माधुरीमुळे नाही तर 'या' लोकांमुळे झाला होता संजय दत्त आणि रिचा शर्माचा घटस्फोट...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 04:48 PM2020-07-28T16:48:17+5:302020-07-28T17:15:39+5:30

संजय दत्तने १९८७ मध्ये रिचासोबत लग्न केले होते. रिचा आणि संजय यांच्यात घटस्फोट झाला तेव्हा या घटस्फोटाला माधुरीला जबाबदार धरण्यात आलं होतं. पण हे तसं नव्हतं.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचं आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे चढ-उताराचंच राहिलं. त्याच्यावर आधारित सिनेमातूनही बऱ्यापैकी ते दाखवण्यात आलं होतं. संजय दत्तच्या जीवनात अनेक महिला आल्या आणि गेल्या. पण त्यात सर्वात पहिली आली ती अभिनेत्री रिचा शर्मा. संजय दत्तने १९८७ मध्ये रिचासोबत लग्न केले होते. रिचा आणि संजय यांच्यात घटस्फोट झाला तेव्हा या घटस्फोटाला माधुरीला जबाबदार धरण्यात आलं होतं. पण हे तसं नव्हतं.

संजय दत्तने तीन लग्ने केली. पहिलं रिचासोबत दुसरं रिहा पिल्लईसोबत आणि तिसरं मान्यतासोबत. पण आज आम्ही तुम्हाला संजय दत्त आणि रिचा शर्मा वेगळे का झाले. लग्नानंतर रिचाने बॉलिवूडमधील करिअर सोडलं. दोघांचा सुखी संसार सुरू होता आणि अचानक रिचाला ब्रेन ट्यूमर झाल्याचं समोर आलं. रिचा उपचारासाठी तिच्या वडिलांकडे अमेरिकेत गेली.

रिचा ब्रेन ट्यूमरच्या उपचारासाठी अमेरिकेत ३ वर्षे होती. उपचार घेऊन ती परत आली तेव्हा तिच्या कानावर संजय दत्त आणि माधुरी दीक्षितच्या गोष्टी पडल्या. तेव्हा दोघांच्या अफेअरची चर्चा सगळीकडे रंगली होती. आजारातून बरी झाल्यावर रिचाने दोघांबाबत ऐकल्यावर ती पार खचली.

रिचाने एका मुलाखतीत सांगितले होते की, “संजय माझ्या आयुष्यात परत यावा अशी माझी इच्छा आहे. आम्ही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांपासून दूर राहत आहोत. मी संजयला विचारलं होतं की मला घटस्फोट मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे'.

रिचा आणि संजय दोघेही त्यांचे लग्न वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. पण रिचाला पुन्हा अमेरिकेत जावे लागले. ज्यानंतर दोघांमधील अंतर आधीपेक्षा जास्त वाढले. हे अंतर पुढे इतकं वाढलं की, संजय आणि रिचाला घटस्फोट घ्यावा लागला. रिचाची बहीण अन्नाने माधुरी दीक्षितला संजय आणि रिचाच्या घटस्फोटाचे कारण सांगितले होते.

अॅना म्हणाली होती की, ‘माधुरीमध्ये अजिबात माणुसकी नाही. माधुरीला दुसरं कुणीतरी सापडलं असतं. माधुरीने आधीच लग्न झालेल्या मुलाची निवड केली आहे'. पण संजय दत्तने रिचा आणि त्याच्या घटस्फोटासाठी रिचाच्या कुटूंबाला आणि मेहुण्याला जबाबदार धरले होते.

संजयने एका मुलाखतीत खुलासा केला होता की रिचाचे कुटुंबीय आणि त्याची मेहुणी अॅना यांनीच आपलं नातं संपवलं होतं. एका मुलाखतीत संजय म्हणाला होता की, ‘आमचं लग्न रिचाच्या आजारामुळे मोडलं नाही. हे खोटे आरोप आहेत'.

तो म्हणाला होता की, 'मी असा अजिबात नाही की, केवळ केस कमी झाल्यामुळे आपल्या पत्नीवर प्रेम करणे थांबवेल. रिचाशी माझं नातं संपलं आहे. आम्ही आता कधीही एकत्र येऊ शकत नाही. मला तिच्याकडून काहीच तक्रार नाही. पण तिच्यापासून वेगळे करण्यात तिच्या पालकांचा पूर्ण हात होता'.

संजय दत्त पुढे म्हणतो, ‘ती आमच्या दोघांच्या आयुष्यात खूप हस्तक्षेप करायची. ती माझ्यावर नेहमीच कशाचा तरी आरोप करत राहिली. रिचाची बहीण अॅना ही आमचं नातं बिघडण्याला सर्वात मोठं कारण ठरली. ती आमच्यात गैरसमज निर्माण करायची'.

संजय म्हणाला होता की, 'मला वाटत होते की, आजाराने आम्हाला जवळ आणले आहे. पण तिच्या कुटूंबियांनी सगळं काही खराब केलं'. संजय दत्तच्या एकंदर सांगण्यावरून हेच दिसून येतं की, रिचासोबत त्याचं लग्न मोडण्याला पूर्णपणे माधुरी नाही तर रिचाच्या परिवारातील लोक होते.