शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
4
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
5
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
6
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
7
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
8
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
9
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
10
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
11
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
12
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
13
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
14
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
15
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
16
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
17
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
18
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
19
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस

दोस्ती....? और मम्मी-पपांसे? - हो सकती है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:00 IST

सच्च्या, निरपेक्षा मैत्रीचा शोध यावर्षी जरा घेऊन तर पहा.

ठळक मुद्दे घरातच आपले सच्चे दोस्त असताना आपण मैत्रीच्या शोधात का फिरतो?

प्राची  पाठक 

कॉलेजगोइंग तरुणांना बर्‍याचदा आपले आई-वडील म्हणजे ‘बिते कल की बात’ असं वाटत असतं. त्यांच्याशी, आपल्या लहान-मोठय़ा भावा-बहिणीशी आपलं पटणारच नाही, असंही मनात उगाचंच गोंदवून ठेवलेलं असतं. त्यांच्याशी बोलायचा, संवाद साधायचा त्यामुळे आपण प्रय}च करत नाही. संवादाची ही गरज उगाचंच दुसरीकडे शोधत असतो आणि त्यानं बर्‍याचदा निराशही होत असतो. आपले आई-वडील, भाऊ-बहीण, आजूबाजूची माणसं आपल्याला समजून घेणार नाहीत, असं सारखं का वाटत असतं? आपण कधी प्रयत्न करतो का घरातल्या माणसांशी नीट बोलायचा? त्यांना आपलं सुखदुर्‍ख, आपलं मन कळणारच नाही, असा पक्का निष्कर्ष आपण कशाच्या जोरावर काढतो?

* काय करता येईल?

ज्यांच्याशी आपली मैत्री व्हावी, त्यांच्याशी ‘बोलता’ यावं म्हणून आपण धडपडतो, ते आपल्याला त्यांच्यात घेतसुद्धा नाहीत, त्यांच्यामध्ये आपल्याला एंट्री मिळेल मिळावी म्हणून आपण इतकी धडपड करतो, त्याच्या दोन टक्के जरी धडपड आपण आपल्या घरातल्या मंडळींना समजून घ्यायला केली तर? - बघा एकदा करून.  एक छान दिलासा आपल्या मनाला मिळू शकेल. आपली भावंडं आपले जिगरी दोस्त होऊ शकतात. एकाच घरात वाढल्यामुळे आपली पूर्ण परिस्थिती त्यांना वेगळी सांगायची गरज नसते. यांना काय आपलं मन कळणार, या अडथळ्यापलीकडे जाऊन आपल्या बहीण-भावांशी, आपल्या आईवडिलांशी, आजोबा- आजीशी, इतरही नातेवाइकांशी, शेजारपाजारच्या लोकांशी मैत्नी होऊ शकते का, ते एक्सप्लोर करून बघितलं पाहिजे.  आपले जिव्हाळ्याचे विषय त्यांच्याशी बोलले पाहिजे. आपण काही न बोलताच आपल्या मनातलं ते ओळखून घेतील, अशा भ्रमात राहायची काही गरज नसते. आपल्या घरातल्या लोकांशी हळूहळू संवाद वाढवत नेता येऊ शकतो.

* त्याने काय होईल?

1- घरातल्या लोकांशी आपलं संभाषण केवळ संवादापुरतं न राहता हळूहळू मैत्नीत रूपांतरित होईल.2- आपला सच्चा मित्न होण्यासाठी कोणाला तरी भलामोठा दिवा घेऊन शोधत बसायची गरज नसते. आपल्या आजूबाजूला, आपल्या घरातच सच्चे मित्न असू शकतात आणि त्यांची मैत्नी आपल्यासाठी अत्यंत सुरक्षित असू शकते, याची जाणीव आपल्याला होईल. 3- अडीअडचणीला लागणारा सपोर्ट घरच्या घरीच तात्काळ मिळू शकेल. 4 - मदत करायची वेळ आलीच तर ते तयार असतात.