार तालुक्यात गेल्य २० वर्षात २३५ बिबटे पकडण्यात आले असले तरी त्यातील बहुतांशी बिबट्यांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना पुन्हा जंगलात सोडून देण्यात आले आहे़ त्यात प्रामुख्याने शिकार करताना विहिरीत पडले, ऊस शेतीत सापडलेले बछडे अशांना काही काळाने जंगलात सोडून दिले आहे़ जे जखमी झाले अथवा अपंग आहेत, निवारण केंद्रात अधिक काळ राहिल्याने जे शिकार करणे विसरले आहेत, अशांनाच या केंद्रात कायमस्वरुपी ठेवण्यात येते़ या बिबट्यांच्या चार कॅटेगरी करण्यात आल्या असून १) लहानपणापासून वाढवलेले बिबटे, २) अपंग बिबटे ३) वृद्ध बिबटे, ४) २००४ ते २००५ दरम्यान नागरी वस्तीत पकडण्यात आलेले बिबटे असे चार प्रकार असून यांना जागेवरच खाद्य देऊन देखरेख करावी लागत आहे़ नाशिक येथे २००८ साली पकडलेल्या बिबट्या त्यावेळी ६ वर्षाचा होता़ आता तो १५ वर्षांचा असून सर्व साधारणपणे बिबट्यांचे आयुष्य हे १७ ते १८ वर्षे एवढे असते़ या ठिकाणी त्यांची योग्य देखरेख होत असल्याने ते २० ते २१ वर्षांपर्यंत जगतील, तसेच नाशिक येथे एका अपघातात एका मादी बिबट्याचा अपघात झाला होता़ त्यावेळी ती गरोदर असताना तिने दोन छावा पिल्लांना जन्म दिला़ त्यांची २००८ पासून आजतागायत माणिकडोह बिबटे निवारण केंद्रात देखरेख होत आहे़ सध्या निवारण केंद्रात 29 बिबटे असून 22 मादी तर 7 नर बिबटे आहेत, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले़