शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लसपुरवठा उशिराने; चार तास लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:14 IST

शहरात दररोज १४ केंद्रांवर लसीकरण केले जाते. मात्र, गुरुवारी तसेच शुक्रवारी लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला. गुरुवारी दुपारी काही केंद्रांवर ...

शहरात दररोज १४ केंद्रांवर लसीकरण केले जाते. मात्र, गुरुवारी तसेच शुक्रवारी लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला. गुरुवारी दुपारी काही केंद्रांवर लसीकरणाची वेळ दुपारी २ ते ६ होती. यात बाल विद्यामंदिर येथे दुपारी ४ वाजेपर्यंत लसच मिळाली नसल्याचे काही लाभार्थींनी सांगितले, तर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मनपाच्या आरोग्य विभागाकडे शुक्रवारी होणाऱ्या लसीकरणाचे किती डोस मिळणार हे उपलब्ध झाले नव्हते. यामुळे अचानक शुक्रवारी सकाळी १४ केंद्रांएवजी केवळ ५ ठिकाणी मोहीम राबविली जाणार असल्याचे कळविले. यामध्ये जायकवाडी, खानापूर, इनायतनगर, बाल विद्यामंदिर व अन्य एका ठिकाणी लसीकरण होणार असल्याचे मनपाने सांगितले. प्रत्यक्षात सकाळी ९ ते ५ या वेळेत होणाऱ्या लसीकरणाच्या वेळेमध्ये दुपारी १ वाजेपर्यंत बाल विद्यामंदिर येथे लसच आली नव्हती. यामुळे केंद्रावर जवळपास ६० ते ७० लाभार्थी ताटकळत बसले होते. दुपारी १ नंतर लस येण्याची शक्यता होती. शहरात दररोजच लसीकरणाचा खेळखंडोबा होत असल्याचे दिसून येत आहे.

ऑनलाइन नोंदणी झालेल्यांनाच मिळाली लस

अनेकजण गुरुवारी लस मिळाली नाही म्हणून ठरावीक केंद्रांवर आले. मात्र, शुक्रवारी केवळ ऑनलाइन नोंदणी झालेल्यांनाच लस देण्यात आली. यामुळे टोकन घेणारे किंवा स्पाॅट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्यांचा हिरमोड झाला.

लसींचा पुरवठा राज्यस्तरावरून कमी होत असल्याने उशीर झाला. तसेच लसीकरण केंद्रांची संख्या कमी करून नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी काही केंद्र सुरू ठेवले. मुळात लसीकरण बंद ठेवण्याचे आदेश होते. - डाॅ. कल्पना सावंत, वैद्यकीय अधिकारी, मनपा