शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

भारत, न्यूझीलंडमधील अखेरचा सामना रोमहर्षक ठरेल

By admin | Updated: October 29, 2016 03:25 IST

रांचीमध्ये पाहुण्या संघाने शानदार पुनरागमन केल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पाचवा व अखेरचा वन-डे सामना रोमांचक ठरणार आहे. न्यूझीलंड संघ मोठ्या धावसंख्येचा

- सुनील गावसकर लिहितो़रांचीमध्ये पाहुण्या संघाने शानदार पुनरागमन केल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पाचवा व अखेरचा वन-डे सामना रोमांचक ठरणार आहे. न्यूझीलंड संघ मोठ्या धावसंख्येचा बचाव करीत नव्हता. पण त्यांच्या गोलंदाजांनी केलेला मारा आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची मिळालेली साथ त्यामुळे भारताला लक्ष्यापेक्षा २५ धावांचा अधिक पाठलाग करावा लागल्याचे दिसून आले. विशाखापट्टणम्मध्ये खेळपट्टीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. रणजी ट्रॉफी सामन्यांचा विचार करता येथे मोठी धावसंख्या उभारल्या गेलेली नाही. खेळपट्टी जर भंग झाली तर येथे फलंदाजी करणे आव्हान ठरेल. किवी संघाने डेवसिचचा समावेश करण्याचा चांगला निर्णय घेतल्यामुळे त्यांच्याकडे फिरकीचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला. डेवसिचने रांचीमध्ये मात्र सिम मारा केला. कारण ‘दव’ हा घटक महत्त्वाचा ठरत असल्यामुळे चेंडूवर ग्रीप मिळवण्यात अडचण भासत होती. सँटनर व ईश सोढी यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. भारतानेही केदार जाधवचा वापर केला. महाराष्ट्राच्या कर्णधाराने या मालिकेत केवळ बळीच घेतले असे नाही तर त्याने धावगतीवर अंकुश राखला. पांड्या आणि कुलकर्णी हे गोलंदाज महागडे ठरल्यामुळे जाधवच्या गोलंदाजीमुळे कर्णधाराला दिलासा मिळाला. पांड्याने गुप्टीलचा महत्त्वाचा बळी घेतला. पांड्याला सलग दुसऱ्या लढतीत निर्धारित १० षटकांचा कोटा पूर्ण करता आला नाही आणि संघव्यवस्थापनासाठी ही चिंतेची बाब आहे. फलंदाजांचे अपयश भारतीय संघासाठी महत्त्वाची चिंता ठरली आहे. रोहित शर्माला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसून, मनीष पांडे व जाधव अपयशी ठरल्यामुळे कोहलीवरील दडपण वाढले आहे. भारतीय संघाने दोन लढतीत मिळवलेल्या विजयामध्ये कोहलीचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. रांचीमध्येही तो अपयशी ठरला असे म्हणता येणार नसले तरी तो जर अर्धशतकापेक्षा कमी धावांवर बाद झाला तर भारताला धावफलकावर मोठी धावसंख्या उभारता येत नाही, हे सत्य आहे. कागदावर बघता भारतीय फलंदाजी तळापर्यंत असल्याचे दिसून येते. पण खरे बघता ही फलंदाजी पाचव्या क्रमांकानंतर संपलेली असल्याचे चित्र आहे आणि भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे. आघाडीच्या पाच फलंदाजांपैकी सर्वच फॉर्मात आहेत, असे नाही. भारताला बुमराहची अनुपस्थिती जाणवली. डेथ ओव्हर्समध्ये तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. विशाखापट्टणम्मध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी तो ‘फिट’ असेल, अशी आशा आहे. न्यूझीलंड संघ रांचीतील कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. वन-डे मालिकेत विजय मिळवला तर कसोटी मालिकेतील अपयश त्यांना धुवून काढता येईल. (पीएमजी)