शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

टाइम हा ‘पास’ करण्यासाठी नसतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 07:25 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

-डॉ. अरुणा ढेरे

अरुणा  तू वीस वर्षाची होतीस तेव्हा वेगळी होतीस. आज तुझ्यापेक्षा कितीतरी वेगळी विशीतली ‘तरुण’ मुलं माझ्या आवतीभोवती आहेत.तो काळ संथ होता. वाढीचा अवकाश पुष्कळ मोठा होता. आज आहेत तेवढी वेगवेगळी दालनं खुली नव्हती. आजच्या तरुण मुलांना इतके विविध, आपल्या कक्षेपलीकडे प्रदेश पाहता येतात, इतकी माहिती असते, नवे अनुभव समोर असतात. असं बरंच काही जे तुला माहितीही नव्हतं.वेगळं आहे आजचं जग.मात्र आजही या जगात एक गोष्ट तीच आहे. हे जे वय आहे ते बक्षीस आहे आपल्याला आयुष्यानं दिलेलं. मोठी देण आहे. आणि तिचा उपयोग कसा करून घ्यायचा हा निर्णय प्रत्येकाच्या हातात दिलेला आहे.टाइम हा ‘पास’ करण्यासाठी नसतो.  आपलं आयुष्य सुंदर, कसदार आणि समृद्ध करणार्‍या गोष्टी आपण आपला वेळ वापरून कराव्यात. कला, ज्ञान, तंत्रज्ञान जे शिकू, वाचू, करून पाहू ते कमीच आहे. म्हणतात ना, सितारों के आगे जहॉँ और भी है.-तसंच आहे हे.मग आता मला सांग तू आजच्या काळात जर वीस वर्षाची असती तर काय केलं असतं?आजची मी मला तुझ्यात, वीस वर्षाच्या अरुणात पाहतेय, मी तुझ्या माध्यमातून जगायला लागले तर मी काय केलं असतं?हे ऐन मोक्याचं वय आहे. आनंद, उल्हास, उमेद असते या वयात. कराल त्यासाठी जागा असते आयुष्यात. जगामध्ये वावरण्याचं, उभं राहण्याचं, हवं ते करण्याचं स्वातंत्र्यही देतं ते हेच वय.त्या स्वातंत्र्यासह जबाबदारीची जाणीवही करून दे स्वतर्‍ला. ती खूप महत्त्वाची आहे. आपल्या म्हणजे आपल्या पिढीच्या खांद्यावर आपण जबाबदारी देतोय हे ‘भान’ सतत जागं असायला हवं मनात.आपली माणसं, परिसर, ज्यांच्या संबंधात आपण मोठे होतो, वाढतो त्या गोष्टी, समाज, त्या सगळ्यांचं आपण देणं लागतो. तेव्हा तुला एकटीलाच मोठं व्हायचं नाहीये, या सगळ्यांना घेऊन मोठं व्हायचं आहे.आणि ही सगळी माणसं, भोवताल, जगण्याचा अवकाश सोबत असणं म्हणजे काही ते तुझ्या स्वातंत्र्यावर आलेलं बंधन नाहीये, तर या सार्‍या तुलाच समृद्ध करणार्‍या गोष्टी आहेत. तशी समृद्ध तू हो. जमेल तुला!एक काळ होता जेव्हा वीस वर्षाच्या मुलांच्या पायात घरच्यांच्या, समाजाच्या मोठय़ा बेडय़ा होत्या. आता त्या दोन्हीकडच्या बेडय़ा तुटल्या आहेत. घरचे लोक सदैव पाठिंबा द्यायला तत्पर दिसतात. मग विचार काय करता, झेप घ्या! उद्याचं जग तुमचं आहे.वीस वर्षाची होती अरुणा तेव्हाही सुदैवानं तिच्यावर विश्वास टाकणारी माणसं होती. आजही आहेत.मात्र नव्या जगात नवं अवकाश आहे. ते अवकाश कवेत घेताना तात्पुरतं काय आणि टिकाऊ काय यातला फरक ओळखायला शिक. माध्यम तुमच्यासाठी की तुम्ही माध्यमांसाठी हे विचार स्वतर्‍ला!आता तंत्रज्ञानामुळे गोष्टी किती सोप्या झाल्या, जी माहिती, ज्या गोष्टी मिळवायला झटावं लागायचं ते सारं सहज पुढय़ात येतं, मग त्यापुढे जात, त्यापलीकडचं जग आणि अनुभव कसे कवेत घेणार, ते कसं जगणार याचा विचार कर.आणि आपलं मोठ्ठं अवकाश कायम ठेवताना आणि विस्तारताना आपल्या माणसांच्या, समाजाच्या विश्वासाचं ‘भान’ ठेव.ते भान कायम जागं असलं पाहिजे.आणि जात राहिलं पाहिजे सतत पुढे. नेमानं!

(ख्यातनाम लेखिका)