शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हॉकीसाठी हे वर्ष थोडी खुशी, थोडा गम

By admin | Updated: December 24, 2015 23:44 IST

पुरुष आणि हॉकी संघाने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे हे वर्ष भारतासाठी ‘यादगार’ ठरले असले तरी मैदानाबाहेर घडलेल्या काही घटनांमुळे हे वर्ष डागाळले गेले आहे

नवी दिल्ली : पुरुष आणि हॉकी संघाने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे हे वर्ष भारतासाठी ‘यादगार’ ठरले असले तरी मैदानाबाहेर घडलेल्या काही घटनांमुळे हे वर्ष डागाळले गेले आहे. भारतीय महिला हॉकी संघाने ३६ वर्षांनंतर आॅलिम्पिक वर्तुळात प्रवेश केला, तर पुरुष संघाने वर्ल्ड हॉकी लीग फायनलमध्ये कांस्यपदक मिळवून भारतीय संघाने ३३ वर्षानंतर यशाची चव चाखली. या दोन ऐतिहासिक घटनांमुळे हे वर्ष भारतीय हॉकीसाठी संस्मरणीय ठरले असतानाच प्रशिक्षक वॉन एस. पॉल यांची गच्छंती आणि गुरुबाज सिंगवरील ९ महिन्यांची बंदी या दोन घटना चटका लावणाऱ्या ठरल्या.२०१५ची आंतरराष्ट्रीय दौऱ्याची सुरुवात अझलन शाह हॉकी स्पर्धेने झाली. सहा देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताने तिसरे स्थान मिळविले. जानेवारीमध्ये नियुक्त केलेल्या वॉन एस. पॉल यांचा प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच दौरा होता. यानंतर भारतीय संघ बेल्जियममधील अँटवर्प येथे झालेल्या वर्ल्ड हॉकी लीग (डब्ल्यूएचएल) सेमीफायनलमध्ये सहभागी झाला. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी संमिश्र झाली. स्पर्धेत त्यांचा ब्रिटनकडून पराभूत होवून चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. हे थोडेफार मिळालेले यश पदरी घेवून संघ मायदेशी परतला. पण त्यानंतर हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा आणि कोच वॉन पॉल यांच्यात बेबनाव झाला. त्यामुळे सहा महिन्यांतच त्यांना हे पद सोडावे लागले. यानंतर हाय परफॉर्मस डायरेक्टर रोलँट ओल्टमॅन्स यांना २०१६ रियो आॅलिम्पिकपर्यंत पुरुष संघाची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरदार सिंगच्या नेतृत्त्वाखाली १५ दिवसांच्या युरोपियन दौऱ्यावर रवाना झाली.या दौऱ्यात भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत २-० ने तर स्पेनला चार सामन्यांच्या मालिकेत २-१ ने हरविले. दरम्यान, मिडफिल्डर गुरबाज सिंगला गैरवर्तणुकीच्या आरोपावरून संघातून बाहेर करण्यात आले. संघात गटबाजी केल्याच्या आरोपावरून हॉकी इंडियाने त्यांना ९ महिन्यांसाठी निलंबित केले. याविरुद्ध गुरबाजने न्यायालयात धाव घेतली. तेथून त्याने निलंबन मागे घेण्यात यश मिळविले; परंतु तोपर्यंत त्याचे व्हायचे ते नुकसान झाले होते. त्याला एआयएलच्या लिलावात भाग घेता आले नाही आणि राष्ट्रीय निवड समितीनेही त्याला दुर्लक्षित केले.ओल्टमॅन्स यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी सुरूच ठेवली. या यशावर ताज चढविला तो डब्ल्यूएचएलच्या कांस्यपदकाने. साखळी फेरीत संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती, परंतु कांस्यपदकाच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध २-१ असे पिछाडीवर पडल्यानंतरही कांस्यपदक जिंकले. डब्ल्यूएचएलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने ३३ वर्षांनतर हे पदक मिळविले. (वृत्तसंस्था)महिला संघाचे ऐतिहासिक यशभारतीय महिला हॉकी संघ २०१६च्या रियो आॅलिम्पिकमध्ये खेळताना दिसणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या युरो हॉकी चॅम्पियनशीपमध्ये फायनलमध्ये पोहोचल्यामुळे भारताने आॅलिम्पिक पात्रता मिळविली. वर्ल्ड हॉकी लीगमध्येही त्यांनी पाचवे स्थान मिळवित आॅलिम्पिक कोटा मिळविला होता. यापूर्वी भारताने १९८० मध्ये मॉस्को आॅलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर ३६ वर्षांनी भारताला हे यश मिळाले.