शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

निधी शिल्लक; लाभार्थी संपले..!

By admin | Updated: January 28, 2015 14:03 IST

अनुसूचित जातीतील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबासाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेसाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनाकडून ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला.

चंद्रमुनी बलखंडे ल्ल /परभणीअनुसूचित जातीतील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबासाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेसाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनाकडून ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. परंतु, प्रतीक्षा यादीत एकही लाभार्थी शिल्लक नसल्याने पंचायत समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांना शोध सुरु केला आहे. दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबासाठी शासनाकडून इंदिरा आवास योजना व रमाई घरकुल योजना राबविण्यात येत आहे. इंदिरा आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची झुंबड उडत असताना रमाई योजनेसाठी जिल्ह्यात पात्र लाभार्थी मिळत नसल्याने प्रशासनाने शोध मोहीम सुरु केली आहे. जिल्ह्यात सन २0१0-११ मध्ये १ हजार २७१, २0११-१२ मध्ये ७ हजार ७१८, २0१२-१३मध्ये १ हजार ५९0 असे एकूण १0 हजार ५७९ लाभार्थ्यांनी या योजनेच्या घरकुलाचा लाभ घेतला. मात्र सन २0१३-१४पासून अनुसूचित जातीची प्रतीक्षा यादीच संपलेली आहे. याच योजनेसाठी शासनाने ८00 घरकुलांसाठी ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मात्र जिल्ह्यात पात्र कुटुंबाचे लाभार्थी नसल्याने दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबाचा शोध सुरु केला आहे. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आवाहनही करण्यात आले आहे. पंचायत समिती मार्फत गाव पातळीवर लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना लाभ देण्याची मोहीम सुरु केली आहे. मागील एक महिन्यापासून निधी पडून असताना अद्याप लाभार्थी मिळत नसल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाही हतबल झाली आहे. /

नावे मागविली> रमाई योजनेसाठी जिल्ह्याला ८ कोटी रुपये मिळाले. सध्या कार्यालयाकडे ५00 च्यावर लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. त्यांची निवडही केली आहे. आता उर्वरित लाभार्थ्यांची यादी ३१ जानेवारीपर्यंत मागविलेली आहे. त्यांचा गटविकास अधिकार्‍यांमार्फत शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले. साहित्याची प्रतीक्षा

> रमाई घरकुल योजनेअंतर्गत यापूर्वी १0 हजार ५७९ लाभार्थ्यांना घरकुले मिळाली. या लाभार्थ्यांना समाजकल्याण विभागाकडून चादर, सतरंजी व सोलार दिवा असे साहित्य दिले जाते. मात्र मागील एक वर्षापासून लाभार्थ्यांना हे साहित्यच मिळाले नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

सर्व लाभार्थ्यांना लाभ - कदम> रमाई घरकुल योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही. याची प्रशासनाकडून पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाकडे असलेल्या माहितीनुसार सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ दिला आहे. यापुढेही काही पात्र लाभार्थी असतील तर त्यांनी त्यांची नावे संबंधित पंचायत समित्यांकडे नोंदवावीत. पात्र लाभार्थ्यांची निवड करुन त्यांनाही योजनेचा लाभ दिला जाईल, अशी प्रतिक्रिया प्रकल्प संचालक बी. टी. कदम यांनी दिली.

■ जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, सर्वसाधारण असे ८0 हजार २0 कुटुंब आहेत. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती १५ हजार ९९0, अल्पसंख्याक ३हजार ६६६ कुटुंबांनी घरकुल योजनेचा लाभ घेतल्याने प्रतीक्षा यादी संपलेली आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत पंचायत समितीमार्फत ५00 च्यावर लाभार्थ्यांची निवड केलेली आहे. आता ३00लाभार्थ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.