शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

भारत, न्यूझीलंडमधील अखेरचा सामना रोमहर्षक ठरेल

By admin | Updated: October 29, 2016 03:25 IST

रांचीमध्ये पाहुण्या संघाने शानदार पुनरागमन केल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पाचवा व अखेरचा वन-डे सामना रोमांचक ठरणार आहे. न्यूझीलंड संघ मोठ्या धावसंख्येचा

- सुनील गावसकर लिहितो़रांचीमध्ये पाहुण्या संघाने शानदार पुनरागमन केल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पाचवा व अखेरचा वन-डे सामना रोमांचक ठरणार आहे. न्यूझीलंड संघ मोठ्या धावसंख्येचा बचाव करीत नव्हता. पण त्यांच्या गोलंदाजांनी केलेला मारा आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची मिळालेली साथ त्यामुळे भारताला लक्ष्यापेक्षा २५ धावांचा अधिक पाठलाग करावा लागल्याचे दिसून आले. विशाखापट्टणम्मध्ये खेळपट्टीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. रणजी ट्रॉफी सामन्यांचा विचार करता येथे मोठी धावसंख्या उभारल्या गेलेली नाही. खेळपट्टी जर भंग झाली तर येथे फलंदाजी करणे आव्हान ठरेल. किवी संघाने डेवसिचचा समावेश करण्याचा चांगला निर्णय घेतल्यामुळे त्यांच्याकडे फिरकीचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला. डेवसिचने रांचीमध्ये मात्र सिम मारा केला. कारण ‘दव’ हा घटक महत्त्वाचा ठरत असल्यामुळे चेंडूवर ग्रीप मिळवण्यात अडचण भासत होती. सँटनर व ईश सोढी यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. भारतानेही केदार जाधवचा वापर केला. महाराष्ट्राच्या कर्णधाराने या मालिकेत केवळ बळीच घेतले असे नाही तर त्याने धावगतीवर अंकुश राखला. पांड्या आणि कुलकर्णी हे गोलंदाज महागडे ठरल्यामुळे जाधवच्या गोलंदाजीमुळे कर्णधाराला दिलासा मिळाला. पांड्याने गुप्टीलचा महत्त्वाचा बळी घेतला. पांड्याला सलग दुसऱ्या लढतीत निर्धारित १० षटकांचा कोटा पूर्ण करता आला नाही आणि संघव्यवस्थापनासाठी ही चिंतेची बाब आहे. फलंदाजांचे अपयश भारतीय संघासाठी महत्त्वाची चिंता ठरली आहे. रोहित शर्माला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसून, मनीष पांडे व जाधव अपयशी ठरल्यामुळे कोहलीवरील दडपण वाढले आहे. भारतीय संघाने दोन लढतीत मिळवलेल्या विजयामध्ये कोहलीचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. रांचीमध्येही तो अपयशी ठरला असे म्हणता येणार नसले तरी तो जर अर्धशतकापेक्षा कमी धावांवर बाद झाला तर भारताला धावफलकावर मोठी धावसंख्या उभारता येत नाही, हे सत्य आहे. कागदावर बघता भारतीय फलंदाजी तळापर्यंत असल्याचे दिसून येते. पण खरे बघता ही फलंदाजी पाचव्या क्रमांकानंतर संपलेली असल्याचे चित्र आहे आणि भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे. आघाडीच्या पाच फलंदाजांपैकी सर्वच फॉर्मात आहेत, असे नाही. भारताला बुमराहची अनुपस्थिती जाणवली. डेथ ओव्हर्समध्ये तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. विशाखापट्टणम्मध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी तो ‘फिट’ असेल, अशी आशा आहे. न्यूझीलंड संघ रांचीतील कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. वन-डे मालिकेत विजय मिळवला तर कसोटी मालिकेतील अपयश त्यांना धुवून काढता येईल. (पीएमजी)