शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

भारताकडे १५ धावांची आघाडी

By admin | Updated: July 3, 2014 04:43 IST

डर्बिशायरच्या पहिल्या डावातील पाच बाद ३२६ (डाव घोषित) धावांना उत्तर देणाऱ्या भारताने सावध सुरुवात केली.

डर्बी : डर्बिशायरच्या पहिल्या डावातील पाच बाद ३२६ (डाव घोषित) धावांना उत्तर देणाऱ्या भारताने सावध सुरुवात केली. तीन दिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ६ बाद ३४१ धावांवर डाव घोषित करून १५ धावांची आघडी घेतली. चेतेश्वर पुजारा आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी ८१ धावांचे योगदान दिले. यजमान संघाने ३२६ धावांवर डाव घोषित केल्यानंतर भारताने दोन्ही सलामीवीर झटपट गमावले. शिखर धवन (६) आणि मुरली विजय (६) हे फार काळ स्थिरावू शकले नाहीत. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी संघाला सावरले. या दोघांनी संघाला शतकाच्या उंबरठ्यावर आणले. ३६ धावांवर कोहली माघारी परतल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने पुजाराला दमदार साथ दिली. कोहली ३६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर धोनी व पुजारा या जोडीने ११९ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या दमदार खेळाने भारताने मुसंडी मारली. २ बाद १८ अशा दयनीय अवस्थेतून भारत ४ बाद २०० अशा मजबूत स्थितीत आला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या धोनीला ४६ धावांवर वेनराईटने माघारी धाडले. त्यानंतर रविंद्र जाडेजाही ४५ धावांचे योगदान देऊन तंबूत परतला. स्टुअर्ट बिन्नी आणि पुजारा यांनी संघाला आघाडी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. दोघांनीही संयमी खेळ करत प्रत्येकी ८१ धावांची खेळी केली.दिवसअखेर भारताने ३४१ धावा केल्या.