शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

भारत दौऱ्यावर प्रभाव पडणार नाही

By admin | Updated: November 2, 2016 07:14 IST

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीचा भारत दौऱ्यावर प्रभाव पडणार नाही, असा विश्वास इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी व्यक्त केला.

मीरपूर : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीचा भारत दौऱ्यावर प्रभाव पडणार नाही, असा विश्वास इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी व्यक्त केला. बेलिस म्हणाले,‘भारत दौरा खडतर राहणार आहे, हे निश्चित. आम्हाला या दौऱ्यात चांगली कामगिरी करावी लागेल. यापूर्वीही आम्ही पिछाडीवर असताना शानदार पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो आहोत. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघाविरुद्ध त्यांच्याच भूमीत खेळायचे असल्यामुळे आम्हाला चमकदार कामगिरी करावी लागेल. यापूर्वीही इंग्लंड संघाने पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन केले आहे. त्यामुळे या वेळी संघाकडून अशीच अपेक्षा आहे.’इंग्लंडला बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात १०८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मालिका १-१ ने बरोबरीत संपली. इंग्लंडने यापूर्वी बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या सर्व ९ कसोटी सामन्यांत विजय मिळविण्याची कामगिरी केली आहे; पण भारत दौऱ्यापूर्वी पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही प्रशिक्षक बेलिस यांनी संघ शानदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला. बेलिस म्हणाले, ‘संघातील काही खेळाडूंचे स्थान धोक्यात आहे. त्यात गॅरी बॅलेन्सचाही समावेश आहे. बांगलादेशविरुद्ध चार डावांत त्याला दुहेरी धावसंख्या नोंदवता आली नाही. पाकविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत बॅलेन्सची सरासरी ३० पेक्षा कमी होती, तरी त्याची बांगलादेश दौऱ्यासाठी निवड करण्यात आली; पण तेथेही त्याला छाप सोडता आली नाही.’ (वृत्तसंस्था)