शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

टाइम हा ‘पास’ करण्यासाठी नसतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 07:25 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

-डॉ. अरुणा ढेरे

अरुणा  तू वीस वर्षाची होतीस तेव्हा वेगळी होतीस. आज तुझ्यापेक्षा कितीतरी वेगळी विशीतली ‘तरुण’ मुलं माझ्या आवतीभोवती आहेत.तो काळ संथ होता. वाढीचा अवकाश पुष्कळ मोठा होता. आज आहेत तेवढी वेगवेगळी दालनं खुली नव्हती. आजच्या तरुण मुलांना इतके विविध, आपल्या कक्षेपलीकडे प्रदेश पाहता येतात, इतकी माहिती असते, नवे अनुभव समोर असतात. असं बरंच काही जे तुला माहितीही नव्हतं.वेगळं आहे आजचं जग.मात्र आजही या जगात एक गोष्ट तीच आहे. हे जे वय आहे ते बक्षीस आहे आपल्याला आयुष्यानं दिलेलं. मोठी देण आहे. आणि तिचा उपयोग कसा करून घ्यायचा हा निर्णय प्रत्येकाच्या हातात दिलेला आहे.टाइम हा ‘पास’ करण्यासाठी नसतो.  आपलं आयुष्य सुंदर, कसदार आणि समृद्ध करणार्‍या गोष्टी आपण आपला वेळ वापरून कराव्यात. कला, ज्ञान, तंत्रज्ञान जे शिकू, वाचू, करून पाहू ते कमीच आहे. म्हणतात ना, सितारों के आगे जहॉँ और भी है.-तसंच आहे हे.मग आता मला सांग तू आजच्या काळात जर वीस वर्षाची असती तर काय केलं असतं?आजची मी मला तुझ्यात, वीस वर्षाच्या अरुणात पाहतेय, मी तुझ्या माध्यमातून जगायला लागले तर मी काय केलं असतं?हे ऐन मोक्याचं वय आहे. आनंद, उल्हास, उमेद असते या वयात. कराल त्यासाठी जागा असते आयुष्यात. जगामध्ये वावरण्याचं, उभं राहण्याचं, हवं ते करण्याचं स्वातंत्र्यही देतं ते हेच वय.त्या स्वातंत्र्यासह जबाबदारीची जाणीवही करून दे स्वतर्‍ला. ती खूप महत्त्वाची आहे. आपल्या म्हणजे आपल्या पिढीच्या खांद्यावर आपण जबाबदारी देतोय हे ‘भान’ सतत जागं असायला हवं मनात.आपली माणसं, परिसर, ज्यांच्या संबंधात आपण मोठे होतो, वाढतो त्या गोष्टी, समाज, त्या सगळ्यांचं आपण देणं लागतो. तेव्हा तुला एकटीलाच मोठं व्हायचं नाहीये, या सगळ्यांना घेऊन मोठं व्हायचं आहे.आणि ही सगळी माणसं, भोवताल, जगण्याचा अवकाश सोबत असणं म्हणजे काही ते तुझ्या स्वातंत्र्यावर आलेलं बंधन नाहीये, तर या सार्‍या तुलाच समृद्ध करणार्‍या गोष्टी आहेत. तशी समृद्ध तू हो. जमेल तुला!एक काळ होता जेव्हा वीस वर्षाच्या मुलांच्या पायात घरच्यांच्या, समाजाच्या मोठय़ा बेडय़ा होत्या. आता त्या दोन्हीकडच्या बेडय़ा तुटल्या आहेत. घरचे लोक सदैव पाठिंबा द्यायला तत्पर दिसतात. मग विचार काय करता, झेप घ्या! उद्याचं जग तुमचं आहे.वीस वर्षाची होती अरुणा तेव्हाही सुदैवानं तिच्यावर विश्वास टाकणारी माणसं होती. आजही आहेत.मात्र नव्या जगात नवं अवकाश आहे. ते अवकाश कवेत घेताना तात्पुरतं काय आणि टिकाऊ काय यातला फरक ओळखायला शिक. माध्यम तुमच्यासाठी की तुम्ही माध्यमांसाठी हे विचार स्वतर्‍ला!आता तंत्रज्ञानामुळे गोष्टी किती सोप्या झाल्या, जी माहिती, ज्या गोष्टी मिळवायला झटावं लागायचं ते सारं सहज पुढय़ात येतं, मग त्यापुढे जात, त्यापलीकडचं जग आणि अनुभव कसे कवेत घेणार, ते कसं जगणार याचा विचार कर.आणि आपलं मोठ्ठं अवकाश कायम ठेवताना आणि विस्तारताना आपल्या माणसांच्या, समाजाच्या विश्वासाचं ‘भान’ ठेव.ते भान कायम जागं असलं पाहिजे.आणि जात राहिलं पाहिजे सतत पुढे. नेमानं!

(ख्यातनाम लेखिका)