शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

त्यांच्यासाठी जीव तुटणारच ना.

By admin | Updated: September 10, 2015 21:34 IST

उद्या पोळा. जिवाभावाच्या बैलजोडय़ांना सजवून धजवून गोड घास खाऊ घालायचा सण. पण उद्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट आहे, मात्र तरीही खेडय़ापाडय़ातले शिकलेसवरलेले तरुण दोस्त आपल्या मुक्या दोस्ताचा सण गोड व्हावा म्हणून झटताहेत. त्या अनोख्या दोस्तीची ही गोष्ट.

 पदवी म्हणजे नोकरीची संधी. शिकल्यासवरल्या मुलांना नको वाटतं मातीत हात घालणं. त्यात यंदाचा दुष्काळ. शेती करणं अवघड झालंय. माणसं शहराकडं पळताहेत. आणि जिथं दुष्काळी भागात प्यायला पाणी नाही तिथं जनावरांचं काय होणार म्हणत माणसांना आपल्या गुराढोरांच्या चारापाण्याची काळजी लागून राहिली आहे.

त्यात उद्या पोळा !
दरवर्षी किती आनंद असतो या सणाला. बैलांचे पाय धुवायला का होईना पण पाऊस येतो असा गावखेडय़ात अनेकांचा पक्का विश्वास असतो. पण यंदा पोळ्यावरही दुष्काळाचं सावट आहे. 
मात्र ही उदासी झटकून याही वातावरणात काही तरुण शेतकरी भर उन्हात, काळ्याकुट्ट ढेकळात बैलजोडीसोबत राबताहेत. त्यांना जनावरांचाही असा काही लळा की मायेच्या माणसागत जीव लावून ते या मुक्या प्राण्यांसोबत जगताहेत.
क:हाड तालुक्यातील काले गावचा राहुल देसाई हा पदवीधर युवक़ राहुलने 2क्क्3 साली कला शाखेची पदवी घेतली. तत्पूर्वी त्याने रत्नागिरीतील एका महाविद्यालयातून डी.एड. पदवीही ग्रहण केलेली; पण बी.ए., डी.एड. असूनही राहुल सध्या शेती करतोय. स्वत:च्या सहा एकर शेतीत तो घाम गाळतोय. राहुल आठ वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे वडिलोपाजिर्त शेतीची जबाबदारी राहुलची आई सुमन व आजोबा गंगाराम यांच्या खांद्यावर येऊन पडली. त्यांनी कशीबशी ती जबाबदारी पेलली. राहुल शिकूनसवरून मोठा होईल, कुठेतरी त्याला नोकरी मिळेल अशी आईची अपेक्षा होती; मात्र राहुल शेतीमध्ये रमला. सात एकर बागायत शेतीची जबाबदारी त्याने स्वत:वर घेतली. शेतीत मशागत करायची तर त्यासाठी बैलजोडी हवी. त्यामुळे राहुलने 2क्क्9 साली सांगोला व इस्लामपूर येथून एक बैलजोडी घेतली. या बैलजोडीने त्याचे कुटुंब सावरले. बैलांच्या माध्यमातून राहुलने शिवारात कष्टाचं पीक घेतलं. या बैलजोडीबरोबरच कालांतराने त्याने इतर जनावरेही विकत घेतली. त्यामुळे शेतीच्या जोडीला आता तो दुग्धोत्पादनही घेतोय. शेती करत असताना जनावरांची चांगली जपणूक व्हावी यासाठी तो दररोज धडपडतोय. जनावरांना वेळेत चारा, पाणी देताना व स्वच्छता राखताना त्याला वेळेचंही भान राहत नाही. 
कष्टाशिवाय मातीला आणि बैलांशिवाय शेतीला पर्याय नाही. राहुल देसाई ‘लोकमत’शी बोलताना सांगत होता, ‘‘शेती सांभाळून आई आणि आजोबांना जनावरं सांभाळणं शक्य नव्हतं; पण ज्यावेळी मी शेतीत लक्ष घातले त्यावेळी मला जनावरांचं महत्त्व समजलं. बैलजोडीमुळे माङया घराला घरपण मिळालं.’’
 
खराडेतील सोनाली जाधव हीसुद्धा पदवीधर युवती; पण तिनेही शिवार आपलंसं केलंय. ती म्हणते, ‘‘सुशिक्षित आहे म्हणून काय झालं ? शेती आमची आहे. त्या शेतीत राबणारी बैलजोडीही आमची आहे. मग त्या बैलांची काळजी घेणंही आमचं काम आहे. या बैलजोडीची काळजी घेताना मला कमीपणा वाटायची काय गरज?’’   2क्14 साली सोनालीने कला शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर इतर कोर्स करून तिला नोकरी मिळवता आली असती. मात्र, शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सोनालीला शेतीतच रस वाटला. आपल्या आई, वडील व भावांसमवेत तीही शेतात राबते. गरज पडलीच तर स्वत: आपली बैलजोडी घेऊन शेतात जाते. 
बैलजोडीविषयी सांगताना सोनाली म्हणते, ‘‘बेंदरादिवशी सजवलेली आमच्या सर्जा- राजाची जोडी गावातल्या इतर बैलजोडींपेक्षा उठून दिसते. रंगीबेरंगी झालर, गोंडे, झूल, बाशिंग, घुंगूरपट्टी आणि नखशिखांत सजवलेली ही जोडी गावातून फिरते त्यावेळी माझा मलाच अभिमान वाटतो. त्यांची सजावट मी स्वत: करते. ती करताना माझं मन आनंदाने भरून येतं. त्यावेळचं त्यांचं रूप खरंच वेगळं असतं. आमच्यासाठी ही जनावरंही आमची जिवाभावाचीच दोस्त आहेत !’’
 
दुष्काळाच्या, चारा छावण्यांच्या बातम्या येतात; पण स्वत: जेवण्याआधी गुरांचं चारापाणी पाहणा:या, त्यांना औषधपाणी करणा:या खेडय़ापाडय़ातल्या या दोस्तांविषयी कुणी बोलत नाही ! यंदा पाऊस कमी झाला, हातात चणचण असेलच; पण तरीही खेडय़ापाडय़ात आपल्या जनावरांसाठी जीव टाकणारी बरीच तरुण मंडळी भेटतात.
त्यांच्या गावात उद्या पोळा फुटेल, तेव्हा पावसाचीही बरसात झाली, तर भरून पावतील सारेच !