शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

लाइफमें चेंज होना यार!- पण आणाल कसा तो चेंज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 06:50 IST

बदल हवा म्हणजे नेमकं काय हवंय, ते ठरवूच एकदाचं!

ठळक मुद्दे डोक्यात काहीही ठोस प्लॅन नसताना नवीन रूटीनची घडी बसवणं तर फार अवघड होऊन बसतं.

प्राची  पाठक 

‘अरे यार, मला फार बोअर झालं आहे’,‘कुठेतरी पळून जावंसं वाटतंय’,‘काहीतरी चेंज हवा’, ‘काहीतरी धमाकेदार घडायला हवं’, असं अधूनमधून अनेकांना वाटत असतं. सारखं काय तेच तेच म्हणून प्रत्येक गोष्टीत त्यांना कंटाळा यायला लागतो. कामांमध्ये अधूनमधून बदल व्हावा अशी आस ते धरून बसतात. काहींना त्यांच्या आयुष्यात सध्या सुरू असलेल्या गोष्टी अजिबातच आवडत नसतात. त्यांना कामामध्ये पूर्णच बदल हवा असतो. आता काहीतरी मोठा ब्रेक मिळाला पाहिजे, मोठा चेंज मिळाला पाहिजे, असं सातत्याने वाटत असतं. बदल हवा असतो आणि त्यासाठी आपण स्वतर्‍शीच कुढत बसतो; पण काय असते ही ‘चेंज’ नावाची भानगड? - कधी खोलात जाऊन विचार केलाय? 

* काय करता येईल?

थोडं शांत बसा. मनातला गोंधळ दूर करा. आपल्याला बदल हवाय, म्हणजे नेमकं काय हवंय, याचा विचार करा. स्वतर्‍शी बोला आणि आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणार्‍या आपल्या मित्र-मैत्रिणींना, आपल्या आई-वडिलांना विचारा. आपल्याला बदल तर हवाय, पण तो स्वतर्‍ला हवाय की इतरांनी आपल्यासाठी बदलायला हवं, असं आपल्याला वाटतंय, याचा विचार करा. बर्‍याचदा आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी आपल्याला हवं तसं वागावं, आपल्या इच्छेनुसार बदलावं आणि त्यांच्या वागणुकीत चेंज आणावा, अशी कुठेतरी आपली इच्छा असते. आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडून चेंज नको असतो. इतरांनी त्यांचं वागणं बदलावं म्हणजे आपल्याला हवं तसं घडेल, असा चेंज आपल्याला हवा असतो. हे सगळं ‘जर-तर’ वर अवलंबून असतं आणि आपल्याला हवं तसं घडेलच याची त्यात काहीही शाश्वती नसते.चेंज हवा म्हणून काहीतरी नवीन करायला गेलं, तर आधीचंदेखील हातातून जातं आणि नवीन गोष्ट तशीही नवीनच असते. त्यामुळे ती न जमण्याची शक्यता जास्त असते. डोक्यात काहीही ठोस प्लॅन नसताना नवीन रूटीनची घडी बसवणं तर फार अवघड होऊन बसतं.त्यामुळे ‘चेंज हवा’ या भावनेच्या मागे फरफटत गेलं, तर अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींचा नव्याने सामना करावा लागू शकतो. रूटीन जरुर तोडा; पण जे काही नवं करायचंय, ते आपल्याला जमतंय की नाही, जमेल की नाही, आवडेल की नाही, याचाही विचार करा आणि एकदम निर्णय घेण्याच्या आधी नव्या बदलाच्या वाटेवर आधी एखादी चक्कर तर मारून बघा.  पळून जावंसं वाटणं वगैरे तर फक्त मनाची पलीकडच्या जगाबद्दलची एक रोमॅण्टिक आयडिया असू शकते. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसू शकते. तर, सोचो और जानो.. सोपा मंत्न, जरासं प्लॅन करून मग ब्रेक घ्यायचा.

* त्याने काय होईल?

1- मुळात आपलं रूटीन सेट झालेलं असणं ही इतकी काही वाईट गोष्ट नसते, हे आपल्याला कळेल.2- आपल्या आयुष्याला रूटीनमुळे एक शिस्त लागलेली असते. नव्या बदलात, आवश्यक असणारी नवी शिस्त आपल्याला सांभाळता येते का, याचं आकलन होईल.3- आपला ब्रेक किंवा चेंज नीट विचारपूर्वक घेतलेला नसेल, तर कामात बदल म्हणून जो आनंद आपल्याला होतो, जो तजेला मनाला मिळतो, तो न मिळता वैतागवाडीत भर पडायचीच शक्यता जास्त असली, तर वेळीच सावध होता येईल.4-वेगवेगळ्या गोष्टी स्वतर्‍ करून बघितल्यामुळे अनुभवांचं एक मोठं गाठोडं आपल्याला नवी दृष्टी देईल.