शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जयंत, ईशांतला पुढच्या कसोटीतून वगळले जाऊ शकते : अझहरुद्दीन

By admin | Updated: February 26, 2017 23:46 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी काही बदल करावा लागू शकतो

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी काही बदल करावा लागू शकतो, असे मत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनने व्यक्त केले. अझहरुद्दीन म्हणाला, ‘फलंदाजीमध्ये अपयशी ठरल्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर आला. मालिका गमावली नसली, तरी कुठल्या प्रकारच्या खेळपट्टीवर खेळायचे आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. चिन्नास्वामी स्टेडियममधील खेळपट्टीवर चेंडू अशाप्रकारे वळतील, असे मला वाटत नाही. त्यामुळे अंतिम संघातून जयंत यादव व ईशांत शर्मा यांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे.’भारताला पहिल्या कसोटी सामन्यात ३३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि बंगळुरूमध्ये दुसरा कसोटी सामना ४ मार्चपासून खेळल्या जाणार आहे. अझहरुद्दीन पुढे म्हणाला, ‘भारतीय संघाची फलंदाजी बघितल्यानंतर अतिरिक्त फलंदाज खेळविण्यात येण्याची शक्यता आहे. करुण नायरला जयंत यादवच्या स्थानी संधी मिळू शकते. भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरूप बघता ईशांतची बॅक आॅफ लेंथ गोलंदाजी उपयुक्त ठरू शकत नाही. त्यामुळे विराटने भुवनेश्वरसारख्या स्विंग गोलंदाजाला संघामध्ये संधी द्यायला हवी.’ भारतातर्फे ९९ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व करणारा आणि जवळजवळ एक दशक संघाचे नेतृत्व करणाऱ्या अझहरुद्दीनने भारतीय फिरकीपटूंच्या कामगिरीवर टीका केली. ‘मायकल क्लार्कने मुंबईमध्ये ९ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले होते त्यावेळीही अशाच प्रकारची खेळपट्टी तयार करण्यात आली होती. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी चांगली नव्हती. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटूंची कामगिरी समाधानकारक नव्हती. विशेषत: रवींद्र जडेजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.’ स्टीव्ह ओकिफीने फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करायची, याचा धडा दिला आहे. ओकिफीने राखलेला टप्पा व दिशा अचूक होता. त्याप्रमाणे जडेजाने गोलंदाजी करायला हवी होती. जडेजाने उजवी यष्टी किंवा उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी केली. तो खरबडीत झालेल्या खेळपट्टीचा वापर करण्याचा प्रयत्न करीत होता आणि तेथेच त्याची चूक झाली. या खेळपट्टीवर त्याला अशाप्रकारे बळी मिळू शकत नव्हते आणि नेमके तेच घडले, असेही अझरुद्दीन म्हणाला. (वृत्तसंस्था)ओकिफीने मधल्या व डाव्या यष्टीच्या दिशेने गोलंदाजी केली. त्याने चेंडू अधिक वळवण्याचा प्रयत्न केला नाही. फलंदाजाला त्याने खेळण्यास बाध्य केले. त्यामुळे त्याने चार खेळाडूंना पायचित केले. डावखुरा फिरकीपटू जर चार खेळाडूंना पायचित करीत असेल तो सरळ चेंडू टाकत आहे, हे सिद्ध होते. उर्वरित काम खेळपट्टीने केले. भारतीय फलंदाज फिरकीसाठी खेळत होते. याचा अर्थ जडेजाच्या तुलनेत ओकिफीने खेळपट्टीचे चांगले आकलन केले. आश्विनबाबत विचार करता, या खेळपट्टीवर १०० पेक्षा अधिक धावा बहाल करणे म्हणजे निराशाजनक कामगिरी म्हणता येईल, - मोहम्मद अझरुद्दीन