शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन, हेल्दी पदार्थ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

कोरोनाला टाळण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी शरीराला आवश्यक असलेले जेवण, सकस आहार, खाद्यपदार्थ गृहिणी घरी बनवित आहेत. लहान मुुले, ...

कोरोनाला टाळण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी शरीराला आवश्यक असलेले जेवण, सकस आहार, खाद्यपदार्थ गृहिणी घरी बनवित आहेत. लहान मुुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वच वयोगटातील सदस्यांच्या तब्येती जपून त्यांचा आहार घरोघरी बनविला जात आहे. यात पालेभाज्या, फळभाज्या, फळांचे सेवन, व्हिटॅमीन सी घटक मिळणारे सरबत, फळ, कडधान्य आणि कमी तेलकट, कमी तिखट पदार्थ तयार करून महिलांनी घरातील सदस्यांचे आरोग्य जेवणाच्या माध्यमातून जपले आहे.

फास्टफूडवर अघोषित बंदी

शहरात अनेक महिने लॉकडाऊन होते. यामुळे हाॅटेल्स, फास्टफूड, चाट भांडार, खानावळ, नाष्टा सेंटर, पावभाजी, चायनीज, पाणीपुरी व अन्य पदार्थांची हाॅटेल्स, दुकाने मध्यंतरी बंदच होती. यामुळे या पदार्थांची रेसिपी शिकून महिलांनी घरातील सदस्यांसाठी असे पदार्थ बनविले. यामुळे नेहमी फास्टफूड खाणाऱ्या अनेक सदस्यांचे बाहेर खाण्याचे प्रमाण कमी झाले. यातच घरातील महिलांनी हे पदार्थ स्वच्छता आणि अन्य कारणांमुळे विकत आणण्यास बंदी घातल्याने सध्या तरी फास्टफूडवर काही जणांची अघोषित बंदी आहे.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच

सध्या प्रत्येक घरी दूध, तूप, पनीर, पेंडखजूर, राजगिरा, लिंबू-पाणी हे पदार्थ जेवणाशिवाय वेगळे खाण्यावर भर देणे गरजेचे आहे. तसेच कडधान्य, मोड आलेले धान्य यांचे सेवन करावे. फळ, पालेभाज्या यांचे प्रमाण जेवणात वाढ‌विणे गरजेचे आहे.

- डॉ. सारिका नरेंद्र ब्रम्हपूरकर, आहारतज्ज्ञ.

कच्च्या भाज्या, कडधान्ये खा

मटकी, उडीद आणि कडधान्ये यांना शिजवून खाण्यापेक्षा ते कच्च्या स्वरुपात खावेत. त्यांना शिजवून खाऊ नये. तसेच भाजी जास्त प्रमाणात शिजवू नये. जेवणात गोड, तिखट, आंबट, खारट हे सर्व पदार्थ असावेत. पावसाळा सुरू झाल्याने पालेभाज्यांचे सेवन कमी करून त्याऐवजी फळभाज्या जास्त प्रमाणात खा‌व्यात, असा सल्ला आहारतज्ञ कोरोना कालावधीत देत आहेत.

गृहिणी म्हणतात

घरातील सर्व सदस्यांच्या आहाराच्या वेळा आणि त्यात समाविष्ट असणारे पदार्थ यांचे तंतोतंत पालन केले जात आहे. अति तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ बनविणे टाळत आहेत. तसेच कोरोनामुळे बाहेरील पदार्थ आणणे आणि खाणे टाळले आहे.

- दीपाली जोशी.

जेवण, नाष्टा आणि अन्य खाद्यपदार्थ तयार करताना प्रत्येकाच्या तब्येतीचा विचार केला जात आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितलेल्या संतुलित आहारावर भर दिला जात आहे. जेवण तयार करताना तेलाचा वापर कमी करत आहे. - संतोषी खंगले.

जेवणात हिंग, मिरे, दालचिनी आणि अन्य आयुर्वेदिक औषधींच्या मात्रा वापरल्या जात आहेत. तसेच वजन वाढविणारे पदार्थ बनविणे टाळत आहे. घरातच अधूनमधून लहान मुलांसाठी शेवयाची खीर, पापड्या, खारोड्या, कुरुड्या, सातूचे पीठ असे पदार्थ उन्हाळ्यात बनविले आहेत. - राजश्री जोशी.