शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
4
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
5
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
6
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
7
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
8
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
9
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
10
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
11
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
12
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
13
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
14
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
15
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
16
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
17
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
18
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
19
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस

घरचे ‘नाही’ म्हणतात हा डायलॉग का मारला जातो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:00 IST

आपणच घरच्यांना गृहित धरतो आणि ते नाहीच म्हणतील अशी पळवाट शोधत राहतो?

ठळक मुद्देघरातल्या लोकांशी आपण जितका चांगला संवाद ठेवू, तितक्या चांगल्या प्रकारे ते आपल्याला समजून घेऊ शकतात.  

प्राची  पाठक

घरचे नाही म्हणतात’, हा एक फारच कॉमन डायलॉग जिकडे तिकडे ऐकायला मिळतो. कुणी काहीही सुचवलं आणि त्यात खोडा घालायचा असेल की आपला स्टॅण्डर्ड डायलॉग ठरलेला - घरचे नाही म्हणतात ! कधी कधी ‘घरचे नाही म्हणतात’ हे उत्तर आपण परस्परच देऊन टाकतो. खरंतर आपण त्यांच्याशी बोलणं टाळायला लागतो. एकटं झुरत बसतो किंवा उगाचच जास्तीची बंडखोरी करायला जातो. म्हणजे दोन्हीकडून मनात कचकच आहेच. ती पुढे वाढतच जाते. 

* काय करता येईल? कधी कधी घरातल्या लोकांना आपल्या मनातल्या गोष्टींची काहीही जाण नसते. आपलं फील्ड, आपलं विश्व आणि त्यांचं फिल्ड, त्यांचं विश्व पूर्ण वेगळं असू शकतं. त्यामुळे, जे आपल्यासाठी उत्तम आहे, असा आपल्याला पक्का विश्वास वाटत असतो, त्याबद्दल त्यांना काही कल्पनाच नसते. त्यात त्यांना काही अर्थही वाटत नसतो. म्हणून केवळ वडीलकीच्या नात्याने, कधी घरातलं बजेट पाहून, कधी घरातल्या इतर समस्या पाहून ते आपल्याला सरळ ‘नाही’ म्हणतात.  पण आपण आपली बाजू त्यांना नीट समजावून सांगतो का? आपल्या डोक्यातले प्लॅन अमुक पद्धतीने राबवले तर त्याचा आपल्याला, आपल्या करिअरला फायदा होणार आहे याची कल्पना आपण त्यांना मनमोकळेपणाने देतो का?  घरातल्या लोकांशी आपण जितका चांगला संवाद ठेवू, तितक्या चांगल्या प्रकारे ते आपल्याला समजून घेऊ शकतात.  

त्याने काय होईल?1- आपल्या डोक्यातल्या कल्पना घरच्यांना नीट कळतील.2- कोणता मुद्दा घरच्या लोकांशी कसा बोलावा, याबद्दलची जाण विकसित होईल. 3- कधी कधी घरच्यांच्या नाही म्हणण्यामध्ये काही तथ्य असू शकतं आणि आपल्या प्लॅन्समध्ये काही निसरडय़ा जागा असू शकतात, याची कल्पना त्यांच्यामार्फत आपल्याला येऊ शकेल.4- आपल्या डोक्यातल्या आयडिया अधिक उत्तम प्रकारे राबवायला घरच्यांचीदेखील मदत होईल आणि आपल्याला त्याच विषयाचे विविध पैलू कळत जातील. त्यांचा आधारही मिळेल.