शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताच्या टंचाईचे जिल्ह्यासमोर नवे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST

परभणी : कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना जिल्ह्यात आता रक्ताच्या टंचाईचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा रक्तपेढीत दोन ...

परभणी : कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना जिल्ह्यात आता रक्ताच्या टंचाईचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा रक्तपेढीत दोन दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. भविष्यात लसीकरण वाढल्यानंतर ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांपासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने येथील जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीला रक्ताच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयात २ हजार बॅग रक्ताची साठवणूक करण्याची क्षमता असलेली रक्तपेढी उभारण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याला या रक्तपेढीला किमान ६०० बॅग रक्ताची आवश्यकता भासते. मात्र, प्रत्यक्षात सध्या रक्तपेढीमध्ये केवळ ६४ बॅग रक्तसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात दररोज ३० बॅग रक्ताची गरज लागते. त्यामुळे उपलब्ध रक्तसाठा केवळ दोन दिवस पुरेल एवढाच आहे.

लसीकरण वाढल्यास आणखी गंभीर स्थिती

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. १ मेपासून अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर किमान दोन महिने संबंधित लाभार्थ्याला रक्तदान करता येत नाही. त्यामुळे लसीकरण करणाऱ्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडाही निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लसीकरणापूर्वी रक्तदानाचे आवाहन

सध्या निर्माण झालेले कोरोनाचे संकट आणि जिल्ह्याला लागणारी रक्ताची गरज लक्षात घेता प्रत्येकाने लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा रक्तपेढीच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोना संसर्गामुळे एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेणे शक्य नसले तरी प्रत्येकाने लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान केल्यास रक्ताचा साठा वाढून अनेक रुग्णांना जीवदान देणे शक्य आहे. तेव्हा रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन केले जात आहे.

प्रत्येक महिन्यात लागणारे रक्त

थलेसेमियाग्रस्त रुग्णांना महिन्यातून दोन वेळा रक्त द्यावे लागते. जिल्ह्यात २०० थलेसेमियाग्रस्त रुग्ण आहेत. त्यामुळे या रुग्णांसाठी ४०० बॅग रक्त प्रत्येक महिन्यात राखीव ठेवावे लागते. त्याचप्रमाणे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांनाही प्रत्येक महिन्यामध्ये दीडशे बॅग रक्त पुरवावे लागते. याशिवाय शस्त्रक्रिया, अपघाती रुग्ण व इतर रुग्णांसाठी रक्ताची गरज भासत आहे. भविष्यात निर्माण होणारी संभाव्य टंचाई लक्षात घेता युवकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.