शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

मजुरांच्या 'आधार'ला अधिकार्‍यांचा खो

By admin | Updated: February 12, 2015 13:46 IST

महाराष्ट्र/ ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या मजुरांकडे मोठय़ा प्रमाणात आधारकार्ड असणे आवश्यक असताना या संदर्भातील कामाच परभणी जिल्ह्यात समाधानकारक झालेले नाही.

अभिमन्यू कांबळे /परभणीमहाराष्ट्र/ ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या मजुरांकडे मोठय़ा प्रमाणात आधारकार्ड असणे आवश्यक असताना या संदर्भातील कामाच परभणी जिल्ह्यात समाधानकारक झालेले नाही. अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे मजुरांच्या आधारकार्डनोंदणीत परभणी जिल्हा राज्यात सर्वात शेवटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणार्‍या कामांसाठी निधीचे कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने मुबलक प्रमाणात शासनाकडून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. या योजनेतून विकासात्मक कामे व्हावीत व मंजुरांनाही रोजगार मिळावा, अशी शासनाची अपेक्षा आहे. परंतु, ही अपेक्षा फोल ठरविण्याचा चंग अधिकारी मंडळींच बांधल्याचे दिसून येत आहे. याला राजकीय पदाधिकार्‍यांची साथ लाभत असल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ जिल्ह्यात सुरू आहे. मग्रारोहयोंतर्गत काम करणार्‍या प्रत्येक मजुराच्या बँक खात्यावर मजुरीची रक्कम जमा व्हावी, यासाठी त्यांचे जॉबकार्ड काढण्यात आले. तसेच योग्य त्या व्यक्तीच्या खात्यावर रक्कम व्हावी, यासाठी मजुरांच्या बँक खात्यांना आधारकार्ड लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला. हीच बाब या योजनेचा बट्याबोळ करणार्‍या अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या मुळावर आली. त्यामुळे मजुरांचे आधारकार्डच काढायचे नाही, असाच चंगच या मंडळींनी बांधला. परिणामी परभणी जिल्ह्यावर राज्यभरात सर्वात शेवटी राहण्याची नामुष्की यामुळे आली आहे. / मग्रारोहयोच्या कामावरील मजुरांच्या आधारकार्ड नोंदणीत राज्यामध्ये सर्वात शेवटी परभणी जिल्हा आला आहे. यातूनच जिल्ह्यातील अधिकार्‍यांचे अपयश दिसून येते. परभणी जिल्ह्यात ४.६७टक्के आधारकार्ड नोंदणीचे प्रमाण आहे. विशेष म्हणजे हिंगोलीसारखा नवखा जिल्हाही परभणीच्या पुढे गेला आहे. राज्यात शेवटी जिल्हा ■ मग्रारोहयोंतर्गत जिल्ह्यात ४ लाख २0 हजार ३१८ मंजुरांची नोंद प्रशासनाकडे आहे. त्यापैकी फक्त १९ हजार ६४६ म्हणजेच ४.६७ टक्के मजुरांचेच आधारकार्ड नोंदविल्या गेले आहे. यामधील १२ हजार ७३८ मजुरांची पडताळणी करण्यात आली असून, ६ हजार ९१२ मजुरांची पडताळणी करण्यास प्रशासकीय यंत्रणेला वेळ मिळालेला नाही. जिल्ह्यात आजही ४ लाख ६७२ मजूर आधारकार्डशिवाय आहेत.

शासनाच्या निर्णयालाच तिलांजली

■ केंद्र शासनाने मग्रारोहयोच्या मजुरीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, परभणी जिल्ह्यात मात्र मजुरांकडे बँक खातेच नसल्याने काही ठिकाणी व्हाऊचरने पेमेंट केले जात आहे. त्यामुळे यामध्ये किती सुजलाम् सुफलाम्ता आहे, याचा विचारच न केलेला बरा. मजुरांमार्फत मग्रारोहयोची कामे करण्याऐवजी थेट जेसीबी मशीनचाच वापर काही महाभाग करीत आहेत. याला अधिकार्‍यांची साथ लाभत असल्याने शासनाचा उद्देशच येथे फोलठरत आहे. मग्रारोहयो कामगारांच्या आधारकार्ड नोंदणीत मराठवाड्यात लातूर जिल्हा आघाडीवर आहे. या जिल्ह्यात २२. ३१ टक्के काम झाले असून, त्या खालोखाल १७.५४टक्के काम उस्मानाबाद जिल्ह्यात झालेले आहे. याशिवाय बीड जिल्ह्यात १६.0७टक्के, हिंगोली जिल्ह्यात १४.८0टक्के, जालना जिल्ह्यात १३.८७टक्के, नांदेड जिल्ह्यात १३.३६ टक्के, औरंगाबाद जिल्ह्यात ११.७६टक्के काम झाले आहे. मराठवाड्यात लातूर टॉपवर जिल्ह्यात १९ हजार ६४६ आधारकार्ड असलेल्या मजुरांपैकी ८ हजार ३४४ मजुरांनीच बँकेमध्ये खाते उघडले आहे. तर १ हजार ७५८ मजुरांनी पोस्ट ऑफीसमध्ये खाते उघडले आहे. उर्वरित १0 हजार १0२ मजुरांचे प्रकारचे खाते उघडलेले नाही. ८ हजार ३३४ बँक खाते

पूर्णा तालुक्याचे सर्वात कमी कामजिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे २.४४ टक्के आधारकार्ड काढण्याचे काम पूर्णा तालुक्यात झालेले आहे. सर्वाधिक म्हणजे १६.१८ टक्के काम मानवत तालुक्यात झाले आहे. अन्य तालुक्यांची मात्र दयनीय अवस्था आहे. गंगाखेड तालुक्यात ३.५९टक्के, जिंतूर तालुक्यात ३टक्के, पालम तालुक्यात ३.५३ टक्के, परभणी तालुक्यात ५.८३टक्के, पाथरी तालुक्यात ४.८६टक्के, सेलू तालुक्यात २.९४ टक्के तर सोनपेठ तालुक्यात ४.८टक्के एवढेच काम झाले आहे. मग्रारोहयोच्या घोटाळ्याने गाजलेल्या जिंतूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ९७ हजार २६0 मजुरांची नोंदणी आहे. प्रत्यक्षात या तालुक्यात फक्त २ हजार ९२१ मजुरांकडेच आधारकार्ड आहेत. त्यामुळे या तालुक्यात होणार्‍या घोटाळ्यांना एकप्रकारे पुष्टीच या माध्यमातून मिळाली आहे.