शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल ड्रिंकच्या पाटर्य़ा

By admin | Updated: August 13, 2015 15:19 IST

ग्रामीण भागात काहीजण माळकरी असतात. ते व्यसनापासून लांब राहतात. वडीलधा-या माणसांचा थोडा धाकही असतो. शहरात तसं नसतं. इथं पर्याय अनेक, धाक कमी, दबाव कमी, आणि विरोधही कमी! त्यामुळे दारू ही फॅशन बनते.

‘माझे एक जरा प्रौढ मित्र. त्यांची ही गोष्ट. ते एकदा कुठल्या तरी आध्यात्मिक अधिक योगशिबिराला गेले होते. तिथल्या शिकवण्याने अत्यंत प्रभावित झाले. तिथे जी गोष्ट करायला सांगितली ती आचरणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या शिबिरात त्यांनी सांगितलं होतं की, एकदा मुलं करती-सवरती झाली की घरात आपण पाहुण्यासारखं राहायचं. एरवी घरातील प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे (म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे) व्हावी असं त्यांना वाटत असे. त्यामुळे घरात वाद होत. पण शिबिरातून आल्यानंतर त्यांनी काटेकोर स्वभाव बाजूला ठेवला आणि पाहुण्यासारखे राहायला सुरुवात केली. घरातल्या कुठल्याच गोष्टीत लक्ष घालणं बंद झालं. सून तर फारच खूश झाली.

जी नवी जीवनशैली तुम्ही आत्मसात केली आहे ती तशीच राहावी म्हणून महिन्यातून दोनदा कुणाकडे तरी सत्संग करा. भजनं म्हणा, योगा करा असंही त्यांना सांगितलं होतं. ते तसंही करू लागले. त्यांचे कुटुंबीय त्यांच्यातल्या या बदलानं चकित झाले होते. पण एक दिवस एक घटना घडली. तशी छोटीशीच होती. विजेचं बिल दोन महिन्यात भरलं नव्हतं म्हणून वीज तोडायला माणसं आली. हे घरातच होते. त्यांची जी चिडचिड झाली त्याला तोडच नाही. आणि आपण घरात  पाहुणे आहोत हेच ते विसरले आणि थेट पहिल्यासारखे वागू लागले. जाम संतापले!’ 
- ढवळे सर सांगत होते. थांबून मलाच त्यांनी विचारलं, आता सांगा, असं का झालं असावं?
कदाचित हे वीज तोडणे प्रकरण त्यांना सहन झालं नसावं आणि त्यांच्या संयमाचा बांध फुटला असावा.
बरोबर. आता विचारात घ्या, की जो माणूस चांगला शिकला सावरला आहे त्याच्यावरही बंधनं घातली की कधीतरी ती तोडण्याची अनावर ऊर्मी येते आणि त्यानं स्वत:ने जे ठरवलंय ते तो विसरतो आणि पुन्हा मूळच्या वागण्याकडे परततो. तुम्हाला किती तरी उदाहरणो देता येतील. नियमित व्यायाम करणं, डाएट करणं, रोज सकाळी फिरायला जाणं अशा कित्येक गोष्टी करायच्या असं स्वत:वर अनेकजण बंधन घालून घेतात. पण कधी कंटाळा, कधी आळस, कधी घरी पाहुणो आले म्हणून त्या नियमात खंड पडतो. आणि काही दिवसांनी आपण काय ठरवलं होतं तेसुद्धा विसरून जायला होतं.
ही सामान्य माणसाची नित्य कथा! तर व्यसनाधीन झालेल्या माणसाला त्याच्यावरची बंधनं पाळता पाळता नाकीनऊ येतात आणि आपण आजारी व्यक्ती आहोत, आपल्या मेंदूत मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत हे विसरून तो नियम तोडण्याला योग्य अशी परिस्थिती निर्माण करतो.
सर्व व्यसनी माणसांचे तीन महत्त्वाचे शत्रू असतात. काम, क्रोध आणि मोह. या प्रत्येक भावनेशी त्याचं एक प्रकारचं नातं असतं आणि ते मेंदूत कोरलं गेलेलं असतं. त्यामुळे जरा बारीकशी ठिणगी पडायचा अवकाश की न आवरता येणारा मोह येतोच पुढे. आणि मग पुन्हा ‘ये रे माङया  मागल्या..’ अशी अवस्था होते.
पण मग ही शक्यता सगळ्याच माणसांबाबत खरी म्हणायला हवी. ग्रामीण भागातून आलेल्या, कमी शिकलेल्या माणसांचं असंच होत असेल; फक्त शिकल्यासवरल्यांचंच जास्त होतं असं कसं म्हणता येईल? - माझा भाबडा प्रश्न.
आपल्याकडे ग्रामीण भागात अनेक माळकरी असतात. कुटुंबात वडीलधारी माणसांची थोडी का होईना जरब असते. काही महिने जर ते व्यसनमुक्त राहिले तर व्यसनमुक्त जीवनाचा आनंद त्यांना मिळतो. आणि त्याला ते सरावतात. तसंच गावाकडे बहुतेक सर्व माणसं एकमेकांना ओळखतात. त्यांचाही अप्रत्यक्ष दबाव असतो. अर्थात सगळ्याच घरी हे वातावरण असतंच असं नाही. पण असतं बहुतांश हे खरं.
पण शहरी भागात प्रलोभनं जास्त असतात. पंचतारांकित हॉटेलपासून हातभट्टीपर्यंत सगळे पर्याय उपलब्ध असतात. शहरी भागातल्या महिलाही काही दारूविरोधी आंदोलनं वगैरे करताना दिसत नाहीत. आणि मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग यांची व्यसनं दाबून ठेवली जातात. त्यामुळे बाहेरून मदत मिळण्याचे प्रमाणही कमी, तसे मार्गही ते शोधत नाहीत.
विभक्त कुटुंब व्यवस्था, दारूची सहज उपलब्धी, घरच्यांचा आजार झाकायचे केविलवाणो प्रयत्न, हल्ली सगळेच पितात हा वाढता सामाजिक दृष्टिकोन, अनेक ठिकाणी दारू ही प्रतिष्ठेचा अपरिहार्य भाग, कार्पोरेट क्षेत्रतल्या साप्ताहिक पाटर्य़ा या सा:यांत आता पुरुषच काय महिलांमध्येही व्यसन करण्याचं प्रमाण वाढत आहे. अशा मोहमयी दुनियेत स्वत: व्यसन न करण्याचा इरादा किती अवघड असेल, आणि अनेकांचा वारंवार मोडूनही पडत असेल का?
विचार करायला हवा.
 
व्यसन सुटत का नाही?
*व्यसन हा एक आजार आहे आणि तो आपल्याला झाला आहे हे व्यसनी मंडळी सोयीस्करपणो विसरतात.
*स्वत:वर बरीच बंधने घालणं त्यांना जमत नाही.
*शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रिकव्हरीचं प्रमाण जास्त असतं. याचे मुख्य कारण त्यांची उपचारांवर श्रद्धा असते.
*शहरी आणि निम-शहरी भागात प्रायव्हसीच्या कल्पनेमुळे इतर सामाजिक दबाव कमी असतो.
*मोहाच्या क्षणांना आवरणं आणि स्वत:ला सावरणं हे व्यसनमुक्तीचं मुख्य सूत्र आहे.
 
 
- मनोज कौशिक 
सहकार्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणो