शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

टाइम हा ‘पास’ करण्यासाठी नसतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 07:25 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

-डॉ. अरुणा ढेरे

अरुणा  तू वीस वर्षाची होतीस तेव्हा वेगळी होतीस. आज तुझ्यापेक्षा कितीतरी वेगळी विशीतली ‘तरुण’ मुलं माझ्या आवतीभोवती आहेत.तो काळ संथ होता. वाढीचा अवकाश पुष्कळ मोठा होता. आज आहेत तेवढी वेगवेगळी दालनं खुली नव्हती. आजच्या तरुण मुलांना इतके विविध, आपल्या कक्षेपलीकडे प्रदेश पाहता येतात, इतकी माहिती असते, नवे अनुभव समोर असतात. असं बरंच काही जे तुला माहितीही नव्हतं.वेगळं आहे आजचं जग.मात्र आजही या जगात एक गोष्ट तीच आहे. हे जे वय आहे ते बक्षीस आहे आपल्याला आयुष्यानं दिलेलं. मोठी देण आहे. आणि तिचा उपयोग कसा करून घ्यायचा हा निर्णय प्रत्येकाच्या हातात दिलेला आहे.टाइम हा ‘पास’ करण्यासाठी नसतो.  आपलं आयुष्य सुंदर, कसदार आणि समृद्ध करणार्‍या गोष्टी आपण आपला वेळ वापरून कराव्यात. कला, ज्ञान, तंत्रज्ञान जे शिकू, वाचू, करून पाहू ते कमीच आहे. म्हणतात ना, सितारों के आगे जहॉँ और भी है.-तसंच आहे हे.मग आता मला सांग तू आजच्या काळात जर वीस वर्षाची असती तर काय केलं असतं?आजची मी मला तुझ्यात, वीस वर्षाच्या अरुणात पाहतेय, मी तुझ्या माध्यमातून जगायला लागले तर मी काय केलं असतं?हे ऐन मोक्याचं वय आहे. आनंद, उल्हास, उमेद असते या वयात. कराल त्यासाठी जागा असते आयुष्यात. जगामध्ये वावरण्याचं, उभं राहण्याचं, हवं ते करण्याचं स्वातंत्र्यही देतं ते हेच वय.त्या स्वातंत्र्यासह जबाबदारीची जाणीवही करून दे स्वतर्‍ला. ती खूप महत्त्वाची आहे. आपल्या म्हणजे आपल्या पिढीच्या खांद्यावर आपण जबाबदारी देतोय हे ‘भान’ सतत जागं असायला हवं मनात.आपली माणसं, परिसर, ज्यांच्या संबंधात आपण मोठे होतो, वाढतो त्या गोष्टी, समाज, त्या सगळ्यांचं आपण देणं लागतो. तेव्हा तुला एकटीलाच मोठं व्हायचं नाहीये, या सगळ्यांना घेऊन मोठं व्हायचं आहे.आणि ही सगळी माणसं, भोवताल, जगण्याचा अवकाश सोबत असणं म्हणजे काही ते तुझ्या स्वातंत्र्यावर आलेलं बंधन नाहीये, तर या सार्‍या तुलाच समृद्ध करणार्‍या गोष्टी आहेत. तशी समृद्ध तू हो. जमेल तुला!एक काळ होता जेव्हा वीस वर्षाच्या मुलांच्या पायात घरच्यांच्या, समाजाच्या मोठय़ा बेडय़ा होत्या. आता त्या दोन्हीकडच्या बेडय़ा तुटल्या आहेत. घरचे लोक सदैव पाठिंबा द्यायला तत्पर दिसतात. मग विचार काय करता, झेप घ्या! उद्याचं जग तुमचं आहे.वीस वर्षाची होती अरुणा तेव्हाही सुदैवानं तिच्यावर विश्वास टाकणारी माणसं होती. आजही आहेत.मात्र नव्या जगात नवं अवकाश आहे. ते अवकाश कवेत घेताना तात्पुरतं काय आणि टिकाऊ काय यातला फरक ओळखायला शिक. माध्यम तुमच्यासाठी की तुम्ही माध्यमांसाठी हे विचार स्वतर्‍ला!आता तंत्रज्ञानामुळे गोष्टी किती सोप्या झाल्या, जी माहिती, ज्या गोष्टी मिळवायला झटावं लागायचं ते सारं सहज पुढय़ात येतं, मग त्यापुढे जात, त्यापलीकडचं जग आणि अनुभव कसे कवेत घेणार, ते कसं जगणार याचा विचार कर.आणि आपलं मोठ्ठं अवकाश कायम ठेवताना आणि विस्तारताना आपल्या माणसांच्या, समाजाच्या विश्वासाचं ‘भान’ ठेव.ते भान कायम जागं असलं पाहिजे.आणि जात राहिलं पाहिजे सतत पुढे. नेमानं!

(ख्यातनाम लेखिका)