शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

जिल्ह्यात सार्वजनिक विहिरींची ७० कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST

परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाला पाणी टंचाईचे नियोजन करून ग्रामस्थांना बोअर, विहीर अधिग्रहण करून ...

परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाला पाणी टंचाईचे नियोजन करून ग्रामस्थांना बोअर, विहीर अधिग्रहण करून पाणी पुरवावे लागते. यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर घेण्यास मंजुरी दिली. विशेष म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या विहीर खोदण्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठी ६ लाख ९८ हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ७१८ ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजना कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले. या कार्यालयाने प्रस्तावांची छाननी करून ५४७ प्रस्तावांना तांत्रिक मान्यता दिली. २०१९-२०२० मध्ये सुरू झालेली ही योजना अद्यापही परभणी जिल्ह्यात संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ ७० विहिरी भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले आहेत. यामध्ये गंगाखेड तालुक्यात ५,जिंतूर तालुक्यात १७,मानवत ५, पालम ५, पाथरी ४, पूर्णा १२, सेल ४ तर सोनपेठ तालुक्यातील ३ विहिरींची कामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित गावातील विहिरींची कामे अर्धवट आहेत. काही गावातील विहिरींना अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे विभागीय कार्यालयाच्या वतीने ज्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. त्या उद्देशाला परभणी जिल्ह्यात हरताळ फासण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विहिरींची कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

१७३ विहिरींना लागले पाणी

सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींची कामे सध्या स्थितीत जिल्ह्यात ३३३ ठिकाणी सुरू आहेत. ७० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. तर १७३ विहिरींना पाणी लागले आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील १७३ गावातील पाणीटंचाई मिटण्यास हातभार लागणार आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील १८ तर परभणी तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे.