शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

पराभवास मी जबाबदार : धोनीची कबुली

By admin | Updated: September 9, 2014 03:14 IST

अखेरच्या षटकात सामना जिंकून देण्याची जबाबदारी माझी होती. मी विजय मिळवून देण्यासाठीच उभा होतो पण तीन धावांनी इंग्लंडविरुद्ध टी-२0 सामना गमवावा लागला तो माझ्यामुळेच.

बर्मिंघम : ''अखेरच्या षटकात सामना जिंकून देण्याची जबाबदारी माझी होती. मी विजय मिळवून देण्यासाठीच उभा होतो पण तीन धावांनी इंग्लंडविरुद्ध टी-२0 सामना गमवावा लागला तो माझ्यामुळेच.'' टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने रविवारच्या पराभवाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेत हे वक्तव्य केले.भारताला १८१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. विराट कोहलीच्या दौर्‍यातील पहिल्या अर्धशतकी खेळीनंतरही भारताचा डाव २0 षटकांत ५ बाद १७७ धावांवर थांबला. यावर धोनी म्हणाला,'सहा चेंडूवर १७ धावा काढणे नेहमी कठीण काम असते. मी पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. पण त्यानंतर याच षटकांत ज्या चेंडूवर किमान चौकार मारायला हवे होते असे दोन चेंडू गमावले. परिस्थिती विपरीत असली की चेंडू देखील बॅटवर घेणे अवघड जाते. दुसर्‍या टोकाला अंबाती रायुडू होता. मी मात्र एकेरी धाव न घेता विजयी शॉट मारण्याचा निर्णय घेतला. चेंडू माझ्या बॅटवर येत आहे असे वाटले होते. मी सामना जिंकून देऊ शकतो अशी खात्रीहो होती. मात्र तसे घडले नाही. षटक सुरू होण्याआधीच सामना मी संपवेन असा मनोमन विचारही केला. रायुडू खेळपट्टीवर नुकताच आला होता. त्यामुळे मी स्वत:कडे सूत्रे ठेवली. सामना जिंकण्यात मोठी जबाबदारी उचलणे ही माझी ताकद असल्याने माझा आत्मविश्‍वास कायम होता. पण स्थिती बाजूने नव्हती.'सामन्यादरम्यान गोलंदाज डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्यात अपयशी ठरले. त्यांनी यॉर्कर चेंडू टाकण्याऐवजी खाली राहणारे फुलटॉस चेंडू टाकले. यावर धोनीने चिंता व्यक्त केली. तो पुढे म्हणाला, 'या सामन्यात तीन फिरकी गोलंदाज खेळविल्याने चेंडू नवा कोरा होता. अशावेळी डेथ ओव्हरमध्ये मारा करणे अवघड जाते. लाईन आणि लेग्ंथ बदलण्यात अपयश आल्यामुळे डेथ ओव्हरमध्ये अधिक धावा मोजाव्या लागल्या.'दोन महिन्यांचा हा दौरा कसा राहिला, असे विचारताच धोनी म्हणाला,'या दौर्‍यात अनेक युवा खेळाडू होते. पाच सामन्यांची कसोटी मालिका लांबलचक असते. याआधी आमचा कुठलाही खेळाडू दीर्घ मालिका खेळला नाही. पहिल्या दोन सामन्यात सरस कामगिरी तर झालो पण नंतरच्या तिन्ही सामन्यात कामगिरी ढेपाळली. त्यांनतर वन डेतही चांगली कामगिरी अपेक्षित होती पण तसे घडू शकले नाही.' या दौर्‍याच्या मधल्या काळात आमच्याकडून खराब खेळ झाला. असे प्रत्येक संघासोबत घडते. अनुभव मात्र सर्वकाही शिकायला भाग पाडतो. यानंतर विंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे असल्याने चुका सुधारू शकलो तर मला आत्यानंद होईल.'(वृत्तसंस्था)