शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

इंग्लंड कसोटी मालिकेवर गांगुलीची भविष्यवाणी

By admin | Updated: November 3, 2016 14:58 IST

कसोटी मालिकेत भारत इंग्लंडवर सहजपणे विजय मिळवेल अशी भविष्यवाणी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने इंग्लंड कसोटी मालिकेवर भविष्यवाणी केली आहे. कसोटी मालिकेत भारत इंग्लंडवर सहजपणे विजय मिळवेल अशी भविष्यवाणी सौरभ गांगुलीने केली आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये 9 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. नुकत्याच मायदेशात झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला ३-० असा क्लीन स्विप दिल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
 
'भारतीय संघ सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडप्रमाणे अजून एकदा भारत व्हाईटवॉश देण्यासाठी तयार आहे अशी मला आशा आहे. इंग्लंड संघाने सावध राहायला हवं,' असं गांगुली बोलला आहे. 
 
 
गांगुलीप्रमाणे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही 'इंग्लंड संघाकडे स्पिनर्सची कमतरता असून, फलंदाज बांगलादेश विरोधात खेळताना अडखळत असल्याचं दिसत होतं,' असं म्हटलं आहे.  भारताच्या अश्विन आणि रवींद्र जाडेजासारख्या उत्तम फिरकीपटूंना सामोरं जाताना, इंग्लंडला प्रचंड सावधानता बाळगायला हवी, असंही वॉनने नमूद केलं.
 
इंग्लंड संघ ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी राजकोटला रवाना होणार आहे. मालिकेतील अन्य कसोटी सामने विशाखापट्टणम (१७ ते २१ नोव्हेंबर), मोहाली (२६ ते ३० नोव्हेंबर), मुंबई (८ ते १२ डिसेंबर) आणि चेन्नई (१६ ते २० डिसेंबर) येथे खेळल्या जाणार आहेत. 
 
मागच्या दोन कसोटी मालिकात इंग्लंडने भारतावर मिळवला विजय 
बांगलादेश दौ-यात निराशाजनक कामगिरी करुन इंग्लंडचा संघ भारतात आला आहे. पण शेवटच्या भारत दौ-यातील कामगिरी इंग्लंडचा उत्साह वाढवणारी आहे. २०१२-१३ मध्ये इंग्लिश संघ भारत दौ-यावर आला होता. त्यावेळी इंग्लंडने मालिका २-१ ने जिंकली होती. ३१ वर्षानंतर भारत आणि इंग्लंड पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहेत. यापूर्वी १९८४-८५ साली दोन्ही देश पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळले होते. 
 
दोन वर्षांपूर्वी २०१४ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौ-यावर गेला होता. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका इंग्लंडने ३-१ ने जिंकून पतौडी ट्रॉफीवर कब्जा केला होता. 
 
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, मोहंमद शमी, गौतम गंभीर, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, हार्दिक पंड्या, उमेश यादव, करुण नायर, अमित मिश्रा, वृद्धिमान साहा आणि चेतेश्वर पुजारा.