शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

हाफ चेंज तो कमी महत्त्वाचा कसा?

By admin | Updated: July 10, 2014 19:16 IST

तसं बघितलं गेल्यास मी ‘लोकमत’चा नियमित वाचक, पण मधल्या काळात कामाच्या व्यापात वाचण्यातला सातत्यपणा कमी झाला असला तरी लोकमतबरोबर येणा-या ‘ऑक्सिजन’ पुरवणीची मी आजही दर शुक्रवारी आतुरतेने वाट पहातो.

 

- दीपक म्हस्के
 
तसं बघितलं गेल्यास मी ‘लोकमत’चा नियमित वाचक, पण मधल्या काळात कामाच्या व्यापात वाचण्यातला सातत्यपणा कमी झाला असला तरी लोकमतबरोबर येणा-या ‘ऑक्सिजन’ पुरवणीची मी आजही दर शुक्रवारी आतुरतेने वाट पहातो. ‘ऑक्सिजन’मध्ये अलीकडेच मी ‘आम्ही पाहिला बदल’ या शीर्षकाचा स्वाती चक्रवर्ती यांचा लेख वाचल्याचं आठवतं.
तो लेख वाचत असताना मी पण माङया भूतकाळात शिरलो. आणि माङया डोळ्यासमोर उभं ठाकलं माझं गाव. भोकर तालुक्यात महाराष्ट्र व आंध्रच्या सीमेवर वसलेलं छोटंसं खेडं. खेडं कसले 3क् ते 35 घरांची वस्ती. याच वस्तीला लागून दोन तांडे म्हणजे बंजारा समाज. तसं पाहिल्यास भोकर तालुका माळरानात वसलेला, सिंचनाची कुठलीही व्यवस्था नसलेला, विकासापासून कोसो दूर. अशा या गावात एम.एस.डब्ल्यू.ची पदवी घेऊन मी पाऊल ठेवलं तेव्हाचा हा अनुभव.  
गावातील एखाद्या व्यक्तीकडून काही गुन्हा, अपराध झाला किंवा भांडणं झाली तर त्याची तक्रार पोलीस स्टेशनर्पयत न जाता ती पंचायतीच्या माध्यमातून त्या तक्रारीचे निवारण केलं जातं. सदर तक्रारीत संबंधित व्यक्ती दोषी आढळला की, त्याला गावच्या पंचायत प्रमुखांकडून शिक्षा म्हणून दंड स्वरूपात पैसा वसूल केला जातो. मिळालेल्या पैशातून संध्याकाळी संपूर्ण गावात मटन शिजवून खाल्लं जायचं. या अजब प्रथेचं सुरुवातीला मला नवल वाटलं आणि रागपण आला. म्हणून मी ठरवलं या असल्या प्रथेविरुद्ध आपण उभे ठाकायचं. आणि मग हळूहळू मी असल्या पंचायतीला विरोध करू लागलो. पण माझं ऐकणार कोण?
तुझं शहरातलं शहाणपण इथं चालणार नाही, असं मला सुनावण्यात आलं. मग मी एक शक्कल लढविली. पंचायत व्यवस्था जरी अशीच कायम राहिली तरी गुन्हेगाराला झालेल्या शिक्षेच्या स्वरूपातून मिळणारा पैसा सामाजिक कार्यासाठी वापरावा असं सुचवलं. उदा. त्यामधून गावातील मंदिरासाठी लागणारे पैसे, प्राथमिक शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा गोष्टी युवकांना संघटित करून मी पटवून देऊ लागलो. सुरुवातीला याही गोष्टीला प्रचंड विरोध झाला. पण गावपातळीवर युवकांच्या माध्यमातून गावात सार्वजनिक गणोशोत्सवात गाव स्वच्छता मोहीम, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा आदि कार्यक्रमातून विरोध करणा:या युवकांनाच आम्ही जवळ केलं. त्यांनाही आमचं म्हणणं पटलं. आता त्या पैशातून गावात चार गोष्टी ब:या घडताहेत याचंच मला समाधान आहे. 
गावातील ती जुनी व्यवस्था बदलण्यात मला अपयश आलं हे खरंय, पण मधला मार्ग काढत युवकांच्या मदतीनं काहीतरी बरं घडलं हेही काय कमी?
हे सगळं इथे सांगण्याचं कारण म्हणजे मी काही फार मोठं काम केलंय अशातला भाग नाही; परंतु हा माझा अनुभव तुमच्याशी शेअर करावासा वाटला. संपूर्ण बदल ना सही, छोटा बदल तरी आपण घडवू शकलो एवढाच आनंद वाटून घेतोय या निमित्तानं.