शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

प्रॉब्लम क्या है?

By admin | Updated: April 16, 2015 16:55 IST

समस्या येतातच, त्यांना घाबरून, बिचकून राहिलं तर प्रगती कशी होणार? नव्या काळात प्रॉब्लेम सोडवणं, पटापट सोडवून पुढचे प्रश्न हाती घेणं हेदेखील एक स्किल आहे; ते शिकायला हवं!

- सॉफ्ट स्किल
 
जीवन म्हटलं की, समस्या येणारच; असा कोण आहे जगात ज्याला काहीच समस्या नाहीत, काहीच प्रॉब्लम येत नाही. येणारी आव्हानं स्वीकारून ती यशस्वीपणो हाताळण्याची कला काहींना सहज उपजत असते, तर काहींना ती डेव्हलप करावी लागते.  
काही माणसं मात्र समस्या दिसली की बिचकतात, काहीजण तर समस्या आहे हेच नाकारतात आणि काही माणसं समस्येतच हरवून जातात की त्यांचे छोटे छोटे प्रश्नही अनेकदा खूप मोठे होतात.
त्यामुळेच आपल्याला हे कौशल्य शिकायला हवं ज्याला समस्या निरसन कौशल्य अर्थातच प्रॉब्लम सॉल्व्हिंग अॅबिलिटी असं म्हणतात. 
हे एक स्किल आहे, एक कौशल्य आहे. मात्र, हे कौशल्य काही कुणी आपल्याला शाळा कॉलेजात शिकवत नाही.  जो तो आपल्याला जमेल तसं हे कौशल्य शिकतो, काहीजण मात्र कायम गांगरलेलेच राहतात.
मात्र या प्रक्रियेकडे आपण कधी नीट शांतपणो पाहत नाही.
एखादा  प्रश्न, समस्या आपल्यासमोर येते म्हणजे नेमकं काय होतं? अशी समस्या समोर आली की, आपण काय करतो, काय रिअॅक्शन देतो, हे जरा बारकाईनं बघा!
खरंतर आपण अनेकदा घोळ घालतो त्यापेक्षा ही एक सोपी प्रक्रिया आहे, असं या कौशल्याकडे पहायला हवं. म्हणजे काय तर समोर असलेला प्रॉब्लम नेमका काय आहे हे    अचूक ओळखणं, ही पहिली पायरी. तो प्रश्न समजून घेऊन त्याच्या मुळाशी पोचणं आणि योग्य आकलन करून घेऊन  ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणं, सोडवणं हा पुढचा टप्पा! 
प्रश्न नेमका कळला, समस्या आहे तेवढीच नीट पाहता आली तर तिचं उत्तरे शोधणंही तुलनेनं सोपं होतं!
ते सोपं व्हावं म्हणून या काही गोष्टी फक्त अंगीकारता यायला हव्यात!
ये है प्रॉब्लम.
मग सोडवा तो!
1) समस्या समजून घेणं, तिला मागचा पुढचा संदर्भ न देता ती आहे तेवढीच पाहता येणं फार महत्त्वाचं! कधी-कधी आपल्याला समस्या स्पष्टपणो कळतं की समस्या नेमकी काय आहे, कधी-कधी कळतच नाही. अशा वेळी घाई न करता, लगेच रिअॅक्ट न होता आधी समस्या चोख समजून घ्या. समस्या समजली तरच योग्य निरसन करता येईल, नाहीतर नाही.
2) पूर्वीची धोरणं बाजूला ठेवून समस्येकडे पहा. अनेकदा आपण आधीच एखाद्या परिस्थितीविषयी धोरण बांधून ठेवलेले असते. म्हणजे काय तर आपलं मत, आपली भूमिका तयार असते, त्यात आपल्याला बदल करायचा नसतो. त्यामुळे आपण नव्याने समस्येकडे न पाहता जुन्याच पद्धतीनं समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. असे न करता नव्या नजरेने समस्येचा आढावा घ्या.
3) प्रश्न आहे ना, तो सोडवायचा आहे असं समजून विचार करा. एखादा भन्नाट विचार डोक्यात आला, तुम्हाला तो फालतू वाटला तरी लिहून ठेवा, काय सांगावं तोच उपाय तुमचं काम सोपं करेल. मनाच्या खिडक्या उघडा, हेच सूत्र.  
4) आहे ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला सुचलेल्या सर्व पर्यायांचे सविस्तर विश्लेषण करा. यातील कोणता उपाय उत्तम ठरू शकेल हे पडताळून पहा.  घाई अजिबात करू  नका. शांतपणो निर्णय घ्या.
5)  गरज भासल्यास चार लोकांशी चर्चा करा, त्यांचे मत घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा: नेहमी स्वत: विचार आधी करावा,  मगच लोकांचं मत घ्यावं. निर्णय हा नेहमी तुमचा असला पाहिजे.
6) तुम्ही निवडलेल्या मार्गाने समस्या सुटली नाही किंवा काही अनपेक्षित अडथळे आले, तर काय करायचं याचाही अंदाज घ्या.
7) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चिकाटी ठेवा! कधी-कधी समस्या किचकट असतात. आपण धीर धरून तिचा पाठपुरावा करणं गरजेचं असतं. जिद्द ठेवली तर हे कौशल्य शिकणं काही अवघड नाही!
समिंदरा हर्डीकर-सावंत