शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

खेळाडूंच्या यादीला कात्री

By admin | Updated: September 10, 2014 02:21 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय आॅलिम्पिक संघटनेने पाठविलेल्या ९४२ जणांच्या लांबलचक यादीला कात्री लावताना केंद्र सरकारने मंगळवारी केवळ ६७९ जणांच्या यादीवर अंतिम मोहोर उमटविली

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय आॅलिम्पिक संघटनेने पाठविलेल्या ९४२ जणांच्या लांबलचक यादीला कात्री लावताना केंद्र सरकारने मंगळवारी केवळ ६७९ जणांच्या यादीवर अंतिम मोहोर उमटविली. यामुळे भारतीय पथकाच्या सहभागाविषयी असलेल्या शंकेचे निरसन झाले आहे.द. कोरियातील इंचियोन येथे १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत स्पर्धेचे आयोजन होईल. आयओएने सरकारकडे ६६२ खेळाडू आणि २८० अधिकाऱ्यांची यादी पाठविली होती. यावर क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी चर्चा केल्यानंतर सरकारने ५१६ खेळाडू आणि १६३ कोचेसच्या यादीला मंजुरी प्रदान केली. साईने याआधी पात्रता अटीअंतर्गत खेळाडू पाठविले जातील असे सांगितले होते. यानुसार वैयक्तिक स्पर्धेत खेळाडू पहिल्या सहा स्थानांत असावेत आणि सांघिक गटात संघ पहिल्या आठमध्ये असावेत अशी अट होती. हा निकष लागू करण्यात आला असता तर फुटबॉल, टेबल टेनिस, हॅण्डबॉल, बास्केटबॉल आणि सेपक टॅकरॉ या संघांना आशियाई स्पर्धेत सहभागी होता आले नसते. या खेळातून माघारीचा अर्थ असा की आशियाई आॅलिम्पिक परिषदेने दिलेल्या धमकीनुसार मोठा आर्थिक भुर्दंड देखील भरावा लागला असता. (वृत्तसंस्था)