शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

कोरोना केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST

जिल्ह्यात दुसऱ्या टप्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडली. बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा ...

जिल्ह्यात दुसऱ्या टप्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडली. बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंत्राटी तत्त्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यात एमबीबीएस डॉक्टर्स, वॉर्डबॉय, परिचारिका, फार्मासिस्ट आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी रुग्णांवर उपचार करीत आहेत. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतन देण्यात आले. रुग्णांवर उपचार करताना स्वतःचे घर आणि स्वतःला सुरक्षित ठेवताना शासनाने विमा संरक्षण देणे अपेक्षित होते; परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले. शासनाच्या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

तीन महिन्यांचेच कंत्राट

कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना केेवळ तीन महिन्यांच्या नियुक्‍त्या देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, इतर ठिकाणी कंत्राटी स्वरूपात नियुक्त्या देताना त्या ११ महिन्यांच्या दिल्या जातात; परंतु कोरोनाकाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. तसेच गरज नसल्यास कर्मचाऱ्यांना सेवेतून कमीही केले जाते. कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शासनाकडून एक प्रकारे अन्याय केला जात आहे.

आतापर्यंत २२ जण पॉझिटिव्ह

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असताना आतापर्यंत २२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाबाधित झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांचे अनुभव क्लेशकारक आहेत. काही कर्मचाऱ्यांना बेडसाठी झगडावे लागले. कमी वेतन दिले जात असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेणेही या कर्मचाऱ्यांना न परवडणारे आहे.आणि शासकीय रुग्णालय फारसे गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासकीय सेवेत सामावून घ्या

कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळात आरोग्य सेवा देणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, अशी कर्मचाऱ्यांची पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना साडेअकरा महिन्यांची नियुक्ती दिली जात नाही. शासनाच्या भूमिकेमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्येच असुरक्षिततेची भावना आहे.

आरोग्य सेवेत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा केवळ शासनाकडून वापर केला जात आहे. या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीप्रमाणे वेतनही दिले जात नाही. कर्मचाऱ्यांचा विमा उतरविला नाही. तेव्हा या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करणे आवश्यक आहे.

- संतोष भांडे, अध्यक्ष, महामारी योद्धा संघटना

कोरोनाकाळात आम्ही जिवावर उदार होऊन काम करीत आहोत. तेव्हा आमच्या कामाची दखल शासनाने घेतली पाहिजे. कामाप्रमाणे दाम द्यावे. तसेच शासकीय सेवेत कायम करावे.

- लता चिभडे

कोरोनाच्या संसर्ग काळात केवळ तीन महिन्यांची नियुक्ती दिली जात आहे. आमच्याकडून काम करून घेतले जाते. परंतु, नोकरीची हमी नाही. विशेष म्हणजे आम्हाला विमा संरक्षणही नाही.

- राजेश राठोड