शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

प्रॉब्लम क्या है?

By admin | Updated: April 16, 2015 16:55 IST

समस्या येतातच, त्यांना घाबरून, बिचकून राहिलं तर प्रगती कशी होणार? नव्या काळात प्रॉब्लेम सोडवणं, पटापट सोडवून पुढचे प्रश्न हाती घेणं हेदेखील एक स्किल आहे; ते शिकायला हवं!

- सॉफ्ट स्किल
 
जीवन म्हटलं की, समस्या येणारच; असा कोण आहे जगात ज्याला काहीच समस्या नाहीत, काहीच प्रॉब्लम येत नाही. येणारी आव्हानं स्वीकारून ती यशस्वीपणो हाताळण्याची कला काहींना सहज उपजत असते, तर काहींना ती डेव्हलप करावी लागते.  
काही माणसं मात्र समस्या दिसली की बिचकतात, काहीजण तर समस्या आहे हेच नाकारतात आणि काही माणसं समस्येतच हरवून जातात की त्यांचे छोटे छोटे प्रश्नही अनेकदा खूप मोठे होतात.
त्यामुळेच आपल्याला हे कौशल्य शिकायला हवं ज्याला समस्या निरसन कौशल्य अर्थातच प्रॉब्लम सॉल्व्हिंग अॅबिलिटी असं म्हणतात. 
हे एक स्किल आहे, एक कौशल्य आहे. मात्र, हे कौशल्य काही कुणी आपल्याला शाळा कॉलेजात शिकवत नाही.  जो तो आपल्याला जमेल तसं हे कौशल्य शिकतो, काहीजण मात्र कायम गांगरलेलेच राहतात.
मात्र या प्रक्रियेकडे आपण कधी नीट शांतपणो पाहत नाही.
एखादा  प्रश्न, समस्या आपल्यासमोर येते म्हणजे नेमकं काय होतं? अशी समस्या समोर आली की, आपण काय करतो, काय रिअॅक्शन देतो, हे जरा बारकाईनं बघा!
खरंतर आपण अनेकदा घोळ घालतो त्यापेक्षा ही एक सोपी प्रक्रिया आहे, असं या कौशल्याकडे पहायला हवं. म्हणजे काय तर समोर असलेला प्रॉब्लम नेमका काय आहे हे    अचूक ओळखणं, ही पहिली पायरी. तो प्रश्न समजून घेऊन त्याच्या मुळाशी पोचणं आणि योग्य आकलन करून घेऊन  ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणं, सोडवणं हा पुढचा टप्पा! 
प्रश्न नेमका कळला, समस्या आहे तेवढीच नीट पाहता आली तर तिचं उत्तरे शोधणंही तुलनेनं सोपं होतं!
ते सोपं व्हावं म्हणून या काही गोष्टी फक्त अंगीकारता यायला हव्यात!
ये है प्रॉब्लम.
मग सोडवा तो!
1) समस्या समजून घेणं, तिला मागचा पुढचा संदर्भ न देता ती आहे तेवढीच पाहता येणं फार महत्त्वाचं! कधी-कधी आपल्याला समस्या स्पष्टपणो कळतं की समस्या नेमकी काय आहे, कधी-कधी कळतच नाही. अशा वेळी घाई न करता, लगेच रिअॅक्ट न होता आधी समस्या चोख समजून घ्या. समस्या समजली तरच योग्य निरसन करता येईल, नाहीतर नाही.
2) पूर्वीची धोरणं बाजूला ठेवून समस्येकडे पहा. अनेकदा आपण आधीच एखाद्या परिस्थितीविषयी धोरण बांधून ठेवलेले असते. म्हणजे काय तर आपलं मत, आपली भूमिका तयार असते, त्यात आपल्याला बदल करायचा नसतो. त्यामुळे आपण नव्याने समस्येकडे न पाहता जुन्याच पद्धतीनं समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. असे न करता नव्या नजरेने समस्येचा आढावा घ्या.
3) प्रश्न आहे ना, तो सोडवायचा आहे असं समजून विचार करा. एखादा भन्नाट विचार डोक्यात आला, तुम्हाला तो फालतू वाटला तरी लिहून ठेवा, काय सांगावं तोच उपाय तुमचं काम सोपं करेल. मनाच्या खिडक्या उघडा, हेच सूत्र.  
4) आहे ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला सुचलेल्या सर्व पर्यायांचे सविस्तर विश्लेषण करा. यातील कोणता उपाय उत्तम ठरू शकेल हे पडताळून पहा.  घाई अजिबात करू  नका. शांतपणो निर्णय घ्या.
5)  गरज भासल्यास चार लोकांशी चर्चा करा, त्यांचे मत घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा: नेहमी स्वत: विचार आधी करावा,  मगच लोकांचं मत घ्यावं. निर्णय हा नेहमी तुमचा असला पाहिजे.
6) तुम्ही निवडलेल्या मार्गाने समस्या सुटली नाही किंवा काही अनपेक्षित अडथळे आले, तर काय करायचं याचाही अंदाज घ्या.
7) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चिकाटी ठेवा! कधी-कधी समस्या किचकट असतात. आपण धीर धरून तिचा पाठपुरावा करणं गरजेचं असतं. जिद्द ठेवली तर हे कौशल्य शिकणं काही अवघड नाही!
समिंदरा हर्डीकर-सावंत