शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

दोस्ती....? और मम्मी-पपांसे? - हो सकती है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:00 IST

सच्च्या, निरपेक्षा मैत्रीचा शोध यावर्षी जरा घेऊन तर पहा.

ठळक मुद्दे घरातच आपले सच्चे दोस्त असताना आपण मैत्रीच्या शोधात का फिरतो?

प्राची  पाठक 

कॉलेजगोइंग तरुणांना बर्‍याचदा आपले आई-वडील म्हणजे ‘बिते कल की बात’ असं वाटत असतं. त्यांच्याशी, आपल्या लहान-मोठय़ा भावा-बहिणीशी आपलं पटणारच नाही, असंही मनात उगाचंच गोंदवून ठेवलेलं असतं. त्यांच्याशी बोलायचा, संवाद साधायचा त्यामुळे आपण प्रय}च करत नाही. संवादाची ही गरज उगाचंच दुसरीकडे शोधत असतो आणि त्यानं बर्‍याचदा निराशही होत असतो. आपले आई-वडील, भाऊ-बहीण, आजूबाजूची माणसं आपल्याला समजून घेणार नाहीत, असं सारखं का वाटत असतं? आपण कधी प्रयत्न करतो का घरातल्या माणसांशी नीट बोलायचा? त्यांना आपलं सुखदुर्‍ख, आपलं मन कळणारच नाही, असा पक्का निष्कर्ष आपण कशाच्या जोरावर काढतो?

* काय करता येईल?

ज्यांच्याशी आपली मैत्री व्हावी, त्यांच्याशी ‘बोलता’ यावं म्हणून आपण धडपडतो, ते आपल्याला त्यांच्यात घेतसुद्धा नाहीत, त्यांच्यामध्ये आपल्याला एंट्री मिळेल मिळावी म्हणून आपण इतकी धडपड करतो, त्याच्या दोन टक्के जरी धडपड आपण आपल्या घरातल्या मंडळींना समजून घ्यायला केली तर? - बघा एकदा करून.  एक छान दिलासा आपल्या मनाला मिळू शकेल. आपली भावंडं आपले जिगरी दोस्त होऊ शकतात. एकाच घरात वाढल्यामुळे आपली पूर्ण परिस्थिती त्यांना वेगळी सांगायची गरज नसते. यांना काय आपलं मन कळणार, या अडथळ्यापलीकडे जाऊन आपल्या बहीण-भावांशी, आपल्या आईवडिलांशी, आजोबा- आजीशी, इतरही नातेवाइकांशी, शेजारपाजारच्या लोकांशी मैत्नी होऊ शकते का, ते एक्सप्लोर करून बघितलं पाहिजे.  आपले जिव्हाळ्याचे विषय त्यांच्याशी बोलले पाहिजे. आपण काही न बोलताच आपल्या मनातलं ते ओळखून घेतील, अशा भ्रमात राहायची काही गरज नसते. आपल्या घरातल्या लोकांशी हळूहळू संवाद वाढवत नेता येऊ शकतो.

* त्याने काय होईल?

1- घरातल्या लोकांशी आपलं संभाषण केवळ संवादापुरतं न राहता हळूहळू मैत्नीत रूपांतरित होईल.2- आपला सच्चा मित्न होण्यासाठी कोणाला तरी भलामोठा दिवा घेऊन शोधत बसायची गरज नसते. आपल्या आजूबाजूला, आपल्या घरातच सच्चे मित्न असू शकतात आणि त्यांची मैत्नी आपल्यासाठी अत्यंत सुरक्षित असू शकते, याची जाणीव आपल्याला होईल. 3- अडीअडचणीला लागणारा सपोर्ट घरच्या घरीच तात्काळ मिळू शकेल. 4 - मदत करायची वेळ आलीच तर ते तयार असतात.