शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

घरचे ‘नाही’ म्हणतात हा डायलॉग का मारला जातो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:00 IST

आपणच घरच्यांना गृहित धरतो आणि ते नाहीच म्हणतील अशी पळवाट शोधत राहतो?

ठळक मुद्देघरातल्या लोकांशी आपण जितका चांगला संवाद ठेवू, तितक्या चांगल्या प्रकारे ते आपल्याला समजून घेऊ शकतात.  

प्राची  पाठक

घरचे नाही म्हणतात’, हा एक फारच कॉमन डायलॉग जिकडे तिकडे ऐकायला मिळतो. कुणी काहीही सुचवलं आणि त्यात खोडा घालायचा असेल की आपला स्टॅण्डर्ड डायलॉग ठरलेला - घरचे नाही म्हणतात ! कधी कधी ‘घरचे नाही म्हणतात’ हे उत्तर आपण परस्परच देऊन टाकतो. खरंतर आपण त्यांच्याशी बोलणं टाळायला लागतो. एकटं झुरत बसतो किंवा उगाचच जास्तीची बंडखोरी करायला जातो. म्हणजे दोन्हीकडून मनात कचकच आहेच. ती पुढे वाढतच जाते. 

* काय करता येईल? कधी कधी घरातल्या लोकांना आपल्या मनातल्या गोष्टींची काहीही जाण नसते. आपलं फील्ड, आपलं विश्व आणि त्यांचं फिल्ड, त्यांचं विश्व पूर्ण वेगळं असू शकतं. त्यामुळे, जे आपल्यासाठी उत्तम आहे, असा आपल्याला पक्का विश्वास वाटत असतो, त्याबद्दल त्यांना काही कल्पनाच नसते. त्यात त्यांना काही अर्थही वाटत नसतो. म्हणून केवळ वडीलकीच्या नात्याने, कधी घरातलं बजेट पाहून, कधी घरातल्या इतर समस्या पाहून ते आपल्याला सरळ ‘नाही’ म्हणतात.  पण आपण आपली बाजू त्यांना नीट समजावून सांगतो का? आपल्या डोक्यातले प्लॅन अमुक पद्धतीने राबवले तर त्याचा आपल्याला, आपल्या करिअरला फायदा होणार आहे याची कल्पना आपण त्यांना मनमोकळेपणाने देतो का?  घरातल्या लोकांशी आपण जितका चांगला संवाद ठेवू, तितक्या चांगल्या प्रकारे ते आपल्याला समजून घेऊ शकतात.  

त्याने काय होईल?1- आपल्या डोक्यातल्या कल्पना घरच्यांना नीट कळतील.2- कोणता मुद्दा घरच्या लोकांशी कसा बोलावा, याबद्दलची जाण विकसित होईल. 3- कधी कधी घरच्यांच्या नाही म्हणण्यामध्ये काही तथ्य असू शकतं आणि आपल्या प्लॅन्समध्ये काही निसरडय़ा जागा असू शकतात, याची कल्पना त्यांच्यामार्फत आपल्याला येऊ शकेल.4- आपल्या डोक्यातल्या आयडिया अधिक उत्तम प्रकारे राबवायला घरच्यांचीदेखील मदत होईल आणि आपल्याला त्याच विषयाचे विविध पैलू कळत जातील. त्यांचा आधारही मिळेल.