शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केळीचे भाव कोसळले; हवालदिल शेतकऱ्याने अडीच एकरवरील बागेवर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 17:54 IST

एक हजार ते बाराशे रुपये क्विंटल केळीला भाव नेहमी असतो. मात्र सध्या तीनशे ते पाचशे  रुपयांपर्यंत भाव घसरला आहे.

ठळक मुद्देचार लाखांच्या उत्पन्नाला फटकाजोपासणा करणेही मुश्कील

पाथरी : लॉकडाऊन उठल्यानंतरही केळीचे भाव पडलेलेच आहेत. त्यामुळे शेतातील केळी  विक्रीसाठी परवडत नाही. १ हजार २०० रुपये क्विंटल  मिळणारा भाव ३०० ते ५०० रुपयापर्यंत कमी आला आहे. त्यामुळे कासापुरी येथील शेतकरी गणेश कोल्हे यांनी अडीच एकर केळी पिकावर नांगर फरविल्याने त्यांना चार लाख रुपयांचा फटका बसला आहे.

दरवर्षी केळी पिकाला चांगले मार्केट असते. त्यामुळे बागायतदार शेतकरी मोठा  खर्च करून केळी लागवड करतो. पाथरी तालुक्यात केळीचे क्षेत्र ५१० एकरवर आहे. यावर्षी  मार्च महिन्यापासून  कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु होते.  त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत कोसळली. दरम्यान केळीचे दर अचानक पडले. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील शेतकरी गणेश वशिष्ठराव कोल्हे यांनी आपल्या गट नंंबर १७५ मध्ये  कासापूरी  शिवारात जून २०१९ मध्ये अडीच एकर शेतात साडेतीन हजार केळीची झाडे लावले होती. सदरील केळीच्या झाडास वर्षभर चांगली मेहनत घेतली. केळीवर तब्बल दीड लाख रुपये खर्चही केला, मात्र  आता केळीला भावच राहिला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यावर केळी पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. एक हजार ते बाराशे रुपये क्विंटल केळीला भाव नेहमी असतो. मात्र सध्या तीनशे ते पाचशे  रुपयांपर्यंत भाव घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यास हे परवडत नाही. केळीची जोपासणा करणेही मुश्कील होऊन बसल्याने सदरील शेतकऱ्याने ५ नोव्हेंबर रोजी केळीवर नांगर फिरवला आहे. सदरील शेतकऱ्याचे यामुळे चार लाख लाखांचे नुकसान झाले आहे.

दहा वर्षात पहिल्यांदा परिस्थिती वाईटदसऱ्यानंतर केळीचे भाव कमालीचे गडगडले आहेत. व्यापारी केळीच्या फडाकडे मंदी आल्याचे करण देऊन  फिरकतच नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. केळीची बाग खरेदी केली तर अर्धा माल फेकून दिला जातो. त्यामुळे शेवटी शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. परिणामी नांगर फिरवावा लागला. कासापुरी येथील हे शेतकरी मागील 10 वर्षापासून केळीची बाग घेतात. मात्र यावर्षीसारखी परिस्थिती कधीच उद्भवली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती