शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पराभवास मी जबाबदार : धोनीची कबुली

By admin | Updated: September 9, 2014 03:14 IST

अखेरच्या षटकात सामना जिंकून देण्याची जबाबदारी माझी होती. मी विजय मिळवून देण्यासाठीच उभा होतो पण तीन धावांनी इंग्लंडविरुद्ध टी-२0 सामना गमवावा लागला तो माझ्यामुळेच.

बर्मिंघम : ''अखेरच्या षटकात सामना जिंकून देण्याची जबाबदारी माझी होती. मी विजय मिळवून देण्यासाठीच उभा होतो पण तीन धावांनी इंग्लंडविरुद्ध टी-२0 सामना गमवावा लागला तो माझ्यामुळेच.'' टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने रविवारच्या पराभवाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेत हे वक्तव्य केले.भारताला १८१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. विराट कोहलीच्या दौर्‍यातील पहिल्या अर्धशतकी खेळीनंतरही भारताचा डाव २0 षटकांत ५ बाद १७७ धावांवर थांबला. यावर धोनी म्हणाला,'सहा चेंडूवर १७ धावा काढणे नेहमी कठीण काम असते. मी पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. पण त्यानंतर याच षटकांत ज्या चेंडूवर किमान चौकार मारायला हवे होते असे दोन चेंडू गमावले. परिस्थिती विपरीत असली की चेंडू देखील बॅटवर घेणे अवघड जाते. दुसर्‍या टोकाला अंबाती रायुडू होता. मी मात्र एकेरी धाव न घेता विजयी शॉट मारण्याचा निर्णय घेतला. चेंडू माझ्या बॅटवर येत आहे असे वाटले होते. मी सामना जिंकून देऊ शकतो अशी खात्रीहो होती. मात्र तसे घडले नाही. षटक सुरू होण्याआधीच सामना मी संपवेन असा मनोमन विचारही केला. रायुडू खेळपट्टीवर नुकताच आला होता. त्यामुळे मी स्वत:कडे सूत्रे ठेवली. सामना जिंकण्यात मोठी जबाबदारी उचलणे ही माझी ताकद असल्याने माझा आत्मविश्‍वास कायम होता. पण स्थिती बाजूने नव्हती.'सामन्यादरम्यान गोलंदाज डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्यात अपयशी ठरले. त्यांनी यॉर्कर चेंडू टाकण्याऐवजी खाली राहणारे फुलटॉस चेंडू टाकले. यावर धोनीने चिंता व्यक्त केली. तो पुढे म्हणाला, 'या सामन्यात तीन फिरकी गोलंदाज खेळविल्याने चेंडू नवा कोरा होता. अशावेळी डेथ ओव्हरमध्ये मारा करणे अवघड जाते. लाईन आणि लेग्ंथ बदलण्यात अपयश आल्यामुळे डेथ ओव्हरमध्ये अधिक धावा मोजाव्या लागल्या.'दोन महिन्यांचा हा दौरा कसा राहिला, असे विचारताच धोनी म्हणाला,'या दौर्‍यात अनेक युवा खेळाडू होते. पाच सामन्यांची कसोटी मालिका लांबलचक असते. याआधी आमचा कुठलाही खेळाडू दीर्घ मालिका खेळला नाही. पहिल्या दोन सामन्यात सरस कामगिरी तर झालो पण नंतरच्या तिन्ही सामन्यात कामगिरी ढेपाळली. त्यांनतर वन डेतही चांगली कामगिरी अपेक्षित होती पण तसे घडू शकले नाही.' या दौर्‍याच्या मधल्या काळात आमच्याकडून खराब खेळ झाला. असे प्रत्येक संघासोबत घडते. अनुभव मात्र सर्वकाही शिकायला भाग पाडतो. यानंतर विंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे असल्याने चुका सुधारू शकलो तर मला आत्यानंद होईल.'(वृत्तसंस्था)