शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्यासाठी जीव तुटणारच ना.

By admin | Updated: September 10, 2015 21:34 IST

उद्या पोळा. जिवाभावाच्या बैलजोडय़ांना सजवून धजवून गोड घास खाऊ घालायचा सण. पण उद्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट आहे, मात्र तरीही खेडय़ापाडय़ातले शिकलेसवरलेले तरुण दोस्त आपल्या मुक्या दोस्ताचा सण गोड व्हावा म्हणून झटताहेत. त्या अनोख्या दोस्तीची ही गोष्ट.

 पदवी म्हणजे नोकरीची संधी. शिकल्यासवरल्या मुलांना नको वाटतं मातीत हात घालणं. त्यात यंदाचा दुष्काळ. शेती करणं अवघड झालंय. माणसं शहराकडं पळताहेत. आणि जिथं दुष्काळी भागात प्यायला पाणी नाही तिथं जनावरांचं काय होणार म्हणत माणसांना आपल्या गुराढोरांच्या चारापाण्याची काळजी लागून राहिली आहे.

त्यात उद्या पोळा !
दरवर्षी किती आनंद असतो या सणाला. बैलांचे पाय धुवायला का होईना पण पाऊस येतो असा गावखेडय़ात अनेकांचा पक्का विश्वास असतो. पण यंदा पोळ्यावरही दुष्काळाचं सावट आहे. 
मात्र ही उदासी झटकून याही वातावरणात काही तरुण शेतकरी भर उन्हात, काळ्याकुट्ट ढेकळात बैलजोडीसोबत राबताहेत. त्यांना जनावरांचाही असा काही लळा की मायेच्या माणसागत जीव लावून ते या मुक्या प्राण्यांसोबत जगताहेत.
क:हाड तालुक्यातील काले गावचा राहुल देसाई हा पदवीधर युवक़ राहुलने 2क्क्3 साली कला शाखेची पदवी घेतली. तत्पूर्वी त्याने रत्नागिरीतील एका महाविद्यालयातून डी.एड. पदवीही ग्रहण केलेली; पण बी.ए., डी.एड. असूनही राहुल सध्या शेती करतोय. स्वत:च्या सहा एकर शेतीत तो घाम गाळतोय. राहुल आठ वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे वडिलोपाजिर्त शेतीची जबाबदारी राहुलची आई सुमन व आजोबा गंगाराम यांच्या खांद्यावर येऊन पडली. त्यांनी कशीबशी ती जबाबदारी पेलली. राहुल शिकूनसवरून मोठा होईल, कुठेतरी त्याला नोकरी मिळेल अशी आईची अपेक्षा होती; मात्र राहुल शेतीमध्ये रमला. सात एकर बागायत शेतीची जबाबदारी त्याने स्वत:वर घेतली. शेतीत मशागत करायची तर त्यासाठी बैलजोडी हवी. त्यामुळे राहुलने 2क्क्9 साली सांगोला व इस्लामपूर येथून एक बैलजोडी घेतली. या बैलजोडीने त्याचे कुटुंब सावरले. बैलांच्या माध्यमातून राहुलने शिवारात कष्टाचं पीक घेतलं. या बैलजोडीबरोबरच कालांतराने त्याने इतर जनावरेही विकत घेतली. त्यामुळे शेतीच्या जोडीला आता तो दुग्धोत्पादनही घेतोय. शेती करत असताना जनावरांची चांगली जपणूक व्हावी यासाठी तो दररोज धडपडतोय. जनावरांना वेळेत चारा, पाणी देताना व स्वच्छता राखताना त्याला वेळेचंही भान राहत नाही. 
कष्टाशिवाय मातीला आणि बैलांशिवाय शेतीला पर्याय नाही. राहुल देसाई ‘लोकमत’शी बोलताना सांगत होता, ‘‘शेती सांभाळून आई आणि आजोबांना जनावरं सांभाळणं शक्य नव्हतं; पण ज्यावेळी मी शेतीत लक्ष घातले त्यावेळी मला जनावरांचं महत्त्व समजलं. बैलजोडीमुळे माङया घराला घरपण मिळालं.’’
 
खराडेतील सोनाली जाधव हीसुद्धा पदवीधर युवती; पण तिनेही शिवार आपलंसं केलंय. ती म्हणते, ‘‘सुशिक्षित आहे म्हणून काय झालं ? शेती आमची आहे. त्या शेतीत राबणारी बैलजोडीही आमची आहे. मग त्या बैलांची काळजी घेणंही आमचं काम आहे. या बैलजोडीची काळजी घेताना मला कमीपणा वाटायची काय गरज?’’   2क्14 साली सोनालीने कला शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर इतर कोर्स करून तिला नोकरी मिळवता आली असती. मात्र, शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सोनालीला शेतीतच रस वाटला. आपल्या आई, वडील व भावांसमवेत तीही शेतात राबते. गरज पडलीच तर स्वत: आपली बैलजोडी घेऊन शेतात जाते. 
बैलजोडीविषयी सांगताना सोनाली म्हणते, ‘‘बेंदरादिवशी सजवलेली आमच्या सर्जा- राजाची जोडी गावातल्या इतर बैलजोडींपेक्षा उठून दिसते. रंगीबेरंगी झालर, गोंडे, झूल, बाशिंग, घुंगूरपट्टी आणि नखशिखांत सजवलेली ही जोडी गावातून फिरते त्यावेळी माझा मलाच अभिमान वाटतो. त्यांची सजावट मी स्वत: करते. ती करताना माझं मन आनंदाने भरून येतं. त्यावेळचं त्यांचं रूप खरंच वेगळं असतं. आमच्यासाठी ही जनावरंही आमची जिवाभावाचीच दोस्त आहेत !’’
 
दुष्काळाच्या, चारा छावण्यांच्या बातम्या येतात; पण स्वत: जेवण्याआधी गुरांचं चारापाणी पाहणा:या, त्यांना औषधपाणी करणा:या खेडय़ापाडय़ातल्या या दोस्तांविषयी कुणी बोलत नाही ! यंदा पाऊस कमी झाला, हातात चणचण असेलच; पण तरीही खेडय़ापाडय़ात आपल्या जनावरांसाठी जीव टाकणारी बरीच तरुण मंडळी भेटतात.
त्यांच्या गावात उद्या पोळा फुटेल, तेव्हा पावसाचीही बरसात झाली, तर भरून पावतील सारेच !