शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

बाजार समितीची निवडणूक लांबणीवर

By admin | Updated: January 27, 2015 12:28 IST

विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतरच मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

मानवत : विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतरच मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. मानवत बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. बाजार समितीच्या प्रारुप मतदार तसेच अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होऊन निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्तीची अधिसूचनाही काढली होती. परंतु, औरंगाबाद खंडपीठात सावळी येथील माणिक काळे यांनी याचिका दाखल केल्याने ही प्रक्रिया बंद पडली. बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोयायटी मतदार संघातून ११ जागा, ग्रामपंचायत संघातून ४ जागा, व्यापारी मतदार संघातून २ जागा व हमाल-मापाडी मतदार संघातून १ जागा अशा एकूण १८ जागा आहेत.बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण ३४ विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत. यापैकी २0११ ते मार्च २0१३ पर्यंत पंधरा सोसायटीची मुदत संपली आहेत. परंतु, विविधकारणांनी या सोसायटींच्या निवडणुका झाल्या नाहीत. परिणामी रामेटाकळी, हमदापूर, भोसा, मंगरूळ (बु.), हटकरवाडी, किन्होळा, नागरजवळा, आंबेगाव, पिंपळा, आटोळा, राजूरा, नरळद, केकरजवळा, रत्नापूर, गोगलगाव या गावातील सोसायटीच्या सभासदांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नव्हते. त्यामुळे मोठय़ा मतदार संघातील प्रतिनिधीत्वकमी होऊन केवळ १९ सोसायटीतीलच सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार होता. त्यामुळे अगोदर सोसायटींची निवडणूक व्हावी व नंतरच बाजार समितीची निवडणूक घ्यावी, अशी याचिका माणिक काळे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अगोदर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक घेऊन नंतरच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असे आदेश दिले. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या कार्यकर्त्यांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची वाट पहावी लागणार आहे.

 ■ विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सोसायटीची निवडणूक घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

 

■ मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीला २१ जानेवारी २0१५ पर्यंत मिळालेली मुदतवाढ संपली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर लवकरच प्रशासक येण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेकांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे कृऊबा समितीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.