शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉब्लम क्या है?

By admin | Updated: April 16, 2015 16:55 IST

समस्या येतातच, त्यांना घाबरून, बिचकून राहिलं तर प्रगती कशी होणार? नव्या काळात प्रॉब्लेम सोडवणं, पटापट सोडवून पुढचे प्रश्न हाती घेणं हेदेखील एक स्किल आहे; ते शिकायला हवं!

- सॉफ्ट स्किल
 
जीवन म्हटलं की, समस्या येणारच; असा कोण आहे जगात ज्याला काहीच समस्या नाहीत, काहीच प्रॉब्लम येत नाही. येणारी आव्हानं स्वीकारून ती यशस्वीपणो हाताळण्याची कला काहींना सहज उपजत असते, तर काहींना ती डेव्हलप करावी लागते.  
काही माणसं मात्र समस्या दिसली की बिचकतात, काहीजण तर समस्या आहे हेच नाकारतात आणि काही माणसं समस्येतच हरवून जातात की त्यांचे छोटे छोटे प्रश्नही अनेकदा खूप मोठे होतात.
त्यामुळेच आपल्याला हे कौशल्य शिकायला हवं ज्याला समस्या निरसन कौशल्य अर्थातच प्रॉब्लम सॉल्व्हिंग अॅबिलिटी असं म्हणतात. 
हे एक स्किल आहे, एक कौशल्य आहे. मात्र, हे कौशल्य काही कुणी आपल्याला शाळा कॉलेजात शिकवत नाही.  जो तो आपल्याला जमेल तसं हे कौशल्य शिकतो, काहीजण मात्र कायम गांगरलेलेच राहतात.
मात्र या प्रक्रियेकडे आपण कधी नीट शांतपणो पाहत नाही.
एखादा  प्रश्न, समस्या आपल्यासमोर येते म्हणजे नेमकं काय होतं? अशी समस्या समोर आली की, आपण काय करतो, काय रिअॅक्शन देतो, हे जरा बारकाईनं बघा!
खरंतर आपण अनेकदा घोळ घालतो त्यापेक्षा ही एक सोपी प्रक्रिया आहे, असं या कौशल्याकडे पहायला हवं. म्हणजे काय तर समोर असलेला प्रॉब्लम नेमका काय आहे हे    अचूक ओळखणं, ही पहिली पायरी. तो प्रश्न समजून घेऊन त्याच्या मुळाशी पोचणं आणि योग्य आकलन करून घेऊन  ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणं, सोडवणं हा पुढचा टप्पा! 
प्रश्न नेमका कळला, समस्या आहे तेवढीच नीट पाहता आली तर तिचं उत्तरे शोधणंही तुलनेनं सोपं होतं!
ते सोपं व्हावं म्हणून या काही गोष्टी फक्त अंगीकारता यायला हव्यात!
ये है प्रॉब्लम.
मग सोडवा तो!
1) समस्या समजून घेणं, तिला मागचा पुढचा संदर्भ न देता ती आहे तेवढीच पाहता येणं फार महत्त्वाचं! कधी-कधी आपल्याला समस्या स्पष्टपणो कळतं की समस्या नेमकी काय आहे, कधी-कधी कळतच नाही. अशा वेळी घाई न करता, लगेच रिअॅक्ट न होता आधी समस्या चोख समजून घ्या. समस्या समजली तरच योग्य निरसन करता येईल, नाहीतर नाही.
2) पूर्वीची धोरणं बाजूला ठेवून समस्येकडे पहा. अनेकदा आपण आधीच एखाद्या परिस्थितीविषयी धोरण बांधून ठेवलेले असते. म्हणजे काय तर आपलं मत, आपली भूमिका तयार असते, त्यात आपल्याला बदल करायचा नसतो. त्यामुळे आपण नव्याने समस्येकडे न पाहता जुन्याच पद्धतीनं समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. असे न करता नव्या नजरेने समस्येचा आढावा घ्या.
3) प्रश्न आहे ना, तो सोडवायचा आहे असं समजून विचार करा. एखादा भन्नाट विचार डोक्यात आला, तुम्हाला तो फालतू वाटला तरी लिहून ठेवा, काय सांगावं तोच उपाय तुमचं काम सोपं करेल. मनाच्या खिडक्या उघडा, हेच सूत्र.  
4) आहे ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला सुचलेल्या सर्व पर्यायांचे सविस्तर विश्लेषण करा. यातील कोणता उपाय उत्तम ठरू शकेल हे पडताळून पहा.  घाई अजिबात करू  नका. शांतपणो निर्णय घ्या.
5)  गरज भासल्यास चार लोकांशी चर्चा करा, त्यांचे मत घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा: नेहमी स्वत: विचार आधी करावा,  मगच लोकांचं मत घ्यावं. निर्णय हा नेहमी तुमचा असला पाहिजे.
6) तुम्ही निवडलेल्या मार्गाने समस्या सुटली नाही किंवा काही अनपेक्षित अडथळे आले, तर काय करायचं याचाही अंदाज घ्या.
7) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चिकाटी ठेवा! कधी-कधी समस्या किचकट असतात. आपण धीर धरून तिचा पाठपुरावा करणं गरजेचं असतं. जिद्द ठेवली तर हे कौशल्य शिकणं काही अवघड नाही!
समिंदरा हर्डीकर-सावंत