शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST

जिल्ह्यात दुसऱ्या टप्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडली. बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा ...

जिल्ह्यात दुसऱ्या टप्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडली. बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंत्राटी तत्त्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यात एमबीबीएस डॉक्टर्स, वॉर्डबॉय, परिचारिका, फार्मासिस्ट आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी रुग्णांवर उपचार करीत आहेत. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतन देण्यात आले. रुग्णांवर उपचार करताना स्वतःचे घर आणि स्वतःला सुरक्षित ठेवताना शासनाने विमा संरक्षण देणे अपेक्षित होते; परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले. शासनाच्या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

तीन महिन्यांचेच कंत्राट

कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना केेवळ तीन महिन्यांच्या नियुक्‍त्या देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, इतर ठिकाणी कंत्राटी स्वरूपात नियुक्त्या देताना त्या ११ महिन्यांच्या दिल्या जातात; परंतु कोरोनाकाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. तसेच गरज नसल्यास कर्मचाऱ्यांना सेवेतून कमीही केले जाते. कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शासनाकडून एक प्रकारे अन्याय केला जात आहे.

आतापर्यंत २२ जण पॉझिटिव्ह

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असताना आतापर्यंत २२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाबाधित झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांचे अनुभव क्लेशकारक आहेत. काही कर्मचाऱ्यांना बेडसाठी झगडावे लागले. कमी वेतन दिले जात असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेणेही या कर्मचाऱ्यांना न परवडणारे आहे.आणि शासकीय रुग्णालय फारसे गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासकीय सेवेत सामावून घ्या

कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळात आरोग्य सेवा देणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, अशी कर्मचाऱ्यांची पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना साडेअकरा महिन्यांची नियुक्ती दिली जात नाही. शासनाच्या भूमिकेमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्येच असुरक्षिततेची भावना आहे.

आरोग्य सेवेत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा केवळ शासनाकडून वापर केला जात आहे. या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीप्रमाणे वेतनही दिले जात नाही. कर्मचाऱ्यांचा विमा उतरविला नाही. तेव्हा या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करणे आवश्यक आहे.

- संतोष भांडे, अध्यक्ष, महामारी योद्धा संघटना

कोरोनाकाळात आम्ही जिवावर उदार होऊन काम करीत आहोत. तेव्हा आमच्या कामाची दखल शासनाने घेतली पाहिजे. कामाप्रमाणे दाम द्यावे. तसेच शासकीय सेवेत कायम करावे.

- लता चिभडे

कोरोनाच्या संसर्ग काळात केवळ तीन महिन्यांची नियुक्ती दिली जात आहे. आमच्याकडून काम करून घेतले जाते. परंतु, नोकरीची हमी नाही. विशेष म्हणजे आम्हाला विमा संरक्षणही नाही.

- राजेश राठोड