शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दिवाळी सण पाहूनच एटीएम बंद आहे

By admin | Updated: October 23, 2014 14:16 IST

खरेदीची लगबग सर्वत्र दिसत असून बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी बहुतेकांची धावपळ सुरू आहे; पण शहरातील बहुतांश एटीएम नेमक्या याच वेळेवर सोमवारपासून बंद आहेत.

नांदेड : दिवाळसण सुरू झाला आहे. त्यामुळे खरेदीची लगबग सर्वत्र दिसत असून बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी बहुतेकांची धावपळ सुरू आहे; पण शहरातील बहुतांश एटीएम नेमक्या याच वेळेवर सोमवारपासून बंद असल्याचे दिसत असून ग्राहक त्रस्त झाले आहेत. 
अनेकांना नाईलाजाने शाखेत जावून रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत आहे. बँक कर्मचारीही वैतागले आहेत. आजघडीला नागरिक आपले व्यवहार बँकेमार्फत करीत असतात. रोख रक्कम सहसा जवळ नसतेच. गरज असेल तेव्हा एटीएममधून पैसे काढले जातात. गावागावात एटीएमची सेवा बँकांमार्फत केल्याने व्यवहारातही सहजता आली आहे. पण वर्षभर साथ देत असलेले एटीएम नेमके दिवाळसणाच्या मुहूर्तावर बेइमान होत असल्याचे पहावयास मिळते.
कुठल्या एकाच बँकेचे एटीएम बंद आहे असे नसून सोमवारपासून थोड्याफार फरकाने सर्वच एटीएम बंद सुरू होत आहेत. मोठय़ा आशेने पैसे काढण्यासाठी गेलेले नागरिक या कारणाने आल्यापावली माघारी फिरतात. काहीच वेळापुरते सुरू झालेले एटीएम पुन्हा थोड्या वेळात बंद पडते. बंद पडल्यावर तत्काळ संबंधितांना कळविणे अपेक्षित असताना दरवाजा बंदचा बोर्ड लावण्यात धन्यता मानली जाते. नेमके कारण काय याचा पत्ताच नाही. एटीएमच्या दरवाजावर एटीएम बंद आहे, असे फलक अडकविल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांना आल्यापावली परत फिरावे लागत आहे. लिंक नसल्याचे कारण काहीद्वारे सांगितले जाते तर बँक लिंक असल्याचे सांगतात. तसेच कॅश सोडून बाकी सर्व सुविधा सुरू आहे. 
दिवाळीमुळे सर्वांचीच खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. रोख रक्कम जवळ न बाळगता शहरात खरेदीला जाताना तेथीलच एटीएममधून पैसे काढून खरेदी करण्याचा विचार सर्वजण करीत असतात. पण शहरात आल्यावर त्यांना बंद एटीएमचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात सोमवारपासून बंद एटीएमची समस्या भेडसावत आहे. बँकेतील कर्मचारीवर्गाला याबाबत विचारले असता बँकेत लिंक फेलचा प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुम्ही एटीएमवरील नंबरवर फोन करून विचारा असे सांगितले जाते. तसेच स्वत: काही न सांगता तुम्ही खाली बसलेल्या गार्डला विचारा अशी उत्तरेही दिली जातात. त्यामुळे काय करावे? असा प्रश्न ग्राहकांना आता पडू लागला आहे. शहरातील बहुतेक एटीएम दोन दिवसांपासून सतत बंदावस्थेत आहेत. एक-दोन तासांसाठी सुरू होवून लगेचच ते पुन्हा बंद पडते. याचा सरळ परिणाम ग्राहकांना भोगावा लागत आहे. त्यांचे व्यवहार ठप्प झाले आहे. बँका कितीही कारण सांगत असल्या तरी कॅश नसल्यानेच असे प्रकार सणाच्या मुहूर्तावर घडत असल्याचे नागरिकांमधून सतत बोलल्या जात आहे. सेवा सुरळीत करावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. /(प्रतिनिधी) ■ एटीएम बंद आहे हा प्रकार ग्राहकांसाठी दिवाळीत नित्याचाच झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. कुठल्याही बँकेच्या एटीएममधून पाच वेळा पैसे काढता येतात. सहाव्या वेळी पैसे काढताना काही रक्कम वजा होते. या कारणाने शक्य होईल तेव्हा ग्राहक आपल्याच खात्याच्या एटीएममधून पैसे काढण्यावर भर देतात. दिवाळीच्या वेळी एमटीएम बंद असल्याने पाच वेळा ट्रान्झेक्शन होवूनही अनेकांना सहाव्या वेळी पैसे काढावे लागतात. परिणामी आगाऊ पैसे वजा होत असल्याने भूर्दंड सोसावा लागतो.