शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

बाजार समितीची निवडणूक लांबणीवर

By admin | Updated: January 27, 2015 12:28 IST

विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतरच मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

मानवत : विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतरच मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. मानवत बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. बाजार समितीच्या प्रारुप मतदार तसेच अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होऊन निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्तीची अधिसूचनाही काढली होती. परंतु, औरंगाबाद खंडपीठात सावळी येथील माणिक काळे यांनी याचिका दाखल केल्याने ही प्रक्रिया बंद पडली. बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोयायटी मतदार संघातून ११ जागा, ग्रामपंचायत संघातून ४ जागा, व्यापारी मतदार संघातून २ जागा व हमाल-मापाडी मतदार संघातून १ जागा अशा एकूण १८ जागा आहेत.बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण ३४ विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत. यापैकी २0११ ते मार्च २0१३ पर्यंत पंधरा सोसायटीची मुदत संपली आहेत. परंतु, विविधकारणांनी या सोसायटींच्या निवडणुका झाल्या नाहीत. परिणामी रामेटाकळी, हमदापूर, भोसा, मंगरूळ (बु.), हटकरवाडी, किन्होळा, नागरजवळा, आंबेगाव, पिंपळा, आटोळा, राजूरा, नरळद, केकरजवळा, रत्नापूर, गोगलगाव या गावातील सोसायटीच्या सभासदांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नव्हते. त्यामुळे मोठय़ा मतदार संघातील प्रतिनिधीत्वकमी होऊन केवळ १९ सोसायटीतीलच सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार होता. त्यामुळे अगोदर सोसायटींची निवडणूक व्हावी व नंतरच बाजार समितीची निवडणूक घ्यावी, अशी याचिका माणिक काळे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अगोदर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक घेऊन नंतरच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असे आदेश दिले. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या कार्यकर्त्यांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची वाट पहावी लागणार आहे.

 ■ विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सोसायटीची निवडणूक घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

 

■ मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीला २१ जानेवारी २0१५ पर्यंत मिळालेली मुदतवाढ संपली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर लवकरच प्रशासक येण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेकांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे कृऊबा समितीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.