शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
4
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
5
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
6
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
7
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
8
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
9
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
10
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
11
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
12
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
13
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
14
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
15
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
16
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
17
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
18
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
19
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस

लाइफमें चेंज होना यार!- पण आणाल कसा तो चेंज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 06:50 IST

बदल हवा म्हणजे नेमकं काय हवंय, ते ठरवूच एकदाचं!

ठळक मुद्दे डोक्यात काहीही ठोस प्लॅन नसताना नवीन रूटीनची घडी बसवणं तर फार अवघड होऊन बसतं.

प्राची  पाठक 

‘अरे यार, मला फार बोअर झालं आहे’,‘कुठेतरी पळून जावंसं वाटतंय’,‘काहीतरी चेंज हवा’, ‘काहीतरी धमाकेदार घडायला हवं’, असं अधूनमधून अनेकांना वाटत असतं. सारखं काय तेच तेच म्हणून प्रत्येक गोष्टीत त्यांना कंटाळा यायला लागतो. कामांमध्ये अधूनमधून बदल व्हावा अशी आस ते धरून बसतात. काहींना त्यांच्या आयुष्यात सध्या सुरू असलेल्या गोष्टी अजिबातच आवडत नसतात. त्यांना कामामध्ये पूर्णच बदल हवा असतो. आता काहीतरी मोठा ब्रेक मिळाला पाहिजे, मोठा चेंज मिळाला पाहिजे, असं सातत्याने वाटत असतं. बदल हवा असतो आणि त्यासाठी आपण स्वतर्‍शीच कुढत बसतो; पण काय असते ही ‘चेंज’ नावाची भानगड? - कधी खोलात जाऊन विचार केलाय? 

* काय करता येईल?

थोडं शांत बसा. मनातला गोंधळ दूर करा. आपल्याला बदल हवाय, म्हणजे नेमकं काय हवंय, याचा विचार करा. स्वतर्‍शी बोला आणि आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणार्‍या आपल्या मित्र-मैत्रिणींना, आपल्या आई-वडिलांना विचारा. आपल्याला बदल तर हवाय, पण तो स्वतर्‍ला हवाय की इतरांनी आपल्यासाठी बदलायला हवं, असं आपल्याला वाटतंय, याचा विचार करा. बर्‍याचदा आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी आपल्याला हवं तसं वागावं, आपल्या इच्छेनुसार बदलावं आणि त्यांच्या वागणुकीत चेंज आणावा, अशी कुठेतरी आपली इच्छा असते. आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडून चेंज नको असतो. इतरांनी त्यांचं वागणं बदलावं म्हणजे आपल्याला हवं तसं घडेल, असा चेंज आपल्याला हवा असतो. हे सगळं ‘जर-तर’ वर अवलंबून असतं आणि आपल्याला हवं तसं घडेलच याची त्यात काहीही शाश्वती नसते.चेंज हवा म्हणून काहीतरी नवीन करायला गेलं, तर आधीचंदेखील हातातून जातं आणि नवीन गोष्ट तशीही नवीनच असते. त्यामुळे ती न जमण्याची शक्यता जास्त असते. डोक्यात काहीही ठोस प्लॅन नसताना नवीन रूटीनची घडी बसवणं तर फार अवघड होऊन बसतं.त्यामुळे ‘चेंज हवा’ या भावनेच्या मागे फरफटत गेलं, तर अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींचा नव्याने सामना करावा लागू शकतो. रूटीन जरुर तोडा; पण जे काही नवं करायचंय, ते आपल्याला जमतंय की नाही, जमेल की नाही, आवडेल की नाही, याचाही विचार करा आणि एकदम निर्णय घेण्याच्या आधी नव्या बदलाच्या वाटेवर आधी एखादी चक्कर तर मारून बघा.  पळून जावंसं वाटणं वगैरे तर फक्त मनाची पलीकडच्या जगाबद्दलची एक रोमॅण्टिक आयडिया असू शकते. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसू शकते. तर, सोचो और जानो.. सोपा मंत्न, जरासं प्लॅन करून मग ब्रेक घ्यायचा.

* त्याने काय होईल?

1- मुळात आपलं रूटीन सेट झालेलं असणं ही इतकी काही वाईट गोष्ट नसते, हे आपल्याला कळेल.2- आपल्या आयुष्याला रूटीनमुळे एक शिस्त लागलेली असते. नव्या बदलात, आवश्यक असणारी नवी शिस्त आपल्याला सांभाळता येते का, याचं आकलन होईल.3- आपला ब्रेक किंवा चेंज नीट विचारपूर्वक घेतलेला नसेल, तर कामात बदल म्हणून जो आनंद आपल्याला होतो, जो तजेला मनाला मिळतो, तो न मिळता वैतागवाडीत भर पडायचीच शक्यता जास्त असली, तर वेळीच सावध होता येईल.4-वेगवेगळ्या गोष्टी स्वतर्‍ करून बघितल्यामुळे अनुभवांचं एक मोठं गाठोडं आपल्याला नवी दृष्टी देईल.