शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

यादव, शमी, अँरोन विश्‍वचषकात निर्णायक ठरतील

By admin | Updated: September 9, 2014 03:11 IST

शोएब म्हणाला,'उमेश, शमी आणि अँरोन हे महत्त्वाचे गोलंदाज आहेत. या तिघांना ताजेतवाने ठेवा. विश्‍वचषकात हे गोलंदाज सामने जिंकून देऊ शकतील.

बर्मिंघम : २0१५ च्या विश्‍वचषकात भारताला जेतेपद राखायचे झाल्यास वेगवान गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी आणि वरुण अँरोन यांच्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असा सल्ला पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने कडवा प्रतिस्पर्धी भारताला दिला आहे.शोएब म्हणाला,'उमेश, शमी आणि अँरोन हे महत्त्वाचे गोलंदाज आहेत. या तिघांना ताजेतवाने ठेवा. विश्‍वचषकात हे गोलंदाज सामने जिंकून देऊ शकतील. त्यांच्याकडून योग्य सराव करून घ्यावा आणि चांगले प्रशिक्षण द्यायला हवे. हे तिघेही तंदुरुस्त राहिले व आक्रमक कामगिरीत भक्कम ठरले तर विश्‍वचषकात भारताला रोखणे कठीण जाईल.'शोएब सध्या प्रथम श्रेणी मोसमात स्टेट बँक ऑफ पाकिस्तान संघाचा कोच आहे. शमी आणि भुवनेश्‍वर यांच्याकडून गेल्या वर्षभरात अनेक सामन्यात गोलंदाजी करुन घेण्यात आली. यावर शोएब म्हणाला,'आता या खेळाडूंना विश्रांती द्या. विश्‍वषकासाठी मुख्य गोलंदाजांना विश्रांती मिळाली तर ते विश्‍वचषकात चमकदार कामगिरी बजावतील. खेळाडू रोटेट होत राहिल्यास तंदुरुस्ती कायम राहील आणि थकवा अथवा जखम यांची समस्या जाणवणार नाही. भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियात मोठय़ा दौर्‍यात असतील ते थकून जातील. त्यांना सामने न खेळविता सराव द्या आणि हळूहळू फिटनेस सुधारण्यावर भर द्यावा.'भारतीय गोलंदाजीवर चिंता व्यक्त करीत शोएब पुढे म्हणाला,'गोलंदाजीत सकारात्मक सुधारण्यास वाव आहे. अखेरच्या षटकांत कसे चेंडू टाकायचे याचे तंत्र अवगत करायला हवे. 'भारत विंडीजविरुद्ध भारतात मालिका खेळेल आणि नंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. पाच महिन्यांच्या या दौर्‍यात चार कसोटी, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध तिरंगी मालिका व त्यानंतर ऑस्ट्रेलिया- न्यूझिलंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्‍वचषकात खेळणार आहे. शोएब म्हणाला,'भारतीय गोलंदाजांनी केवळ स्वत:चा वेग सुधारावा. चेंडू स्विंग करण्याकडे सध्या लक्ष देऊ नये. चेंडू स्विंग करण्याची त्यांच्यात क्षमता आहे पण चेंडू वेगवान येणार असेल आणि तो स्विंग झाला तर अधिक भेदक ठरतो.' ३९ वर्षांचा शोएब 'रावळपिंडी एस्क्प्रेस या नावाने ओळखला जातो. तो म्हणतो,'भारताच्या वेगवान गोलंदाजांना चेंडूत आणखी वेग आणायचा झाल्यास फिटनेस लेव्हल वाढवावी लागेल. तंत्र देखील विकसित करावे लागेल. भारतीय गोलंदाज अधिक क्रिकेट खेळत असल्याने थकतात. थकवा घालवून किमान सामने खेळल्यास गडी बाद करण्याचे कौशल्य वेगवान गोलंदाजांमध्ये येईल, असा मला विश्‍वास वाटतो.'(वृत्तसंस्था)